उरल्या फक्त आठवणी... त्या काळरात्रीच्या
ख्रिसमसची सुट्टी आनंदीत घालवण्यासाठी ते समुद्रकिनारी आले होते. मात्र हा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार आहे, याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. हवामान खात्यातर्फे कोणत्याही वादळाची पुर्वसुचना देण्यात न आल्याने ते आनंदाने समुद्राचा लाटांशी खेळत होते. मात्र याच समुद्राचा लाटा आपल्या प्राणांचे हरण करणार आहेत, याबाबत त्यांना काहीच माहिती नव्हती. जपानमध्ये या प्रकारचे संकट नवीन नसले तरी , ते ज्या प्रदेशात समुद्रात मज्जा करत होते, त्या प्रदेशात या प्रकारचे संकट आल्याचा कोणताही ज्ञात इतिहास नव्हता. त्यामुळे ते बिनधास्त समुद्राच्या लाटांशी खेळत होते. ते ज्या ठिकाणी होते. तिथे नुकतेच उजाडले होते. त्यामुळे सर्व जण निवांतपणे समुद्रकिनारी फिरत होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. हे त्या संकटावरुन दिसून येत आहे . कारण कोणाच्या ध्यानीमनी नसताना जागतिक प्रमाणवेळेनूसार रात्री 12 वाजून 58 (जिथे ही घटना घडली त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 58 मिनीटे { भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 28 मिनीटे}) मलेशियाचा उत्तर बेटाच्या पश्चिमेला समुद्रात रिक्टर स्केलवर 9 पेक्ष