पोस्ट्स

डिसेंबर ९, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मूळ मुद्यांकडे दुर्लक्ष तर होत नाहीये ना ?

इमेज
     सध्या आपल्या भारतामध्ये अनेक जीवनावश्यक प्रश्न सोडवणे अत्यंत  तातडीचे झाले असताना , विविध लोकांकडून सध्याच्या परिस्थितीसी अत्यंत विसंगत मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे . या मुद्द्यांमध्ये महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचे नामविस्तार करण्याचे , तसेच अन्य देशातील काही समाजघटकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे विधेयक या मुद्यांचा समावेश करावा लागेल . विद्यापीठाच्या नामविस्तार करण्याच्या ऐवजी ते विद्यापीठ जागतिक पातळीवर  गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल कसे होईल ? याबाबत कार्यवाही करणे आवश्यक होते . अन्य देशातील अत्याचार सहन करणाऱ्या समाज घटकांविषयी माझी सहानभूती आहेच,  मात्र देशातील अनेक घटक हलाखीचे जीवन जगत असताना  त्यांचे जीवन सुधारणे हे प्रथम कर्तव्य असायला हवे .                                सध्या भारताची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक स्थितीत आहे . त्याविषयी उचलण्यात येणारी पाऊले पुरेशी नाहीत . अधिक पाऊले उचलण्यात येण्याची गरज आहे . भारतातील शिक्षणव्यवस्था अत्यंत धोकादायक स्थितीत आहे . प्रथम आणि असर या स्वयंसेवी संस्थेमार्फत शिक्षणाचे चित्र वारंवार समोर येत असतेच .  का