पोस्ट्स

ललीत लेखन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रफी साहब, आपने मराठी को किरणे खूबसूरत चांद , दिये मान गये !

इमेज
 दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.काही कामानिमित्त पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रोने प्रवास करत होतो. वेळ दुपारची असल्याने फारशी गर्दी नव्हती. माझ्या शेजारीच एक सत्तरीचे आजोबा प्रवास करत होते. आजोबानी मेट्रोच्या संगीताच्या नियमाला बगल देत हेडफोन न वापरता, मोबाईलवर गाणी लावली होती. त्यामुळे त्या गाण्याच्या आस्वाद मला देखील घेता आला. आजोबानी शोधिसी मानव लावुनी अंतरी,  प्रभू तू दयाळू कृपावंत  दाता, हा छंद जीवाला लावी पिसे, हा रुसवा सोड सखे, हे मना आज कोणी बघ तुला या सारखी गाणी आपल्या मोबाईलवर लावली होती  आजोबांची गाणी शांत संगीताची आणि सहज गुणगुणता येतील या प्रकारच्या मराठी भाषेतील असल्याने मी आजोबांना गाणी आवडल्याचे सांगितलेत्यावर त्यांनी स्मितहास्य देत,ही  सगळी गाणी पंजाबी मुसलमान असलेल्या मोहंमद रफी यांनी गायलेली आणि श्रध्येय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे  भाऊ श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत अशी माहिती पुरवली. त्यांना शिवाजीनगर येथे जायचे असल्याने ते उतरून गेले मात्र  त्यांनी एका नव्या वादळाला जन्म दिला . हे वादळ होते मराठीला किती समृद्ध व...

दिव्यांगांविषयीच्या आपल्या जाणिवा वाढवणारा चित्रपट 'कोशीश

इमेज
चित्रपट हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. हे माध्यम जर खुबीने वापरले तर फार मोठा संदेश सहजतेने देता येतो. इतर ‌वेळी काय कटकट आहे, असे म्हणून संदेश  देणाऱ्याचे नावे बोट मोडण्याची वेळ  येण्याची शक्यता १०० टक्के आहे असे सदेश देखील समाजात मोठ्या प्रमाणात देण्याची ताकद या माध्यमात आहे.ती देखील अरे आपल्याला संदेश देण्यात आला आहे,याची विशेष वेगळी जाणीव न होता. मात्र इतकी प्रभावी ताकद असून देखील या माध्यमाचा सकारात्मकतेने वापर केले गेल्याची उदाहरणे फारच तूरळक आहेत‌. या तूरळक उदाहरणामध्ये नाव घ्यावेच लागेल असा चित्रपट म्हणजे कोशीश. १९७२ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी चित्रपट म्हणून कोशीश ओळखला जातो. त्याचे दिग्दर्शक गुलझार आहेत. या चित्रपटात जया बच्चन आणि संजीवकुमार यांनी साकरलेली  मूक-बधिर दांपत्याची भूमिका आपणास विचार करायला भागच पडते ‘कोशीश’ची कथा हरिचरण आणि आरती या दोघांच्या आयुष्याभोवती फिरते. बोलता व ऐकता न येणाऱ्या दोन व्यक्ती समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी कशी झुंज देतात, याचे हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात आहे. संव...

संवादाची नवी परीभाषा उलगडणारा चित्रपट 'पुष्पक'

