देशातील अंतर्गत धूसमुस
आज सध्या आपल्या भारतात कृषी कायद्याविरोधात राळ उठवले असताना, भारतातील मिझोराम आणि त्रिपूरा, तसेच पंजाब आणि हरीयाणा या दोन एकमेकांबरोबर सीमा आणि राजधानी शेअर करणाऱ्या राज्यांत वादाची ठिणगी पडलेल्या आहेत . तसे आपल्या भारताला दोन शेजारच्या राज्यात वाद निर्माण होणे नवे नाही , दोन्ही राज्यातून वाहणाऱ्या नद्या , अथवा सीमाच्या बाबत निश्चित मानांकन न झाल्याने आपल्या भारतात दोन शेजारच्या राज्यात आपल्या भारतात कायमस्वरूपी वाद चालूच असतात . मात्र सध्याचा अशांत अस्थिर वातावरणात असे वाद उफाळून येणे अधिक धोक्याचे आहे . त्यातही असा वाद जर त्रिपुरा आणि मिझोराम अश्यासारख्या देशाच्या संरक्षणासाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या महत्वत्त्वाच्या राज्यातील असेल तर परिस्थिती अजूनच बिकट होते , त्याचप्रमाणे पाकिस्तानसारख्या राष्ट्राला लागून असणाऱ्या पंजाब आणि भारताच्या प्रमुख औद्योगिक राज्यात समावेश असणाऱ्या पंजाब आणि हरियाणा या राज्यातील वाद असेल तर मग विचारायलाच नको , अश्या प्रकारचे राज्यांतर्गत असणारे वाद सोडवण्यासाठी घटनेने आखून दिलेल्या चौकटीतील मार्ग यावेळी कुचकामी पडतात . प्रादेशि