पोस्ट्स

ऑगस्ट १६, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

युगांन्त अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

इमेज
2018 सालच्या आँगस्ट महिन्याची 16 तारीख भारतीय राजकारणात ठळकपणे नोंदवली गेलीये .या दिवशी भारतीय राजकारणात एका युगाचा अंत झालायं . माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा निधनाने भारतीय राजकारणाची कधीही भरुन न येणारी हानी झालीयं. भारतीय राजकारणातले अजातशत्रू म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच नाव घ्यावच लागेल.1978 साली जनता पार्टीच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत असणारे अटलजी पुढे तीनदा देशाचे पंतप्रधान झाले . कवीमनचा या पंतप्रधानाने ही भुमीका अत्यंत चोख बजावरली. सध्या पंतप्रधानपदी आरुढ असणाऱ्या तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना अर्थात नरेद्र मोदी यांना गुजरातच्या दंगलीबाबत खडे बोल यांनीच सुनावले होते. पाकीस्तानशी लाहोर करार , कारगील युध्द , संसदेवर हल्ला , आय सी 814 या विमानाचे अपहरण, पोखरणचा अणूस्फोट याकाही  त्यांच्या  कार्ळयकाळातील प्रमुख घटना . भाजपाची वाटचाल दोन खासदारापासून सत्ता स्थापनेपर्यत झाली यात त्यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे . युनाटेड नेशनमध्ये त्यांनी हिंदीत केलेले भाषण गाजले.त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचीच एक कविता  ठन गई! मौत से ठन गई