पोस्ट्स

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ११(पर्यटन म्हणजे नक्की काय )

इमेज
मी, सध्या माझ्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मी ज्या शहरात राहतोय, त्या पुणे शहरातील विविध भागांना भेटी देतोय, हे एव्हाना आपणास माहिती असेलच. त्याच संदर्भात माझ्या एका मित्राशी बोलताना, हे काय पर्यटन म्हणायचे? पर्यटन म्हणजे दुसऱ्या देशात फिरायला जाणे. ते जमले नाही तर दुसऱ्या राज्यात जाणे.तेही जमेल नाही तर भलेही आपल्याच राज्यात असे ना, दुसऱ्या शहरात जाणे होय.आपण ज्या शहरात राहतो.त्याच शहराच्या वेगवेगळ्या भागांना भेटी देणे म्हणजे पर्यटन म्हणायचे का ?  हा मुद्दा निघाला.मुद्दा निघाला खरा मात्र काही कारणाने त्यावर चर्चा काही आमच्यात रंगू शकली नाही.जरी आमच्यात चर्चा रंगू शकली नसली तरी माझ्या मनात विचारचक्र मात्र सुरू झाले.तेच तूमच्यापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन. तर प्रत्येक शहराचे नव्हे तर शहरातील प्रत्येक भागाचे एक स्वतंत्र्य वैशिष्ठ असते. आपण ज्या शहरात राहतो.त्या शहराचे सर्वसाधरण वैशिष्ठ  आपणास माहिती असते.मात्र आपल्या शहरातीलच मात्र आपण फारसे न गेलेल्या भागाचे वैशिष्ट आपणास माहिती असेलच असे नाही‌.उदाहरणार्थ आपण पुणे शहरातील गणेश पेठ, रविवार पेठ याला एक भ...

समस्या सारखीच फक्त माध्यमात बदल

इमेज
कालच मला व्हाट्सअप वर एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये आजची तरुण पिढी  झेन झी ही इंटरनेटच्या आहारी गेल्यामुळे कसे देशाचे वाटोळे होत आहे, यावर साधरणत:सत्तरीच्या वयाचे आजोबा चिंता करत होते. तो व्हिडीओ बघत असताना, मला का जाणे कुणास ठाउक, माझ्या नाशिकच्या कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवायला लागल्या. 'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी । करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥' कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध 'स्वातंत्र्य देवतीची विनवणी' या कवितेतील या ओळी व्हिडीओशी देखील मेळ खात होत्या. आजोबा तरुणाईच्या व्यसनाविषयी बोलत होते, आणि कवीवर्य कुसुमाग्रज देखील आजपासून २९ वर्षापुर्वी याच तरुणाईला वेळ वाया घालण्यापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्न करत होते.तशी ती संपूर्ण कविताच विचार करण्यासारखी आहे.गेल्या ३०वर्षात परिस्थिती किती सुधारली (किंबहुना बिघडली)याचा विचार करणारा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.मात्र तूर्तास आपण तो विषय बाजुला ठेवूया.असो तर कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या वेळच्या निरर्थक गोष्ट्रीत तरुणाईने वेळ वाया घालवू नये.तरुणाईने करमणूकीला कमी म...

आपल्या शरीरातील बहुमोल ईश्वरी देणगीची माहिती देणारे पुस्तक 'रक्त'

इमेज
  अरे,तो माझा रक्ताचा नातेवाईक आहे,तरी असा कसा काय वागला ? लोक सध्या रक्ताची नाती देखील विसरत चालली आहेत. रक्ताच्या नात्यातील माणसे एकवेळ दगा देतील मात्र आमची माणसे नाहीत.रक्तातील माणसांसारखीच काळजी आमच्या येथे घेतली जाते .या प्रकारची अनेक वाक्ये आपण अनेकदा ऐकतो, बोलतो .हिंदी चित्रपटाचा विचार करता, मै तुम्हारा खून पी जाऊंगा हा एकेकाळचा सुप्रसिद्ध डायलॉग . त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचा विचार करता त्या राक्षसांच्या प्रत्येक थेंबापासून नवीन दैत्य जन्मला येत असल्याचा कथा आहेत .इतिहासात रक्त सांडून लढाई जिंकल्याचे अनेक दाखले देण्यात येतात . रक्ताचे पाणी होणे. या सारख्या अनेक म्हणी वाक्यप्रचार आपल्या मराठीत आहेत  जास्त रक्तस्त्राव होऊन रुग्णाचा मृत्यू या बातम्या देखील आपल्या परिचयाचा आहेत .तर असा आपल्या शरीरातील महत्वाचा घटक जो आपल्या संस्कृतीशी देखील जोडला गेला आहे तो घटक म्हणजे रक्त. इतके असून देखील या घटकांविषयी आपल्या मराठीत शास्त्रीय दृष्ट्या अचूक माहिती देणाऱ्या पुस्तकाचा मात्र अभाव होता .  मात्र मराठीत ज्या विषयावर   माहितीचा अभाव तिथे अच्युत गोडबोले हजर  ...

शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ...

