साहित्य संमेलन!
डिसेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात नाशिकला ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होणार आहे त्यासाठी नाशिकला जोरदार तयारी सुरु आहे . नुकतेच हे संमेलन ज्या ठिकाणी होणार आहे ,त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील झाला . त्यावेळी या ठिकाणी कोण कोण विशेष मान्यवर उपस्थित रहाणार आहेत ?याची कार्यक्रम पत्रिका देखील प्रसिद्ध करण्यात आली आणि काहिस्या शांत झालेल्या वादाला पुन्हा एकदा तोंड फुटले .राजकीय विचारसरणीबाबत काहीसे वादग्रस्त मत प्रदर्शन करणाऱ्या एक व्यक्तीला आमंत्रण देण्यावरून एका जातीच्या संघटनेने प्रचंड विरोध केला आहे . त्यांचे मराठी साहित्यातील योगदान काय ? सदर व्यक्ती परभाषिक असून त्यांच्या कार्यक्रमांच्या वेळी सदर व्यक्ती कोणत्याच मराठी साहित्यिकाला बोलवत नाही तरी आपण का बोलवायचे ? असा युक्तिवाद त्यांना विरोध करण्यासाठी केला जात आहे . माझ्या मते जे पूर्णतः अयोग्य आहे . साहित्यिकाला आमंत्रित करण्यासाठी भाषेचे बंधन असायला नको . कोणत्याही भाषेचा असला तरी साहित्यिकाला साहित्य संमेलनाचे दरवाजे बंद असायला नको . सध्या ते आपणस त्यांच्या साहित्यविषयक कार्यक्रमास बोलवत नसले तर