हिवसाळ्याचा निमित्ताने
आज गुरुवार दिनांक 2021 जानेवारी 7 रोजी नाशिकमध्ये भर दुपारी सुमारे दिडतास मुसळाधार पाउस झाला. याआधी डिसेंबर 2020 मध्ये पाउस पडला होता,त्यामुळे "नाशकात हिवसाळा हा ऋतू सुरु झाला आहे' , 'स्वेटर घालावा की रेनकोट असा प्रश्न नाशकातील हवामानामुळे निर्माण झाला आहे, अश्या आशयाचे मेसेज सोशल मिडियामध्ये वेगाने फिरु लागले. विनोदासाठी या प्रकारचे मेसेज उत्तम असले तरी पर्यावरणाचा प्रश्न किती गंभीर बनला आहे. याची साक्षच हा पाउस देत आहे. हवामानबदलामुळे 2020साली सर्वाधिक हानी पोहलेल्या देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला आहे, अशा अहवाल नुकताच सयुंक्त राष्ट्रसंघातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्या पार्श्वभूमीवर बघीतल्यास या पावसाचे गांभीर्य लक्षात येते.पाश्चात्य देशातील निवडणूकांमध्ये राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात हवामान बदल हा विषय असतोच, आपल्याकडे काय विषय असतात? हे आपण जाणतातच.नाही म्हणायला शालेय आणि महाविद्यलयीन स्तरावर आपणाकडे पर्यावरण हा विषय शिकायला असतो, मात्र त्याचे अपेक्षीत परीणाम साध्य होतात का ? हे ही आपणास माहिती आहेच. काही जागरुक नागरीक याबाबत सातत्याने प्रयत्न