इमेज
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे.मनुष्याला दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधायला आवडते. संवाद साधायला मनुष्य त्याला निसर्गाकडून मिळालेल्या अनोख्या अस्या स्वरयंत्रातून विविध आवाज काढतो. या आवाजातून भाषा तयार होते आणि मनुष्य या भाषेच्याद्वारे संवाद साधतो,असे समाजशास्त्रज्ञ नेहमी सांगतात. मात्र भाषाद्वारेच संवाद साधता येतो का, की भाषेशिवाय देखील अन्य संवादाची माध्यमे आहेत याचा अभ्यास करता समोर येणारे चित्र मोठे मनोरंजक आहे‌, आणि या मनोरंजक विश्वाची ओळख होते,ती बॉलिवूडमधील एक उत्तम अभिनेते असलेल्या कमल हसन यांनी १९८७ साली भुमिका केलेल्या 'पुष्पक' या चित्रपटामुळे. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सिंगीतम् श्रीनिवास राव, तर सिंगीतम् श्रीनिवास राव आणि श्रृंगार नागराज या दोघांनी मिळून त्याची निर्मिती केली होती. कमल हसन यांनी हिरोची तर हिरोईनच्या भुमिकेछ अमला अक्किनेनी होत्या. अन्य प्रमुख कलाकारांचा विचार करता रमेश, फरीदा जलाल, प्रताप पोतन, लोकनाथ, पी. एल. नारायण, रम्या  आदींनी यात भुमिका केल्या होत्या   बंगळूरूमध्ये चित्रीत झालेल्या या चित्रपटात एक देखील संवाद ना...

पुरुषांसाठी महिला किती आवश्यक आहे, हे स्पष्ट करणारे गाणे, 'इसलिये लडकिया, लडकोंसे...

इमेज
आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम गाणी आहेत. काही गाणी त्याला दिलेल्या संगीतामुळे उत्तम या प्रकारात मोडतात. काही गाणी ती ज्या पार्श्वभुमीवर चित्रीत झालेली आहेत, त्यामुळे काही गाणी छान वाटतात. तर काही गाणी त्यातून देण्यात आलेल्या संदेशामुळे सर्वोत्तम श्रेणीत मोडतात.या सर्वोत्तम श्रेणीत मोडणारे एक गाणे म्हणजे, २००४ मे मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम तूम' या चित्रपटातील एक गाणे‌. पुरुषांच्या आयुष्यातील महिलांचे महत्त्व अधोरेखित करणारे 'इसलिये लडकीया लडकोंसे नही होती,हे गाणे. जतीन -ललित या सुप्रसिद्ध जोडीने संगीतबद्ध केलेले आणि अलका यागनिक- शान यांनी आवाज दिलेले हे गाणे, चित्रीत झाले आहे, राणी मुखर्जी आणि सैफ अली खान वर. अभिनयाच्या क्षेत्रात महत्त्वाचा मानल्या गेलेल्या आवाजात दोष असून देखील त्यावर मात करत एकेकाळी बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून राखी मुखर्जी ओळखल्या जातात. त्यावर स्वतंत्र्यपणे लिहता येऊ शकते, मात्र तूर्तास इतकेच. सहा मिनीटे इतक्या मोठ्या कालावधीचे गाणे परदेशात चित्रीत झाले आहे‌. सुरवातीला सैफ महिला किती त्रासदायक आहेत‌. महिला प...

एक नजर त्यांचा कामावर

इमेज
मी काही महिन्यापुर्वी छावा हा चित्रपट  बघितला. चित्रपटातून आपणास अनेक अज्ञात बाबी समजतात.त्याबद्दल चित्रपट निर्मात्या रवी कौशीकचे मानावे तितके आभार कमीच आहे. त्याच्यामुळे मराठ्यांचा ज्वाजल इतिहास समस्त देशवासीयांच्या समोर आला.या चित्रपटाविषयी अनेकांनी भरभरुन लिहल्याने त्याविषयी मी काही जास्त बोलणार नाही.तितकी माझी पात्रता देखील नाही मला तूमचे लक्ष वेधून घेण्याचे आहे.कोणताही चित्रपट संपल्यावर चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यावर गुंतलेल्या व्यक्तींची जी यादी येते त्याकडे            माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणाऱ्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त्याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे                   त्यातील काही जणांना विविध पुर...

