रेल्वे प्रकाशाच्या गतीने बदलाकडे
आपली भारतीय रेल्वे मार्गाच्या विस्ताराचा बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर आहे . तर रोजगारनिर्मितीचा विचार करता जगातील पहिल्या क्रमांकाचा सार्वजनिक उपक्रम आहे, हे आपण जाणतातच . तथापी जगाचा विचार करता तंत्रज्ञानाचा बाबतीत भारतीय रेल्वे खूपच मागास आहे . मात्र सध्याचे केंद्र सरकारने रेल्वेवरील हा कलंक पुसण्याचा चंग बांधला असल्याचे त्यांच्या रेल्वेबाबतचे धोरण बघता वाटते आहे . भारतीय रेल्वेत रोज नवनवीन बदल घडत आहेत . गेल्या पंधरवड्यात रेल्वेत या संदर्भात तीन घटना घडल्या माझे आजचे लेखन या तीन बाबींची माहिती करून देण्यासाठी . तर मित्रानो, या तीन घटनांपैकी दोन घटना या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत . तर एका घटना राष्ट्रीय स्वरूपाची आहे . महाराष्ट्रात घडलेल्या दोन घटनांपैकी एक घटना पूर्णतः महाराष्ट्राशी संबंधित आहे , तर एक घटना अंशतः महाराष्टाशी संबंधित आहे . क्रमाक्रमाने या घटना बघूया . सुरवात पूर्णतः महाराष्टाशी संबंधित घटनेने . भारतीय रेल्वेमार्फत सध्या अस्तित्वात असणाऱ्या मीटरगेज आणि नॅनोगेजचे रूपांतरण ब्रॉडगेज मध्ये करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे . त्या