माझे आवडते गाणे !
आनंद या चित्रपटातील गाण्याविषयीच्या माझा पोस्टवर प्रतिक्रिया देताना एकाने मला तूझ्या आवडत्या गाण्याविषयी वाचायला आवडेल. असी प्रतिक्रिया दिल्याने माझ्या आवडत्या गाण्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन. तर माझे आवडते गाणे आहे, जब वी मेट या चित्रपटातील " तूमसे ही" हे गाणे. मोहित चौहान यांच्या आवाजात रेकाँर्ड केलेले , आणि प्रितम यांनी संगीतबद्ध केलेले गाणे. ज्या गीताची रचना इर्शाद कामील यांनी केली होती. युवा उद्योजक आदित्य कश्यप यांनी नैराश्यातून बाहेर पडत उद्योगाची घडी पुन्हा नव्याने बसवताना गायलेले हे गाणे. सर्व प्रकारच्या व्यस्ततेतून मोकळा वेळ काढत आपल्या छंदाला मोकळा वेळ देत गायलेले गाणे. म्हणजे हे गीत . या गीतानंतर चित्रपट संपुर्ण 180% फिरतो. आतापर्यत नैराश्यामुळे सर्वकाही सोडून विनम्सक अवस्थेत फिरत, प्रसंगी आत्महत्येचा प्रयत्न केलेला युवा उद्योजक स्वतःच्या आयुष्यात नव्याने रंग भरतो, आपल्या अडचणी सोडवण्याचा नव्याने पुर्णतः उत्साहात प्रयत्न करायला लागतो. ज्यात त्याला यशही मिळायला लागते आधीच्या स्थितीपेक्षा त्याची स्थिती खुपच सुधारते.आतापर्यत अपयशी समजला जाणारा युवा उद्योजक आदित्य