कोण बघतो कश्यासाठी चित्रपट

इमेज
कोण मेले कोणासाठी रक्त ओकुन ? " या पक्तींचे एक अजरामर मराठी  गाणे आहे त्याच धर्तीवर कोण बघतो कशासाठी चिञपट ?असे म्हणावे अशा किशा  नुकताच माझ्या मिञांचा कट्ट्यावर घडला    तर त्याचे असे झाले की कट्ट्यावर खुप दिवसात चिञपट बघीतला नसल्याने सर्व जण मिळून चिञपटाला जाण्याचे ठरले मग कोणता चिञपट बघायला जायचे यावर चर्चा सुरु झाली माझ्या एका मिञाने थोडा गंभीर विषयावर असणाऱ्या चिञपटाला जावू असे सुचवले यावर दुसरऱ्या एका मिञाने आपण आधीच समस्येने ञासलो असताना परत टेशंन वाढवणाऱ्या गोष्टी का करायचा अशा मुद्दा मांडला त्यापेक्षा गमतीदार विषयाचा चिञपट बघण्याला प्राधान्य देणे महत्ववाचे असल्याचे सांगीतले तुम्हाला काय वाटते ?  धर्तीवर    चिञपट कोणत्या कारणासाठी बघायचे फक्त निव्वळ करमणूकीसाठी की ज्ञानवर्धक करमणूकीसाठी ? या माध्यमाचा समाजावर प्रचंड प्रमाणात परीणाम होतो आणि या माध्यमावर बाजारपेठेचा प्रचंड प्रभाव असतो जी आपण कोणते चिञपट बघतो यावर अवलूंबन असते              फक्त निव्वळ करमणुक महत्ववाची की ज्ञानवर्धक करमणूक ...

सदैव चिरतरुण असणारा चित्रपट, 'सिंहासन'

इमेज
आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत मोठा आशय असलेले अनेक चित्रपट आहेत.दोघी, नितळ, देउळ, देउळबंद, दहावी फ, सामना ,सरकारनामा ही त्यातील काही मोजकी उदाहरणे. मराठी चित्रपटसृष्टीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर आधारीत चित्रपट दिले आहेत. पत्रकारीतेचा विचार करता  हार्ड  बीट समजल्या जाणाऱ्या राजकारणावर आधारीत चित्रपट मराठीत आहेत. सरकारनामा, सिंहासन ही त्यातील प्रमुख उदाहरण म्हणता येईल  सिंहासन हा चित्रपट तर समस्त भारतीय भाषेतील उत्कृष्ट  चित्रपट म्हणता येईल.16 नोव्हेंबर 1979 रोजी रसिकांसाठी खुला झालेला  या  चित्रपटाला 46 वर्ष पूर्ण होतील मात्र आजदेखील या चित्रपटाचे कथानक रटाळ कालबाह्य वाटत नाही . किंबहुना आज आपण बातम्यांमध्ये ज्या राजकारणाच्या बातम्या बघतो ,त्याचे नाट्य रूपांतरण वाटावे इतका सजीवपणा या चित्रपटात जाणवतो ,     हा चित्रपट त्याच्या पहिल्या दृश्यापासून प्रेक्षकांना खिळवून ठेवतो  सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुबई (त्यावेळचे  व्हिटोरीया टर्मिनस ) च्या परिसर त्याच्या पहिल्या दृश्यात दाखवला आहे जो सुरवातीला लॉंग  शॉर्ट  फोकस ...

कांदे पोहे

इमेज
कांदे पोहे, आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या अति परीचयातील पदार्थ. विवाह जूळवतांना  पुर्वी हमखास केला जाणारा पदार्थ. तर माझ्या सारख्या मुळच्या नाशिकमधील मात्र शिक्षण आणि नोकरीच्या निमित्त्याने पुण्यातील पेठांमध्ये बरेच काळ वास्तव्य केलेल्या व्यक्तींचा रोजच्या जगण्याची सुरवात करणारा पदार्थ. सहजतेने पाच मिनीटात तयार होणारा हा पदार्थ .सध्या बाजारात कांद्यांचे आणि शेगदाण्याचे भाव किती आहेत याचा बातम्या न बघता, बाजारात न जाता अत्यंत खराखुरा वृत्तांत सादर करणारा खाद्यपदार्थ म्हणजे कांदेपोहे. आपल्या चित्रपटसृष्टीत, साहित्य विश्वात कांदेपोहे हा मोठा विषय आहे.सनई चौघडे या मराठी चित्रपटात तर आयुष्य म्हणजे कढईतील करपलेले कांदेपोहे  असे सांगत, कांदे पोह्यांना आयुष्यातील भल्याबुऱ्या प्रसंगाशी जोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कधीही नाश्त्यासाठी मिळणारा पदार्थ म्हणजे कांदेपोहे.        तर गरमागरम कांदेपोहे आणि त्यावर  लिंबू पिळल्यावर असे कांदेपोहे खाणे हणजे रस्त्यावरचे स्वर्गसुख म्हणता येईल. मात्र काही कारणाने आपल्या महाराष्ट्रात सध्या या कांदा पोह्यांची वाट ल...

