पोस्ट्स

तरुणाई लेबलसह पोस्ट दाखवत आहे

असे अधिकारी न झालेलेच बरे

इमेज
पुणे शहरात नविन वर्षाची सुरवात झाली ती आंदोलनाने. महाराष्ट्र पोलिस दलात भावी अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन तयारी करणाऱ्या उमेदवारांनी त्यासाठी होणाऱ्या परीक्षेला बसण्यासाठी  वयोमर्यादेत वाढ करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले. या पुर्णत: चूकीच्या गोष्टीसाठी सुरू झालेल्या आंदोलकांना त्यांची योग्य जागा दाखवत राज्य सरकारने त्यांचा मागण्यांना वाटाण्याचा अक्षता दाखवल्या,जे योग्यच आहे. जाहिरात उशीरा आल्यामुळे काही जणांची वयोमर्यादा उलटून गेली आहे, असे अत्यंत हास्यापद कारण आंदोलकांनी दिले होते‌. ज्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची किमान आवश्यकता ही पदवी आहे.जी वयाच्या २१ व्या वर्षी फार फार उशीरा म्हटले तर २३ वर्षाचे झाल्यावर मिळून जाते.तीला ३०/३२ वय एव्हढे वय ही अंतीम मुदत असताना या भावी अधिकाऱ्यांना त्यात १ वर्षाची वाढ हवी होती. समजा मास्टर ड्रिग्री मिळाल्यावर त्यांनी या परीक्षेचा विचार केला तर ते २३ किंवा २५ व्या ते या परिक्षेचा अभ्यास सुरू करतील. आता हा अभ्यास सुरु केल्यावर अंतीम वयोमर्यादा होणेपर्यत जी ५ ते ७ वर्षे काही उदाहरणात तर तब्बल ९ वर्ष मिळतात. त्यात त्यांना अरे हे मला जम...

*पूजा खेडकर प्रकरणाने जन्म दिलेले काही प्रश्न*

इमेज
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या, प्रशासनाच्या पोलादी चौकटीत बनावट कागदपत्राद्वारे प्रवेश करणाऱ्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या समस्त भारतात गाजत आहे. पंतप्रधान कार्यालयाने पूजा खेडेकर यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती आहे. पंतप्रधान कार्यालयाने एक सदस्यीय आयोग नेमला आहे. आयोगाच्या चौकशीत पूजा खेडकर दोषी आढळल्यास  सेवेतून बडतर्फ करण्यासह,  नॉन क्रिमीलेयर नसताना नॉन क्रिमीलेयर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवल्यामुळे, खोटे जातीचे प्रमाणपत्र दाखवून प्रवेश केल्यामुळे होणारी कार्यवाही म्हणजेच  दोन वर्ष कारावास तसेच खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून सेवेत प्रवेश केल्याप्रकरणी तीन वर्षाच्या सक्षम कारावासाची क्षिक्षा होऊ शकते. आता त्यांना  क्षिक्षा होइल तेव्हा होईल, किंवा त्या निर्दोष ठरतील. आता यातील काय होते?, ते येणार काळच ठरवेल, त्याबाबत आताच काही भाष्य करणे धाडसाचे ठरेल. असो.    मात्र पुजा खेडकर प्रकरणाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. नवी दिल्लीच्या मुखर्जी नगर आणि करोल बाग या परीसरात किंवा आपल्या पुण्याचा नवी पेठ,...

हि तरुणाई प्रशासनातील आव्हाने पेलू शकेल ?

इमेज
राज्य लोकसेवा आयोगाच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या  परीक्षेद्वारे राज्य प्रशासनातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकारीवर्गाच्या पदावर  नियुक्तहोण्यासाठी प्रयत्नशील युवकांच्या  आणि युवतींच्या आंदोलनाने १३ जानेवारीचा संपूर्ण दिवस धगधगता ठेवला . ज्याचा जोर प्रामुख्याने पुण्यात होंता मात्र औरंगाबाद कोल्हापूर या  शहरांसह  राज्यभरात ठिकठिकाणी  याबाबतचे आंदोलन झाले .गेल्यावर्षी  २६ जूनच्या  सुमारास महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाने अभ्यासात केलेले बदल मागे घेऊन जुन्याच पद्धतीनेपरीक्षा घेण्यात याव्यात अशी उभा भावी अधिकाऱ्यांची (?) मागणी आहे आम्ही सुमारे  दोन वर्ष आधीपासून या परीक्षेचा अभ्यास करत आहोत . आम्हाला इतक्या  लवकर हे बदल स्वीकारत नव्याने अभयास करणे जमणार नाही तरी या बदलानुसार परीक्षा २०२५ पासून घेण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे          या भावी अधिकऱ्यांची मागणी लक्षात घेतल्यास एक  प्रश्न निर्माण होत आहे ज्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे  लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच .तर तो प्रश्न आहे  ...

