भयानक वास्तवाची पुन्हा एकदा जाणीव !
मानवाचे हवामान बदल या संकटाशी लढण्याचे प्रयत्न तोकडे , अपुरे आहेत..याची जाणीव पुन्हा एकदा जाणीव मनुष्य प्राण्यास 9 आँगस्ट रोजी झाली.याला निमित्त होते,9 आँगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला आयपिसीसी अर्थात इंटर गव्हरमेंटल पँनेल फाँर क्लायमेंट चेंज या संस्थेचा आलेला हवामान बदलाविषयी मानवी बदलाविषयीचा अहवालाचा पहिला भाग..याचे दोन ते तीन भाग प्रसिद्ध होतात. सन 1990 पासून आय पि सी सी कडून सातत्याने दर दोन ते तीन वर्षांनी अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यंदा 16वा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत. आपणास पुढील दशकात अनेकदा तीव्र प्रकारचा हवामानास सामोरे जावे लागेल. प्रचंड पूर , प्रचंड उष्मा, प्रचंड दुष्काळ या प्रकारच्या हवामानाचा आपणास गेल्या काही वर्षांचा तूलनेत जास्त प्रमाणात सामना आगामी दशकात करावा लागेल. तसेच पुढील 30 नाही तर 20 वर्षातच आपणास 1.5 अंश सेल्यीयसने तापमान कमी करणे आवश्यक असल्याचे या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. (या आधीच्या अहवालात 1.5अंश सेल्यीयस तापमान कमी करण्यासाठी30 वर्षाची मर्यादा होती) हा अहवाल पुर्णतः शास्त्रीय कसोट्यांवर आधारीत