भारताची सीमा वाढवणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी
इंदीरा गांधी ! भारताच्या कणखर पंतप्रधांपैकी एक असणाऱ्या पंतप्रधान. लाल बहादूर शास्त्री यांचा तास्कंद शहरात संशयास्पद मृत्यू झाल्यावर, भारताच्या कायम पंतप्रधानपदी आलेल्या तिसऱ्या व्यक्ती म्हणजे इंदीरा गांधी . येत्या सोमवारी त्यांची ३८ वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली. इंदीरा गांधीच्या कर्तृत्वाबाबत बोलताना कायम बांगलादेशाचे उदाहरण दिले जाते.मात्र पाकिस्तानचे दोन तूकडे करण्याबरोबरच भारताचे भौगोलिक क्षेत्रात वाढ करत ,अमेरिकेचा हस्तक होण्याकडे वाटचाल करणाऱ्या इशान्य भारताच्या सुरक्षीततेचा विचार करता अत्यंत महत्तवाच्या जागेवर असणाऱ्या एका देशाला भारताचा भुभाग करण्याचा त्यांचा योगदानाबाबत फारच कमी बोलले जाते.सोमवारी असणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त या मुद्दयावर बोलण्यासाठी आजचे लेखन . मित्रांनो आज आपण भारताचा नकाशा बघीतल्यास त्यामध्ये पुर्व भागात बांगलादेश नेपाळ ,भुतान या तीन देशाच्या सिमा जिथे एकत्र येतात त्या सुप्रसिद्ध सिलीगुडी काँरीडाँरनंतर आपणास भारताचा नकाशा काहीसा रूंदवललेला दिसतो.हा रुंदवलेला भाग असतो सिक्कीमचा. .जे 19