पोस्ट्स

ऑक्टोबर ३१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन बंडखोर कवियत्रीला

इमेज
ती काळाचा पुढे बघणारी आधूनिक स्त्री होती, ती ज्ञानपीठविजेती कवियत्री आहे. ती हिंदी , पंजाबी भाषेतील ख्यातनाम कवियत्री आहे. फाळणीपुर्व पंजाबात सध्या पाकिस्तानात असणाऱ्या पंजाबात तीचा जन्म झाला होता , तारुण्याचा अवखळपणात तीला अनेक हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले. सासरच्या मंडळींकडुन प्रचंड अत्याचार सहन करावे लागले, मात्र यातूनच तीची कविता समृद्ध होत गेली.ज्या काळात एखाद्या स्त्रीने विवाहाच्या बंधनात न अडकता परपुरुषाबरोबर राहण्याची कल्पना करणे कोणाच्या मनात येणार नाही, अस्या काळात आपल्यापेक्षा मोठ्या पुरुषाबरोबर लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहिली ती. मी बोलत आहे, हिंदीतील ख्यातनाम कवियत्री ज्ञानपीठ विजेत्या अमृता प्रीतम यांच्याविषयी. 31 आँक्टोबर हा आपल्या भारतातील दोन वेगवेगळ्या क्षेत्रात दिग्गज महिलांचा स्मृती दिन .असतो एक महिला म्हणजे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्यांनी संस्थानिकांचे तनखे रद्द करणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण, आँपरेशन ब्लु स्टार, आँपरेशन मुक्तीवाहिनी असे अनेक धाडसी निर्णय घेतले, त्या इंदिरा गांधी होय, आणि दुसऱ्या म्हणजे कवीयत्री अमृता प्रीतम होय .31आँक्टोबर 2005रोजी त्यां