गरीब रथ एक्सप्रेस
गरीब रथ एक्सप्रेस एन डी मोदी सरकारने अखेर रद्द केली . गरीबांच्या तोंडाला पाने पुसण्याची अजून एक संधी सरकारने तयार केली . गोर गरीबांचा प्रवास सूखकर व्हावा याहेतूने युपीए सरकारच्या काळात ही योजना सूरू करण्यात आली होती . जी अखेर सरकारने बंद केली .सर्वसामान्य लोंकाना एसीच्या थंडाव्याचा आधार मिळून त्याचा प्रवास सूखकर व्हावा या हेतूने याची निर्मिती करण्यात आली होती. या गरीब रथाचे भाडे सर्वसामान्यांचा आवाक्यातील होते जे आता नसणार आहे. आता हमसफर एक्सप्रेसने प्रवास करावा लागणार आहे. मला व्यक्तीशा हा निर्णय आवडलेला नाही. या प्रकारच्या गाड्यांना साधे कोच बसवण्यात आले होते. त्याजमूळे याचा देखभालीच्या खर्च फारशा नव्हता . तरीही सरकारने या गाडया रद्द करण्याचा दुर्देवी निर्णय घेतला