अवयवदान श्रेष्ठ दान
सध्या आपल्या भारतात मृत्युमुखी पडणाऱ्या अनेक लोकांच्या मृत्यूचे कारण एखाद्या अवयवाचे काम करेनासे होणे हे असते. जर दुसऱ्या व्यक्तींचे ते अवयव जर ते अवयव निकामी झालेल्या व्यक्तीला मिळाले तर आजारी व्यक्तीचे प्राण आपण वाचावू शकतो. क्राँंग्रेसचे मोठे नेते विलासराव देशमुख यांची प्राणज्योत मालवण्यासाठी देखील त्यांना योग्य वेळेत यकृत न मिळणे, हे कारण असल्याचे आपणास स्मरत असेलच. असे दुर्देवी मृत्यू टाळावे यासाठी नागरीकांमध्ये अवयव दानाबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. हीच बाब हेरुन 27 नोव्हेंबर हा दिवस आपल्या भारतात अवयव दान जागृती म्हणून साजरा करण्यात येतो. ज्या व्यक्तीचा मृत्यू एखाद्या साथीच्या आजारात, अथवा एडस्, कावीळ, मधूमेह या प्रकाराच्या आजारामुळे झालेला नाही, असी व्यक्ती अवयवदानाबाबत पात्र ठरते.जर भूतकाळी करोना सारखा साथीचा आजार झालेला असून त्यातून बरे झालेल्या व्यक्ती त्यानंतर सहा ते नउ महिन्यानंतर मृत झाल्यास त्या व्यक्ती देखिल अवयवदानास प्...