शतरंज के हम सिकंदर हमसे आगे ना कोई !
यहाके हम सिकंदर हमसे ना आगे कोई ! असे एका हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल आहेत . जगात आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत . हे जगाला दाखवूंन देण्याच्या पार्श्वभूमीवरचे हे गाणे भारतीय युवा बुद्धिबळपटूंनी २२ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात आणून दिवाळी सण सुरु होण्याच्या आधीच दिवाळी सण साजरा केला आहे , इंडोनेशिया देशातील बाली या शहरात झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ विजेतेपद स्पर्धेत विविध प्रकारात मिळून २७ वैयक्तिक आणि १९ सांघिक पदके भारतीय बुद्धिबळपटूंनी मिळवली आहेत या स्पर्धेत एकूण १०८ वैयक्तिक पदके देण्यात आली त्यापैकी अचूक २५ % पदके भारतीय खेळाडूंनी मिळवली हे विशेष . वैयक्तिक पदकांमध्ये १३ पदके ही सुवर्ण, ६ रौप्य ,आणि ८ कांस्य पदके आहेत . भारताला सांघिक प्रकारात ८ सुवर्ण , ७ रौप्य , आणि ६ कांस्य पदके मिळाली विविध वयोगटात झालेल्या या स्पर्धेत काही गटात भारताला संघ होण्यसासाठी पुरेसे खेळाडूं नसताना भारतीय खेळाडूंनी हा भीम पराक्रम केला आहे त्याबद्दल भारतीय युवा बुद्धिबळ खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच भारताने मिळवेललेल्या ४६ पदकांपैकी १० पदके हि कलासिकल या प्रकारच्या खेळातील आहेत या