टोल नाका जीव वाचण्याचे साधन
नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल मधून लवकर सुटका नसल्याचे एका ठिकाणी सांगितले आणि विविध चर्चेला उधाण आले . आपण आपले वाहन रस्त्यावर आणताना विविध कर भरतोच . मग हा टोलचा भुर्दंड कशासाठी ? आदी प्रतिक्रिमा यावर विविध माध्यमातून उमटू लागल्या . मात्र सध्याच्या वाढलेल्या अपघाताच्या पाश्वभूमीवर अपघात टाळण्यासाठी आपणास टोल नाक्याचे महत्व दूर्लक्षून चालणार नाही , या टोल नाक्याच्या सुयोग्य वापर केल्यास स्पीड गन सारख्या खर्चिक उपाय ना योजता अपघाताला बऱ्याच मोठ्या प्रमाणांत आळा घालता येऊ शकतो . आपणास दोन टोल नाक्यातील अंतर माहिती असतेच ते अंतर सूरक्षीत पणे पार करण्यासाठी किती वेळ लागेल हेही आपण सांगू शकतो . समजा तो कालावधी य आहे आता आपल्याला एकच करायचे .ते म्हणजे एका टोलनाक्यावरुन दूसऱ्या टोरलनाक्यावर जाण्यासाठी क्ष रुपये टोल असेल तर य कालावधीत पोहचणाऱ्या वाहनांना टोल मधून काही प्रमाणात सवलत द्यायची तर य कालावधी पेक्षा कमी काळात हे अंतर पार करण्याऱ्या वाहनांना क्ष या रक्कमेच्या चार ते पाच पट टोल भरायला लावल्यास लोक आपसूकच हळू चालवतील. कारण प्रत्येकाला आपला प