या ज्वालामुखींना कधी सामोरे जणार आपण ?

इमेज
    शुक्रवार १५ जुलैला सकाळी पुण्यात अक्षय माटेगावकर नावाच्या २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली सुप्रसिद्ध अभिनेत्री  केतकी माटेगावकर हिचा  अक्षय चुलतभाऊ होता . आपणास इंटरशिपमध्ये पुरेसे मार्क न मिळाल्याने चांगली नोकरी मिळणार नाही या नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले . अक्षयची आई मुबई विद्यापीठात प्राध्यापक आहे तर वडील मुबईला एका कंपनीत उच्च पदस्थ अभियंता आहेत . तर त्याची चुलत बहिणी आघडीची अभिनेत्री  आहे . लौकिक अर्थाने त्याचे कुटूंब सुस्थितीत होते सर्व घराची जवाबदारी त्याच्या खांद्यावरच आहे त्याला नोकरी न मिळाल्यास घराचे खायला वांदे होतील अशी स्थिती नव्हती  उलट नोकरी न मिळाल्याने तो काही काळ जरी बेरोजगार राहिला असता तरी तो उपाशी मरण्याची स्थिती नव्हती  . असे असून देखील अक्षयने जेमतेम २१ व्या वर्षी आत्महत्या केली ज्या कारणाने अक्षयने आत्महत्या हे पाऊल उचलले ते बघता आजची युवापिढी कोणत्या अवस्थेत जगत आहे याचा डोळ्यात अंजन घालणारा पुरावाच म्हणावा लागेल       अक्षयचे घर प्रसिद्ध असल्याने त्याच्या आत्महत्येची बातमी मा...

तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय

इमेज
      राज्यातील तरुणाईचे भविष्य नासवणारा निर्णय बुधवार १५ जून रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात आला . महाराष्ट्र लोकसेवा अयोगकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी प्रविष्ठ होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांची संख्या वयोमर्यादा संपेपर्यंत  अमर्याद करावयाचा निर्ययाचे या शिवाय अन्य दुसऱ्या शब्दात वर्णन करता येणे अशक्यच . मुळात आधीच अवास्तव असलेली वयोमर्यादा (खुल्या गटासाठी ३८ वर्षे तर विविध प्रकारची आरक्षण असल्यास त्या पेक्षा अधिक )  कमी करण्याची गरज असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर करण्यात या निर्णयामुळे भविष्यात आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्यास आश्चर्य वाटायला नको आतापर्यंत एकाच स्वप्नील लोणकर महारष्ट्राने बघितला आहे मात्र या निर्णयाने भविष्यात असे कितीतरी स्वप्नील निर्माण होण्याचा धोका या निर्ययाने उत्पन्न केला आहे  .  मुळात अत्यंत कमी जागेसाठी निघणारी भरती, मात्र  परीक्षेसाठी प्रविष्ठ होणारी अमर्याद संख्या यांचा एकत्रित परिपाक म्हणजे अत्यंत मरणाची गळेकापू स्पर्धा असे राज्यसेवेच्या परीक्षेचे स्वरूप आहे त...

आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी

इमेज
            आपल्या मराठीतील एक सुप्रसिद्ध म्हण म्हणजे "आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी". एखादी समस्या सोडवण्यासाठी  आवश्यक असणाऱ्या उपाययोजना सोडून इतरच उपाययोजना करणे, यासाठी ही म्हण वापरली जाते. बंगळुरु येथील  इंडियन इनस्टिट्युट आँफ सायन्स मधील वसतिगृहातील छतावरील पंखे काढून टाकण्याचा प्रकार बघितला, तर सध्या प्रशासनाकडून याच म्हणीसारखे वर्तन घडत आहे, असे म्हणावे लागेल.  विद्यार्थी छतावरील पंख्यांचा वापर करत आत्महत्या करत असल्याने त्यांच्या आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेऊन ती दूर करण्याऐवजी ते छतावरील पंख्याचा वापर करतात. म्हणून छतावरील पंखे काढण्याचा प्रताप इंडियन इनस्टट्युट आँफ सायन्स प्रशासन करत आहे.पंखे काढल्यानंतर आत्महत्या थांबतील असे या प्रशासनास वाटते.मात्र सध्या असणारे छतावरील पंखे काढून टाकल्यास विद्यार्थी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करत आत्महत्या करतील. मग ते पण तोडणार का? आणि पहिले साधन तोडल्यामुळे दुसऱ्या साधनाद्वारे आत्महत्या  करण्यास सुरवात केल्यामुळे ते तोडणार असी साखळी किती दिवस चालणार ?असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे .म...