भारताच्या पराष्ट्र धोरणात बदलाचे वारे
भारताच्या परराष्ट्र धोरणात येत्या काळात आमूलार्ग बदल होणार आहेत याची साक्ष देणाऱ्या घटना सध्या नवी दिल्लीत आकारास येत आहेत १९ जून रोजी भारत आणि बांगलादेश या दोन देशात Joint Consultative Commission चे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते यामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ ए के अब्दुल मोमेन यांच्यात चर्चा करण्यात आली यावरील शाई वाळते न वाळते तोंच ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान जे त्यांचे सरंक्षण मंत्री देखील आहेत असे रिचर्ड मार्ल्स २० ते २३ जून दरम्यान भारताच्या भेटीवर आले आहेत मागच्या महिन्यात २३ मे रोजी पदाची सूत्रे हाती घेतल्यवरचा त्यांचा हा पहिलाच दौरा होता दौऱयावर जाण्याआधी ऑस्ट्रेलियात पत्रकारांना संबोधित करताना ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्सयांनी सांगितले की , भारत - ऑस्ट्रेलिया संरक्षण संबंध वाढवण्यात मंत्री राजनाथ सिंग यांचा मोलाचा वाटा आहे आणि आमच्या