भारत म्यानमार मैत्रीचा सेतू आणि बॉलिवूड

इमेज
माझ्या जपान आणि बॉलिवूड यांच्यातील सहसंबंध दाखवणाऱ्या गाण्याविषयीच्या लेखानंतर अनेकांनी मला या सारखी अजून काही या सारखी गाणी असतील तर त्याविषयी तू लिहिलेले मला वाचायला आवडेल असे सांगितल्याने त्या विषयी सांगण्यासाठी प्रस्तुत लेखन .       मित्रांनो या प्रकारचे अजून एक गाणे भारताच्या स्वातंत्र्याच्या सुरवातीला चित्रीत करण्यात आले.1949 साली प्रदर्शित झालेल्या पतंगा या चित्रपटातील 'मेरे पिया गये हे रंगून, वहासे किया हे टेलिफोन' हे राजिंदर कृष्ण लिखित आणि सी रामचंद्र यांच्या संगिताने सजलेले हेच ते गाणे.शमशाद बेगम आणि सी रामचंद्र यांनी गायलेल्या या गाण्यातून नवरा बायको यांच्यातील अतूट प्रेम दाखवले गेले आहे.          सव्वा चार मिनीटांच्या कृष्णधवल गाण्यातूनच नव्हे तर पतंगा या चित्रपटातून त्यावेळच्या भारताच्या मित्र राष्ट्रांबाबत खुप माहिती मिळते‌.भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले तर म्यानमारला 4 जानेवारी 1948 ला स्वातंत्र्य मिळाले .दोन्ही देशातील राजकर्त्यांना ब्रिटीश राजवटीत लयास गेलेल्या आपल्या देशाला विकसीत करण्याचे आव्हान होते. स्वातंत्र्य म...

जपानी कार्य कुशलतेवर अचूक भाष्य करणारे बॉलीवूड मधील गाणे

इमेज
व्यवस्थापन क्षेत्रात जपान आणि जपानी तंत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. जपानी कारखन्यात तयार झालेल्या वस्तू कितीही काटेकोरपणे तपासणी केली तरी चूक सापडणार नाही या प्रमाणात अचूक झालेल्या असतात, असे सहजतेने म्हटले जाते. जपानने हा मान मोठ्या कष्टाने मिळवला आहे.,हे सांगायला कोणत्याही तज्ञ व्यक्तीची आवश्यकता नसावी.सातत्याने होणाऱ्या भुकंपाला सक्षमपणे तोंड देत दुसऱ्या महायुद्धानंतर शद्बश: राख झालेल्या देशाने ही गौरवास्पद कामगिरी केली आहे.        जपानची ही कामगिरी किती उच्च दर्जाची आहे,हे आपण 1955 साली आलेल्या श्री 420 या चित्रपटातील राज कपुर यांच्यावर चित्रीत झालेल्या 'मेरा जूता है जपानी....फिर भी दिल है हिंदुस्थानी या सव्वाचार मिनीटात आपण सहजतेने बघू शकतो.  या गाण्यातील अन्य वाक्यांचा संदर्भ घेतल्यास आपणास त्या वेळच्या भारताच्या परराष्ट्र धोरण आणि जागतिकीकरणाविषयी बोलता येवू शकते जसे पॅट इंग्लडची आणि टोपी रशियाची मात्र मन मात्र पुर्णत: भारतीय या प्रमाणे. मात्र ते आपण क्षणभर बाजुला ठेवून परत येवूया जपानवर.     चित्रपटाची पटकथा आणि इतर...

