स्मरण जग बदलणाऱ्या त्या तीन दिवस तीन .रात्रीचे
भारतातील कोणत्याही राज्यातील रहिवासी असो , स्वामी विवेकांनद यांचे नाव ऐकताच नतमस्तक होतोच . स्वामी विवेकानंद यांचे शिकागो , येथील सुप्रसिद्ध भाषण त्याला मिळालेला प्रतिसाद याविषयी प्रत्येकाने कधीना कधी ऐकले असतेच कन्याकुमारी येथील शिलास्मारकाला पण आपल्यापैकी अनेकांनी भेट दिली असेल . स्वामी विवेकांनदानी आपल्या पारिजावर्क अवस्थेत असताना भेट दिलेल्या अखेरच्या काही ठिकाणांपैकी एक असणाऱ्या कन्याकुमारी येथे त्यांनी दिन दिवस तीन रात्र ध्यान केले होते . हे ध्यान करत असतानाच त्यांना , अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत जाण्याविषयी , त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या दृष्टांत झाला , अशी आख्यायिका सांगण्यात येते . स्वामी विवेकांनद यांनी हे ध्यान 25 ते 27 डिसेंबर 1892 रोजी केले होते . या 20 ला या घटनेला 128 वर्षे पूर्ण होईल . ध्यानात स्वामी विवेकानंदाना आपले कार्य कोणत्या दिशेने नेता येईल , असे समजले आणि त्यांनी सेवा कार्यासाठी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केली . या ध्य