पोस्ट्स

फेब्रुवारी १६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला

इमेज
            छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच   सर्व महाराष्ट्रयीन व्यक्तींची    छाती    गर्वाने फुलूनयेते   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्य सर्वाना मनःपूर्वक खूप खूप   शुभेच्छा            तेराव्या शतकात यादवी साम्राज्य लयास गेल्यावर सुमारे साडेतीनशे वर्ष स्वतःचे सत्व विसरलेल्या समाजास गतवैभवाची आठवण त्यांनी करुन दिली . त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत , मध्ययुगीन भारतीय ईतीहासातील आरमार उभारणारा एकमेव राज्यकर्ता हा बहुमान देखील मिळवला . राजेंखेरीज समुद्रापर्यत आपले राज्य नेणारे काही राज्यकर्ते आपणास मध्ययुगात सापडतात . मात्र आरमार उभारले ते छत्रपती शिवाजी   महाराजांनी . अजमल कसाब आणि मार्च 1993 च्या स्फोटामुळे समुद्राचा धोका आपणास लक्षात आलाच आहे .   भविष्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी होती . छञपती शिवाजी महाराजांनी हे टोपीवाले दिसतात तेव्हढे साधे नाहीत त्यांचापासून जपून राहिले पाहिजे , असे इंग्रजांबाबत मत व्यक्त केले होते . आणि या पुढील काळात हल्ले समुद्रामार्गे होतील तिही स