मानावा सावध हो पुढल्या हाका
शाहरुख खान आणि आणि काजोल यांच्या अभिनयाने सजलेला एक उत्कृष्ट चित्रपट म्हणजे माय नेम इज खान . या चित्रपटात दोन्ही अभिनेत्यावर चित्रित एक गाणे आहे . तेरे नैना तेरे नैना रे . या गाण्यात एक दृश्यात शाहरुख खानने काजोलला मधमाश्यांचे निसर्गातील महत्व सांगितले आहे ज्यात अल्बर्ट आईंस्टानच्या हवाल्याने जर जगातील सर्व मधमाश्या नष्ट झाल्यावर चार वर्षांनी जगातील सर्व माणसे मरतील अशी भविष्यवाणी शाहरुखने केली आहे . आता असे काही अल्बर्ट आईंस्टान खरंच म्हंटले की शाहरुख खानाने चित्रपट पुढे नेण्यासाठी त्याच्या तोंडी स्वतःहून घातलेले वाक्य आहे हे तो शाहरुख खानच जाणे .मात्र जगातील पक्षी जगत धोक्यात आहे हे नुकतेच एका संशोधांतून स्पष्ट झाले आहे स्टेट ऑफ द वर्ल्ड्स बर्ड्स या पक्ष्यांच्या संरक्षणविषयक कार्य करणाऱ्या संस्थेनुसार जगभरात आढळणाऱ्या पक्ष्यच्या 10,994 जातींपैकी 13.5% जातींवर सध्या नामशेष होण्याचा धोका आहे गुवाहाटी येथील जंगलात त्यांनी केलेल्या प्रयोगवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे जगातील 14% पक्ष्यांच्या जाती जगभरतातील लोक खातात . मात्र सध्या अस्तित्वा