वंदन भारताची उभारणी ..करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाला !
150 वर्षाच्या गुलामगिरीतून नुकताच स्वतंत्र झालेला , गुलामगिरीच्या कालखंडात प्रचंड आर्थिक शोषण झालेले, हातात फारशी आर्थिक संसाधने नाहीत, प्रचंड गरिबी असलेल्या या देशात दंगलीच्या अगंडोबा उसळलेला, शेजारच्या देशाने केलेले आक्रमण ,देशात असणारे विविध संस्थाने , प्रत्येक देश स्वतंत्र देश भासावा अशी स्थिती त्यांचे देशात एकत्रीकरण करणे , हा देशा समोरचा सगळ्यात मोठ्या प्रश्नपैकी एक , जगातील सर्व भाषिक धार्मिक विविधता या एकाच ठिकाणी एकवटली आहे का ? असे वाटावे अशी स्थिती असणारा , प्रचंड लोकसंख्येचा देश . लोकशाहीचा गंध देखील बहुसंख्य लोकांना न झालेल्या देशात लोकशाहीचे बीज रोवण्याचे प्रचंड आव्हान, पेलत त्यांनी देशाचे सुकाणू घेतलेले . देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी . आपण बोलत आहोत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी . 27 मे ही त्यांची पुण्यतिथी त्या निमित्याने त्यांना भावपूर्ण आदरांजली . मी या आधी नुकत्याच स्वतंत्र झालेल्या समस्या सोडवायला विविध व्यक्ती असल्या तरी या सर्वांचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू करत होते . त्या