नात्यातील ढोंगीपणा उघड करणारे गाणे

इमेज
      आपल्या भारतातील चित्रपटांतील महत्तवाचा भाग म्हणजे त्यातील गाणी. जगात इतर भागातील चित्रपटांमध्ये गाणी शक्यतो आढळत नाही. भारतीय चित्रपटांत प्रामुख्याने आढळणाऱ्या या गाण्यातून मानवी जीवनाच्या सर्वच अंगाना स्पर्श केलेला आढळतो.  या गण्यातून ज्या प्रकारे मानवी आयुष्यातील रंजकता, सकारात्मक बाजू दाखवण्यात येते त्याचप्रमाणे मानवी आयुष्यातील दाहकता कटु सत्य मानवी आयुष्यातील वास्तविकता देखील तितक्याच प्रभावीपणे दाखवण्यात भारतीय चित्रपटातील गीते यशस्वी झालेली दिसतात.      याच मानवी आयुष्यातील कटू बाजू दाखवणारे एक प्रसिद्ध गाणे म्हणजे श्रेष्ठत्तम  बॉलीवूड चित्रपट निर्माते,दिग्दर्शक, अभिनेते  गुरुदत्त निर्मित  प्यासा या चित्रपटातील 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है!' हे गाणे .तसे बघायला गेलो तर प्यासी मधील सर्वच गाणी मानवी आयुष्यातील ऋणात्मक बाजू आपल्या समोर आणत असली तरी मला 'ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या हे' हे गाणे विशेष मनाला भावते.     मानवी नाते मुख्यत: स्वार्थावर अवलूंबन असतात.त्यात जिव्हाळा ममत्व ...

मानवी आयुष्यातील छंदाचे महत्त्व स्पष्ट करणारा चित्रपट,' जब वी मेट'

इमेज
चित्रपट हे मोठे सशक्त माध्यम आहे‌.मनोरंजनाबरोबर चित्रपटातून मोठा संदेश देता येतो, आणि तो देण्यात येतो देखील. निव्वळ टाईमपास फालतू प्रेमकथांचे चित्रपट म्हणून ज्या बॉलिवूडचा उल्लेख होतो ते देखील याला अपवाद नाहीये. बॉलिवूडच्या चित्रपटातून जीवनाविषयक अनेक बाबी आपणास समजतात. याच मालिकेतील  जीवनाबाबत मोठे शिक्षण देणारा एक उत्कृष्ट  चित्रपट म्हणून 25 ऑक्टोबर 2007 रोजी प्रदर्शित झालेला 'जब वी मेट' कडे बघता येईल.         स्वत:च्या निर्णयाची जवाबदारी स्वत:कडे  कोणत्या प्रकारे घेयची‌.ते निर्णय फसले  तरी त्याबाबत दुसऱ्याला  दोष न देता त्याही स्थितीत स्वतः अपयशाची  जबाबदारी घेत, त्याला हसत हसत सामोरे  कसे जायचे.आयुष्यात छंदाचे महत्त्व काय असते? हे महत्त्वाचे संदेश या चित्रपटातून देण्यात आले आहेत.       मनुष्य त्याच्या रोजच्या जगण्यात कितीही व्यस्त असला तरी मनुष्याने त्याच्या छंदासाठी काही वेळ काढला पाहिजे.छंदामुळे वेळ वाया जात नाही, तर व्यक्तीस रोजच्या जगण्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विशेष बळ मि...

