वाचनाचे नवे स्वरूप
आपल्याकडे "वाचाल तर वाचाल " अशी एक म्हण प्रचलित आहे . जर वाचन केले तर प्रगती होतोय लोकांत मन मिळतो , मनुष्य बहुश्रुत होतो , अशा या म्हणीचा अर्थ . आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी अनेक महान व्यक्तिमत्व या वाचनामुळे घडली . समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा वाचनाचे महत्व आपल्या रचनेनेतून संगीतातले आहेच . ते म्हणतात "दिसामाजी काहीतरी ते लिहावे , प्रसांगी अखंडित वंचित जावे, शहाणे करून सोडावे सकल जण'' . या वाचनाचे अनेक पर्याय सध्या आपणांकडे आलेली आहेत . पारंपरिक छापील पुस्तकांबरोबरच अत्याधुनिक अश्यां इ बुक सारख्या पुस्तकांमुळे पुस्तकांचे विश्व अधिकच रुंदावले आहे . किंबहुना यामध्ये रोजच भर पडत आहे . आधुनिक साधनांमुळे कमी जागेत कमी खर्चात जास्त संख्येनं पुस्तके साठवली जात असलयाने पुस्तकांचे हे जग रुंदावत आहे . काही जण आधुनिक साधनांमुळे वाचन संस्कृती धोक्यात आल्याची ओरड करतात ,.मला हे मान्य नाही . माझ्या मते अशी ओरड करणारे निव्वळ छापील पुस्तकांचा विश्वात रममाण होणारे असतात . वाचनाच्या नव्या स्वरूपाला हे वाचन मानतच नाहीत , आणि त्यामुळेच हे