हेल्मेट सक्ती आणि मी
सर्वप्रथम प्रथम मी हे स्पष्ट इच्छितो की , माझा हेल्मेटच्या वापरला विरोध नाही . माझा विरोध आहे , त्याचा सक्तीला .माझ्या मते सक्ती करून माझ्या मते कोणताही प्रश्न कधीच संपत नाही . जगात सर्वाधिक कायदे भारतात आहे . मात्र भारत अजूनही स्वर्ग झालेला नाही वाहतूक पोलिसांनी फक्त जनजागृतीचे काम करावे आणि हेलमेटच्या वापर करावा की नाही याचा निर्यय लोकांवर सोडून द्यावा . प्रत्येकाला आपला जीव प्रिय असतो . जर लोकांना वाटले तर लोक स्वतःहून हेल्मेट वापरतील . त्यासाठी सक्ती करायची गरज नाही . सक्ती केल्याने लोकांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावर गदा येते , असे माझे स्पष्ट मत आहे. यावर काही लोक असेही म्हणू शकतील की लोकांच्या मानसिकतेमुळे ही सक्ती करावी लागतेय . लोक कोणतेही गोष्ट सक्ती केल्याशिवाय गोष्ट वापरात नाही . मात्र मला ही गोष्ट मान्य नाही. लोक प्रचंड हुशार आहेत . जुने हिंदी गाणे मला याविषयी सांगावेसे वाटते " ये पब्लिक सब जानती है ये जो पब्लिक है " जर लोकांना ही गोष्ट पडली की लोक स्वतःहून वापरतील ही काही लोक असे ही अपघातात द