डिजीटल कचराय् नम:

इमेज
सध्याचा अति जलद दळणवळणाचा काळात, आपल्याकडे एका विशिष्ठ प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत असतो.कचरा आणि दळणवळण ,चमकलात ना? कचराचा आणि दळणवळणाचा काय संबंध ,आपण काहीतरीच वाचत नाही ना, असे आपणास वाटू शकते.तर सांगतो हा आहे डिजीटल कचरा.आपल्या मोबाईल मेमरीतील नको असणारे मात्र डिलीट न केलेले व्हिडीओ, फोटो, व्हाटसप सारख्या सोशल मिडीयाचा वरील बऱ्याच दिवसात न उघडलेले ग्रुप यातून हा कचरा निर्माण होतो. हे सर्व निर्माण होण्यासाठी प्रगत दळणवळ मोठी सहाय्यक भूमिका बजावते हे आपण जाणताच.या प्रगत दळणवळणामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात काढण्यात आलेला व्हिडिओ किंवा फोटो क्षणार्धात आपल्या मोबाईल मेमरीचा भाग होतो.आणि डिजीटल कचऱ्याच्या निर्मितीस भाग होतो.त्याचप्रमाणे सोशल मिडीयातील गेल्या कित्येक दिवसात न उघडलेले विविध ग्रुप देखील डिजिटल कचऱ्याच्या निर्मितीत मोठा हातभार लावतात.जरी ठराविक कालावधीनंतर मेसेज डिलीट करण्याची सोय असली तरी तूम्ही disapring हे फिचर्स वापरल्याने हा मेसेज डिलीट झाला आहे हे दाखवत त्या मेसेजची आठवण आपणास करत हे मेसेज डिजीटल  कचऱ्याची निर्मिती करत आपला फोन विनाकारण हळू करतात ...

सांगा कसं जगायचं ?

इमेज
आपल्या मराठीत उत्तमोत्तम कवितांची मोठी परंपरा आहे.फक्त मनोरंजन करणाऱ्याच नव्हे तर जीवनाचे सार मांडणाऱ्या कविता आपल्या मराठीत आढळतात.याच सर्वोत्तकृष्ट कवितेत समाविष्ट होणारी कविता म्हणजे ज्येष्ठ कवि मंगेश पाडगावकर यांनी लिहलेली कविता  'सांगा जगायच कसं, कण्हत कण्हत की गाणे म्हणत' ही पावणेतीन मिनीटात पुर्णत: गावू शकणारी कविता. मंगेश पाडगावकरांनी जेमतेम पावणेतीन मिनीटात जगण्याचे तत्त्वज्ञान या कवितेत मांडले आहे‌. ऐकणाऱ्याला पुर्णत: सकारात्मता शिकणारी कविता प्रत्येकाने मुखोग्गद करून, जेव्हा जेव्हा त्याच्यावर अडचणी येतील, तेव्हा ती म्हटल्यास आत्महत्या नक्कीच टळतील.नैराश्यावरचे रामबाण औषध म्हणून या कवितेकडे बघता येवू शकते.        हे सांगायचे कारण व्यवसायाने मुख्याध्यापक असलेल्या, ज्यांचे पती वन खात्यात उच्चपदस्थ आहेत अस्या जळगाव शहरातील एक भगिनी.ज्यांचे कर्करोगाने नुकतेच दुर्देवी निधन झाले आहे. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या सोशल मिडीयात विशेष चर्चित आलेली पोस्ट.स्वत:चा मृत्यू समोर दिसत असताना , लोकांना लिहिलेली ती पोस्ट हाच सक...

एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

इमेज
           जून महिन्याचे समान १० / १० दिवसाचे तीन भाग केले  तर जो दुसरा भाग होईल त्याचे पहिले  तीन दिवस अर्थात ११ जून , १२ जून आणि १३  जून मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे. ११ जून ही मोठ्या प्रमाणात  बालसाहित्य  तयार करणारे साहित्यिक साने गुरुजी  यांची पुण्यतिथी , १२ जून म्हणजे मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांची पुण्यतिथी तर १३ जून ही श्रेष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांची पुण्यतिथी .या तिन्ही साहित्यिकांची लेखनाची काही गुणवैशिष्टये होती साने गुरुजींच्या विषयी मी कालच लिहले होते आज मी बोलणार आहे पु . ल देशपांडे यांच्याविषयी .          सर्वप्रथम त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली पु.ल. म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात. मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली नाही, तर तीन व्याख्याने, गांधीजी आदी गंभीर लेखन सुद्धा केले आहे. ज्यात त्यांनी अनेक...

