स्वागत उत्तरायणचे -
आपण लॉक डाउनच्या काळात सर्वांनी महाभारत बघितले आहेच . त्यात सांगितले आहेच की, या महाभारताच्या युद्धात मृत्यूशयेवर पडलेले असताना उत्तररायणाची वाट बघत असतात . उत्तरायण सुरु असताना प्राण जाणे शुभ समजले म्हणून ते उत्तररायणाची वाट बघत असतात \तर मित्रानो , आपल्याकडे विशेष शुभ मानल्या गेलेल्या उत्तररायणाचा प्रारंभ मंगळवारी २२ डिसेंबरला होत आहे . त्यानिमित्याने सर्वांना उत्तररायणाचा सुरवात होण्यासंदर्भात मनापासून शुभेच्छा हे का होते ते आता बघूया पृथ्वी सूर्याभोवती फिरते , हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान . सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो . मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात . आपण शेजारील चित्रात तो बघू शकतात . या भासमान भ्रमणात सूर्य जेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो . ज्या बिंदूपासून तो परत उजवीकडे भासमान भ्रमण