सिहांवलोकन भारतीय रेल्वे 2020 (भाग2 )
. या 2020 वर्षी करोना हा सगळ्यांचा आयुष्याशी निगडित प्रमुख विषय असला तरी, .भारतीय रेल्वेत देखील मोठ्या प्रमाणात बदल झाले . ते आपणापर्यंत पोहोचवणाऱ्या लेखमालेतील हा दुसरा भाग, आजच्या लेखात 1जानेवारी ते 30 जून या दरम्यान मध्ये घडणाऱ्या गोष्टीबाबत सांगेल .1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीत घडलेल्या घडामोडी या आधीच्या लेखात सांगितल्या आहेत . ज्यांना त्या वाचायच्या असतील त्यांच्यासाठी या लेखाची लिंक या लेखाचा खाली देण्यात आली आहे . तर मित्रानो बघूया जानेवारी ते जून या कालावधीतील रेल्वेच्या घडामोडी पुर्व विभागातील मेल, एक्सप्रेस , आरामदायी म्हणता येतील अस्या प्रकारच्या गाड्यांसह एकुण 34 गाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे .या गाड्यांना अधिक थांबे असल्याने रेल्वेचा अन्य वेगवान गाड्यांचा वेगावर अनुचित परीणाम होण्यासह, काही गाड्यांना अपेक्षीत प्रवाशी भारमान मिळत नसल्याचे कारण त्यासाठी रेल्वेने दिले आहे . सर्व भारतात लागू होणारा निर्णय यापेक्षा भयानक आहे . 200किमी पेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या पँसेजर गाड्यांचे एक्सप्रेस गाड्यांमध्ये रूपांतर करून