मराठवाड्यातील एक दिवस

इमेज
   मी पुण्यात असताना, दर शनिवारी सायंकाळी एसटी बसने फिरायला जात असे .शनिवारी आँफिस सुटले की मी घरी न जाता बसस्टँडवर जात असे. तेथून बस पकडून दुसऱ्या गावात जावून रविवारी सायंकाळी चार पाचपर्यत त्या गावात फिरुन पुन्हा पुण्यात येत असे, आणि सोमवारी पुन्हा आँफिसमध्ये रुजु होत असे.त्यावेळी मी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे  या जिल्ह्यात भरपूर भटकलो.मात्र पुणे सुटले, आणि यात बराच खंड पडला ,मात्र सध्या कोव्हिड 19संपल्याने आणि माझ्या प्रवाश्याचे प्रमुख साधन असलेली एसटी पुन्हा जोमाने सुरु झाल्याने  मी आता या फिरण्याचा पुन्हा प्रारंभ करत आहे.ज्याची सुरवात मी 15 मे रोजी जालना जिल्ह्याला भेट देवून केली.     मी जालना या ठिकाणची  फिरण्याचे ठिकाण  म्हणून निवड    नविन जाणून घेण्याची उत्सुकता तसेच जाण्यायेण्याचा वेळ ,आणि एकुण वेळेची उपलब्धता या निकषांवर केली.माझ्या  होम टाउन असलेल्या नाशिकचा.विचार करता मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या औरंगाबाद या जिल्ह्यातील भद्रा मारुती, पैठण, अजिंठा वेरुळ, घुष्णेश्वर ,बिबिका मकबरा आदी स्थाने या आधी बघीतल्य...

एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

इमेज
    8 नोव्हेंबर ही तारीख एका महान मराठी साहित्यीकाची जयंती, म्हणून मराठी सारस्वतात परीचित आहे. पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे हे त्या साहित्यकाचे नाव. त्यामुळे मराठी साहित्यांवर प्रेम करणाऱ्या सर्व सारस्वतांना मनःपुर्वक शुभेच्छा .      पु.ल. म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात. मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली नाही, तर तीन व्याख्याने, गांधीजी आदी गंभीर लेखन सुद्धा केले आहे. ज्यात त्यांनी अनेक राजकीय , सामाजिक प्रश्नावर ठोस भुमिका घेतली आहे. मात्र पु. ल. आणि आपल्या सर्वांच्या दुर्देवाने पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी साहित्याला जितकी अमाप प्रसिद्धी लोकप्रियता मिळाली, तितकी समाजमान्यता या लेखनास मिळाली नाही. समाजाने त्यांना कायम विनोदी लेखनाच्या कप्यातच बंदिस्त केले. त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या दोन चित्रपटांमध्येही त्यांवर फारसे भाष्य करण्यात आलेले नाही, असे माझे निरीक्षण आहे, असो       पु. ल. देशपांडे यांच्या विनोदावर शहरी सुशिक्षीत वर्गाला आवडतील, अस्या ...

भाउबीज विशेष

इमेज
  आज दिवाळीचा शेवटचा दिवस अर्थात भाउबीज , भाउ आणि बहीणीचा नात्याचा हा दिवस आजच्या दिवशी पुरुषाने आपल्या पत्नीचा हातचे न खाता,आपल्या बहीणीचा हातचे खाणे शुभ मानले जाते.आजच्या दिवशी यमुना नदीने आपला भाउ यम यास ओवाळले होते . त्यामुळे प्रसन्न होवून आजच्या दिवशी जी स्त्री आपल्या भावाला ओवाळेल, त्या दोघांना दिर्घायू मिळेल, असा आशिर्वाद दिला .ज्यामुळे याला यमद्वितीया असे देखील म्हणतात.               कायस्थ समाजबांधव   या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठ...