आता भारतभर एकच नंबर
काही दिवसांपुर्वी पर्यतची ही गोष्ट आहे. ज्यांचा भारतभर बदल्या होतात, अस्या व्यक्तींना त्यांचे वाहन प्रत्येक राज्यात नव्याने नोंदवावे लागत असे. वाहन नोंदवताना प्रत्येक राज्यात रोड टँक्स द्यावा लागत असे. वाहनाचे आयुष्य 15 वर्षाचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे एका राज्यात नोंदवलेले वाहन दुसऱ्या राज्यात नोंदवताना आधीच्या राज्यातून शिल्लक वर्षाचा रोडटँक्स परत मिळत असे.मात्र त्यासाठी विहीत केलेली प्रक्रिया इतकी किचकट होती, की सबंधित वाहनचालकाची अवस्था भिक नको पण कुत्र आवरं असी होत असे. परीणामी एकाच वाहनावर अनेकदा रोड टँक्स सबंधित मालक भरत असे. भारतीय वाहन कायदा 1986 नुसार आवश्यक असणाऱ्या या बाबींमुळे होणाऱ्या त्रासातून मोदी सरकारने वाहन मालकांची सुटका केली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी होणार आहे. ती आहे. ज्या खासगी कंपनीचे क्षेत्र किमान चार राज्य आहे. त्या कंपनीचे कर्मचारी आणि शासकीय उच्चपदस्थ यांना भारत या नामावलीखाली आपले वाहन नोंदवता येणार आहे. हा लाभ यापूढे नोंदणी होणाऱ्या वाहनांवर लागू असणार आहे. या पुर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही सुट नसेल. या वाहनांना प्