पोस्ट्स

नाशिकशी संबंधित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पुर्णत: आपल्या मातीतील पर्यावरणपुरक गणेशोत्सव

इमेज
निसर्गावर, पर्यावरणावर मानवाने केलेल्या   अत्याचाराची किंमत मानवाने दामदुप्पट सहन करून भोगलेली आहे हे आपण नेहमीच बघितले आहे या चुकांमधून शहाणे होत मानवाने प्रामुख्याने आपल्या आनंदासाठी साजरे करण्यात येणारे सण उत्सवावासाठी पर्यावरणाचा विचार करत आपल्या वर्तणुकीत सुद्धा बदल केल्याचे आपणस दिसते . पूर्वी गणेशोत्सवासाठी सहज दिसणाऱ्या  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्तींची निर्मिती हा अश्याच एक पर्यावरणपूरक बदल मात्र आपल्या महाराष्ट्राच्या पर्यावरणाच्या विचार करता शाडूची माती देखील पूर्णतः पर्यावरणपूरक नाही . शाडूची माती प्रामुख्याने राजस्थान या राज्यात आढळते .तेथील जैविक साखळी या मातीला पूरक आहे मात्र आपल्या महाराष्ट्रातील जैविक साखळी राजस्थानपेक्षा पूर्णतः वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रातील हवामान सुद्धा राजस्थानपेक्षा वेगळे आहे त्यामुळे होत काय ? तर शाडू माती आपल्या महाराष्ट्रात आढळत नाही आपल्याकडील वनस्पती या मातीत ती माती असली तरी उगवू शकत नाही . आपल्याकडील उंदीर घुशी सारखे जमिनीत बिले करून राहणारे जीव या मातीत जिवंत राहू शकत ना...

नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"

इमेज
नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक ‌. तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला  कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत ...

सकारात्मक पत्रकारितेचे उत्कृष्ट उदाहरण, "पोलादी माणसं, नाशिक जिल्हा भाग १"

इमेज
               सध्याचा काळात सातत्याने पत्रकारिता  नकारात्मकतेचा प्रचार प्रसार करते,आरोप करण्यात येतो. आजच्या माध्यमातील बातम्या बघितल्यस त्यात सातत्याने खुन,दरोडा , गुन्हेगारी, बलात्कार,आदी विषयक बातम्या दिसत असल्याने हा आरोप खरा आहे,असे पटायला लागते.मात्र सर्वच माध्यमे तसीच आहेत, असे सर्वसाम्यनीकरण करणे अयोग्य आहे. जरी संख्येने कमी असले तरी काही पत्रकार सकारात्मक पत्रकारीता करत समाजात आपले एक चांगले स्थान निर्माण करत आहेत.ज्येष्ठ पत्रकार दत्ता जोशी हे अस्या मोजक्या पत्रकारांपैकीच एक. समाजात आदर्श घ्यावा अस्या उद्योगपतींचे कार्य ते जिल्हावार पुस्तक रुपाने प्रसिद्ध करत आहेत.त्यांची  सोलापूर, हिंगोली,बीड, अकोला वाशीम,अहमदनगर अस्या वीस जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणारी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.याच मालिकेतील नाशिक जिल्ह्यातील आदर्श उद्योजकांची ओळख करुन देणाऱ्या २भागांच्या  पुस्तकांपैकी पहिल्या भागाचे पुस्तक मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत  वाचले.             ...

प्रत्येक पत्रकारांच्या संग्रही असावे असे पुस्तक.., "नाशिक जिल्ह्यातील संसद सदस्य"

इमेज
     आपल्याकडे माध्यमांच्या अर्थकारणाच्या बाजू सांगताना, या चार क्षेत्राच्या बातम्यांना नेहमीच प्रेक्षकवर्ग मिळतो. सातत्याने प्रेक्षकवर्ग असल्याने,  जाहिरातीदार नेहमीच या क्षेत्राची बातमी देणाऱ्या माध्यमांकडे जाहिराती देतात.जाहिराती या माध्यमांचा अर्थकारणाचा महत्त्वाचा स्त्रोत असल्याने, माध्यमे या क्षैत्राची बातमी देण्यास प्राधान्य देतात,असे सांगितले जाते.त्यातील एक म्हणजे राजकारण (अन्य तीन म्हणजे क्रिकेट, सिनेमा, क्राइम {याला यांच्या  सुरवातीच्या अक्षरावरून "थ्री सी वन पी" असे म्हणतात}).तर या राजकारणाचा ठळक आविष्कार म्हणजे खासदार .त्यामुळे कोणत्याही पत्रकारास पत्रकारीता करायची झाल्यास आपल्या क्षेत्रातील विद्यमान खासदार आणि माजी खासदारांची किमान माहिती असणे आवश्यक ठरते.याची माहिती सहजतेने मिळत नसल्याने, कोणत्याही पत्रकारास  सुरवातीच्या काळात अनेक कष्ट घ्यावे लागतात. मात्र नाशिक परिसरातील पत्रकारांची यातुन मोठ्या प्रमाणात सुटका झाली आहे.याला कारण ठरले आहे, डांग सेवा मंडळाच्या अभोणा येथील महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणाऱ्या डॉ .प्रा...

नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ?

इमेज
          नाशिककर होणार बुद्धिबळातील विश्वविजेता ? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे नाशिकचे रहिवासी असलेल्या ग्रँडमास्टर यांनी इंग्लंडमधील आइल् ऑफ मॅन या शहरात खेळविण्यात आलेल्या ग्रँड स्विस या महत्त्वाच्या स्पर्धेत मिळवलेले अभिनंदनास्पद यश होय  पाचवेळच्या विश्वेकविजेता मॅग्नम कार्लसन आणि २०२२ चा विश्वविजेता डिंग लिरेन सह आणखी दोन खेळाडू वगळता जगातील सर्व अव्वल खेळाडू या स्पर्धेत उतरले होते अश्या मात्तबर खेळाडूंना नमवत विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे   यातील विजेता आणि उपविजेता हे हे जातात सर्वात उत्कृष्ट असणाऱ्या  अशा आठ खेळाडूंसाठीच राखीव  असलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पात्र होतात आणि कॅंडिडेट्स मधील विजेता २०२२ च्या विश्वविजेत्या बरोबर ( म्हणजे चीन च्या लिंग डिरेन बरोबर )आगामी विश्वविजेतेपदासठी दोन हात करील. त्यामुळे नाशिककर असणाऱ्या ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांची विश्वविजेता होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये . आणि  तो  देखील  हे विश्वीजेता होण्याच्या मार्ग ज्या स्पर्धेतू...

नाशिकरांसाठी गौरवास्पद क्षण

इमेज
         २३ सप्टेंबर पासून  ८ ऑक्टोबर पर्यतचा कालावधी नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण नाशिकचे भूमिपुत्र  असणारे तरुणाईचे आयकॉन विदित गुजराथी हे चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आशियाई स्पर्धेत बुद्धिबळ या खेळात भारताच्या पुरुष संघाचे कप्तान असणार आहेत एका नाशिककारास भारताचे नेतृत्व करायची संधी मिळणे ते देखील एशियाड सारख्या महत्वाच्या स्पर्धेत ही समस्त नाशिककरांना अभिनंदनास्पद बाबच म्हणावी लागेल              ही  बुद्धिबळ स्पर्धा जलद (रॅपिड ) प्रकारात खेळवली जाणार आहे फिडे वर्ल्ड कपमध्ये केलेल्या प्रदर्शनामुळे सर्व भारताला माहिती झालेल्या आर प्रग्ण्यांनंद, यांच्यासह डी गुकेश ,पेंटला हरिकृष्ण, अर्जुन एरिगैसी हे सर्व विदित गुजराथी नेतृत्वात खेळतील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेतील अंत्यंत उत्कृष्ट कामगिरीमुळे या स्पर्धेत सर्वांच्या नजरा या भारतीय पुरुष संघाकडे लागलेल्या असतील महिला संघाचे प्रतिनिधित्व एशियाड या स्पर्धेत वैयक्तिकरित्या सुवर्णपदक मिळवलेल्या आणि महिला संघालासुवर्णपदक मिळून देण्यात मोलाची भूमि...

नाशिककरांसाठी सुवर्णक्षराने नोंदवायचा क्षण 

इमेज
    मंगळवार २१ फेरबुवारीची सायंकाळ नाशिकरांसाठी सुवर्णाक्षराने नोंदवून ठेवावी अशीच ठरली , कारण नाशिकचे भूमिपुत्र जागतिक क्रमवारीत १९ व्या स्थानी आणि भारतीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणारे सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांनी विद्यमान विश्वविजेतेपदास पाचवेळा विश्वविजेते असणाऱ्या मॅग्नस कार्लसन याना पराभवावाचे पाणी पाजण्याचा भीम पराक्रम घटना यावेळी घडली . प्रो चेस टूर्नामेंट या १६ संघाच्या सामावेश असणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान इंडिया योगीज्   या संघाकडून खेळताना त्यांनी हा पराक्रम केला  मॅग्नस कार्लसन  Canada Chessbrahs या संघाकडून खेळत होते  काळ्या मोहऱ्या घेऊन विदित गुजराथी यांनी हे यश मिळवले आहे बुद्धिबळ खेळामध्ये पांढरे मोहरे घेऊन खेळणारा खेळाडू प्रथम चाल करत असल्याने खेळामध्ये प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणे पांढऱ्यास काहीसे सोपे असते काळे मोहरे घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला पांढऱ्याचे आक्रमण परतवून पांढऱ्यावर प्रति आक्रमण करावे लागते ही बाब लक्षात घेता विदित गुजराथी यांनी मिळवलेल्या विजयाचे महत्व लक्षात येते     या डावद...

मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर

इमेज
       आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी व्यक्तिमत्वांची   जर आपण यादी केली   तर ज्यांचे नाव आपणास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर . कोणत्याही धार्मिक पूजेच्या वेळी अग्रक्रमाने पुजल्या जाणाऱ्या   गणपतीचे नाव घेऊन जन्माला आलेल्या नाशिकच्या या सुपुत्राने आपल्या प्रखर ज्वाज्वल्य देशभक्तीने देशभक्तीच्या एक मापदंडच आपल्या कृतीतून घालून दिला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त देशभक्तीचा मापदंडच आखून दिला असे नाही . तर समस्त पृथ्वीवर फक्त मानवास लाभलेल्या बुद्धी या शास्त्राचा वापर करत मानवाचे नीतिनियम   निश्चित करणाऱ्या धर्माची चिकित्सा करून त्यास कालसुसंगत कसे करावे ?   याचा वस्तुपाठ देखील त्यांनी घालून दिला .   महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात.त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही,महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे   अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 19...

दादासाहेब फाळके ऋषितुल्य व्यक्तिमत्व

इमेज
                16 फेब्रुवारी 1946 ही फक्त एक तारीख नाहीये . आज कोट्यावधीचा व्यवसाय बनलेल्या बाँलीवूडचा जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या निधनाची तारीख आहे ही . मी हा लेख लिहीत असताना 2023या वर्षी  गोष्टीला 77वर्षे पुर्ण होउन 78वे वर्ष  सुरु झाले आहे . या 78वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . मला त्यात पडायचे नाही , त्यात पडण्याची माझी बौद्धीक क्षमता देखील नाही . मला तूमचे लक्ष वेधायचे आहे . आपण महाराष्ट्रीयन हा वारसा कोणत्या प्रकारे जतन करतोय या कडे .  मराठीतील एक अजरामर लेखक श्री . पु. ल देशपांडे यांच्या अपुर्वाई या प्रवासवर्णनात  400 वर्ष जून्या असणाऱ्या शेक्सप्रिययरच्या घराचे जतन केल्याचा उल्लेख आहे . त्या तूलनेत आपला कालावधी फारसा नाही . मात्र आपण दादासाहेब फाळके यांचा कोणता वारसा जतन केला आहे ?असा विचार करता समोर येणारे चित्र फारसे समाधानकारक नाही .आजमितीस त्यांच्या कोणीही वंशज चित्रपटश्रुष्टीत कार्यरत  नाही म्हणून त्यांचे योगदानाची फारशी दखल घेण्यात येत नाही फक्त दादासाहेब फाळके  पुरस्काराच्या वेळीच...

६ महिने झाले राष्ट्रीय महामार्ग बंद

इमेज
      १२ जुलै २०२२ ही फक्त एक  तारीख नाहीये . आपल्या महाराष्ट्रातील एक राष्ट्रीय महामार्ग बंद होण्याची ती तारीख आहे आज या घटनेला ६ महिने होत आले आहेत मात्र अद्याप हा महामार्ग बंदच आहे . नाशिकहून दिंडोरी सापुतारा मार्गे सुरतला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८  हाच तो राष्ट्रीय महामार्ग . सापुताऱ्याजवळ असणाऱ्या घाटात दरड कोसळून हा महामार्ग बंद झाला . महामार्ग बंद झाल्यावर त्या दिवशी माध्यमामध्ये याविषयी बातम्या आल्या त्यानंतर मात्र प्रस्थापित माध्यमांना बातमीविषयी अनेक महत्वाचे विषय असल्याने या विषयी त्यांनी मौनच बाळगले . फक्त दहा किलोमीटरसाठी ग्रामस्थांना मारावा लागतोय सत्तर किमीचा फेरा या सारख्या सनसनाटी मथळ्याचा बातम्याही त्यांनी दिल्या नाहीत . न जाणो या भागातील लोकांनीही आम्हाला गुजरातमध्ये जायचे आहे अशी मागणी केली तर काय करायचे ? त्यापेक्षा त्याचा संपर्क ठेवणारा राष्ट्रीय महामार्ग बंद असलेलाच बरा असा उदात्त विचार त्या मागे असेल कदाचित     मात्र हा राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने नाशिकहून सुरतला जायला दिं...

एका नाशिकरामुळे भारत जागतिक स्तरावर तरुण जातो तेव्हा

इमेज
              १९६२ च्या युद्धाच्यावेळी पराभवानंतर   महाराष्ट्रीयन यंशवंतराव   चव्हाण यांनी भारताच्या सरंक्षण मंत्री पदाची सूत्रे हाती घेतली होती . त्यावेळी अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाच्या सरंक्षण खात्याला नवसंजीवनी दिली त्यांच्या या मदतीचे वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे करण्यात येते यशंवतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीतीत्व लोकसभेत केले होते आज या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत आज २०२२ साली ६० वर्षानंतर पुन्हा एकदा एका नाशिकराने देशाला एका कठीण स्थितीतून बाहेर काढले आहे . या नाशिकराचे नाव आहे नाशिकचे भूषण तरुणाचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी त्यांनी फिडे केस चॅम्पियनशिपमध्ये भारताला स्पर्धेतील आव्हान टिकण्यासासाठी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवणे आवश्यक असताना विदित गुजराथी यांनी अमेरिकेच्या नीमन हंस मोके यांच्यावर काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना विजय मिळवत संघाला उपउ...