इमेज
  पुणे शहरात  दोन वर्षापूर्वी झालेल्या, 'बडे बाप कि बिगडी हुवी संतान' या वर्गवारीत सहज मॉडेल अश्या पर्सो कार  दुर्घटनेत अटकेत असेलेल्या वडिलांना जमीन मिळाल्यावर झालेल्या जल्लोष्याचे  फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली अनेकांनी सोशल मीडियावर त्याबाबत तीव्र नापसंती दर्शवली. .मात्र हे करताना हे नागरिक  हे विसरले की,याच प्रकारची घटना पुणे शहरात सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वी  घडली होती. त्यावेळी कटाची संपूर्ण माहिती पोलिसाना दिल्यामुळे पोलिसांनी ज्यास शिक्षेतून सूट दिली त्या आरोपीची देखील कुटुंबियांनी  याच प्रकारची भव्य मिरवणूक काढली होती .जणू त्यांनी निष्पाप पुणेकरांना नव्हे तर पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घेतले होते . त्यामुळे माझ्या मते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या घटनेचे वर्णन 'शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ... असेच करावे लागेल .  मी बोलत आहे जोशी- अभ्यंकर खून खटल्यात माफी मिळालेल्या सुहास चांडक याच्या विषयी. सुहासचा कुटंबीयांनी देखील त्याची याच प्रकारची मिरवणूक काढली होती.  इंटरनेटवर ...

आत्महत्येच्या विळख्यात तरुणाई .. !

इमेज
 कोणत्याही देशाचे भवितव्य तेथील तरुणाई ठरवत असते. तरुणाईच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थावर कोणत्याही देशाच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरत असते., आणि याच मुद्ययावर आपल्या भारताचे टेंशन वाढवणारी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झालीये . ही आकडेवारी 'राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असल्याने ती झटकून टाकता येणे अशक्य  .कारण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडे येणारी माहिती हि देशभरातील पोलीस स्टेशनमधून थेट येत असते .देशभरातील विविध पोलीस सटेशनमध्ये वेगवेगळ्या क्लालाखाली नोंदवण्यात आलेल्या गुन्हयाची एकत्रित नोंद म्हणजे ही आकडेवारी या आकडेवारीत विविध गुन्हयात देशभरात किती प्रकरणे दाखल झाली याची ,माहिती असते .जसे रस्ते अपघात इतक्या , दरोड्याच्या तितक्या , देशभरात दखल झाल्या या प्रमाणे  तर वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून नुकतीच  सन २०२४ मध्ये देशभरात किती आत्महत्या झाल्या ? त्यापैकी कोणत्या वयोगटातली किती आत्महत्या होत्या ?आत्महत्या करणाऱ्यां व्यक्तींचे व्यवसाय काय होते याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे . यातील आकडे हृदय पिळटवून ट...

कॉस्टिंग आणि मॅनेजमेन्ट या विषयाची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट'

इमेज
नाशिक येथे मुख्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठाच्या विद्यापीठ गीतात एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे  'ज्ञानाची साधना निरंतर ' साधारणतः १९८० ते १९९० या दरम्यान कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहीहेले गे विद्यापीठ आजच्या काळात देखील त्यांत महत्वाचे आहे .किंबहुन सध्याच्या चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजिनसिनच्या काळात तर त्याचे महत्व अजूनच वाढले आहे.जर मनुष्याने सतत काहीतरी नवीन शिकले नाही तर तो या स्पर्धेत पार दूरवर फेकला जाईल,हे कटू असले तरी सत्य आहे ,माझ्याकडून हि चूक होऊ नये यासाठी मी कॉमर्सच्या अभ्यास सुरु केला आहे .या अभ्यासाला मदत होण्यासाठी मी अच्युत गोडबोलेंहि लिखित 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट' हे पुस्तक नुकतेच वाचले,असो .        कॉस्ट अँड मॅनेजमेंट हे पुस्तक मॅनेजमेंट  आणि अकाउंटिंग या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून ओळखता येऊ शकते . गुंतागुंतीच्या  आर्थिक व व्यवस्थापकीय संकल्पना या पुस्तकात खूपच सोप्या,  शाळेत असताना ९ आणि १० त शिकलेले अर्थशास्त्र  सोडून  कॉमर्सच्या काहीही गंध नसलेल्या माझ्यासारख...

मनोव्यथा राजहंसाची

इमेज
  काही दिवसापूर्वी मराठीतील एक सुप्रसिद्ध साहित्यकार गजानन दिंगबर माडगूळकर अर्थात ग . दि .मा यांच्या पुणे शहरातील बंगल्याविषयीच्या उलट सुलट बातम्या सोशल मीडिया आणि न्यूजपेपरमध्ये ‘आपण वाचल्या असतीलच. मला त्या वादात पडायचे नाही.  गीत रामायण सारखी अवीट भक्तीने भरलेली रचना करणाऱ्या या साहित्यिकाच्या  गीत रामायण सोडून अनेक साहित्यकृती देखील  या अक्षरशः जीव ओवाळून टाकण्यासारख्याच आहे यातलीच एक प्रसिद्ध कविता म्हणजे, ' एका तळ्यात होती,बदके पिल्ले सुरेख,होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक' इतरांच्या पेक्षा वेगळी प्रतिभा असलेल्या व्यक्तींच्या प्रतिभेची समाजाकडून यथोचित दाखल घेतली न गेल्याने त्यांना काय त्रास सोसावा लागतोय हे एका बदक आणि राजहंसचे प्रतीक वापरत अत्यंत सोप्या भाषेत यात गदिमांनी मांडलंय . आपण जर समाजाकडे उघड्या डोळस नजरेने बघितले तर अशी प्रतिभेची योग्य प्रकारे दाखल न घेतलेली अनेक राजहंस  दिसतात. आपल्यापेक्षा कमी प्रतिभा असलेली माणसे आपल्या पुढे जात आहेत हे बघताना त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल हे आपण त्या गाण्यातून समजावून घेऊ शकतो .  एखाद्याकडे अपार क...