मुंबई आताची ,आणि त्यावेळची !
मी जिथे चहा पितो, त्या चहाच्या टपरीवर सातत्याने जूनी गाणी वाजत असतात. दोन तीन दिवसापुर्वीचीच गोष्ट आहे.नेहमीप्रमाणे तिथे मी चहा पिण्यासाठी गेलो असता, एक अत्यंत उत्तम गाणे तिथे वाजत होते. "ए दिल मुस्किल है जिना यहा ,...... ये बाँम्बे हे मेरी जान!" गुरुदत्त प्राडक्शनची निर्मिती असलेल्या सि. आय. डी. या चित्रपटातील हे गाणे त्या वेळच्या मुंबईतील स्थिती कसी होती? यावर छान भाष्य करते . हा चित्रपट सन1956 रोजी प्रदर्शित झाला. त्यामुळे आपणास तेथील मुंबईची स्थिती समजते. आताची स्थिती कसी आहे? हे आपण जाणतातच.नायक मुंबई किती वाइट आहे, यावर भाष्य करत असतो, तर नयिका मुंबई शहर किती उत्तम आहे, यावर भाष्य करुन त्यास नामोहरण करते. असी गाण्याची मध्यवर्ती कल्पना आहे. जाँनी वाकर आणि वहीदा रेहमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या गाण्याचे गीतकार आहे गीता दत्त आणि मोहमद्द रफी . गाण्याचे संगीतकार आहेत ओ पी नय्यर . सुमारे 4 मिनीटाच्या या गाण्यात आपणास मुंबईचे महत्त्व अधोरेखीत होते. गाण्यामध्ये सध्याचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बाहेर ट्राम जाताना दिसतात . गाण्यामध्ये सुद्धा ट्रामचा उल्ले