उषकाल होता होता काळरात्र झाली
ऐंशीच्या दशकातील मराठीतील एक सर्वोत्त्कृष्ट चित्रपट म्हणजे सिंहासन .त्यातील एक सुप्रसिधद गाणे म्हणजे उषकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली . हा चित्रपट जरी राजकारणावर आधारित असला तरी त्या गाण्यातील बोल खूपच उत्तम आहेत . सध्याच्या काळातील भारतीय क्रिकेटची अवस्था बघितली तर हे गाणे आठवल्याशिवाय राहत नाही . टी २० विश्वचषकाचा संभाव्य विजेता म्हणून बघितला जाणाऱ्या भारताचा प्रवास साखळी स्पर्धेतच संपुष्टात आला . त्यामुळे या गाण्यातील ध्रुवपद "उषकाल होता होता काळरात्र झाली " आठवल्याशिवाय राहत नाही या गाण्यातील दुसरी ओळ " जे कधीच नव्हते त्याची आश का धरावी " हे वाक्य सुद्धा आपल्या भारतीय क्रिकेट संघाला चपलख बसते न्यझीलंड अफगाणिस्तानकडून हरल्यावर आपला उपांत्य फेरीत प्रवेश होणार . जे होणे अशक्यप्राय होते तसेच झाले न्यझीलंडकडून अफगाणिस्तान मोठ्या फरकाने हारले आणि भाताच्या क्रिकेटच्या बाबतीत " जे कधीच नव्हते त्याची आश का धरावी "हे वाक्य चपलख बसावे अशी स्थिती निर्माण झाली . आपल्या भारतासाठी याचा गाण्यातील तिसरी ओळ अरे पुन्हा