पोस्ट्स

नोव्हेंबर २१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असे बनले आपले संविधान (भाग 2)

इमेज
मित्रांनो, जगातील उत्कृष्ट संविधानापैकी एक असणाऱ्या आपल्या भारताच्या संविधानाची निर्मितीची प्रक्रिया भारत पारतंत्र्यात गेला, त्या वेळेपासूनच झाली, हे आपण जाणतातच.  त्यातील टप्पे कोणकोणते आहेत? , हे आपण या लेखमालेच्या पहिल्या भागात बघीतले .ज्यांना ते वाचायचे असतील त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.          तर मित्रांनो, 1756च्या बक्सार आणि 1765च्या प्लासीच्या युद्धाने इस्ट इंडीया कंपनीचा ताब्यात बंगाल चा महसुल गोळा करण्याचा अधिकार  हाती आला.(बंगालमध्ये या घडामोडी घडत असताना 1758 मध्ये मराठी भाषिकांनी अटक जिंकले तर 1861मध्ये मराठी भाषिकांचा पानिपतावर दारुण पराभव झाला) आणि कंपनीच्या हातात व्यापाराबरोबरच बंगालच्या महसुलातून मिळणारा नफा आला. मात्र कंपनीच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे, आणि भष्ट्राचारी कर्मचारी वर्गामुळे एकेकाळी ब्रिटीश सरकारला प्रचंड कर देणाऱ्या या कंपनीला ब्रिटीश सरकारकडूनच कर्ज घेण्याची वेळ आली, आणि कंपनीच्या योग्य व्यवस्थापनाची गरज ब्रिटिश सरकारला भासू लागली, आणि त्यातून जन्म झाला 1773 च्या रेग्यूलेटींग अँक्टचा . या रेग्युले...