प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ......
माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत .ते आम्हा तरुणांच्या मोबाईलप्रेमावर सातत्याने बोलत असतात ते म्हणतात, 'अरे तुमच्या हातात जेवहा बघावा तेव्हा मोबाईल मोबाईल आणि फक्त मोबाईल अरे जरा वाचत जा'' वाचनाचे महत्व सांगताना या आजोंबाच्या हक्काचे पेटंट म्हणता येईल वाक्य असतेच असते किंबहुना जर त्यांनी वाचनाचे महत्व सांगताना त्यांनी ते वाक्य बोलले नाही तर त्यांना आठवण करून द्यावी का ? की तुम्ही तुमचे नेहमीचे वाक्य बोलला नाहीत विसरले की काय ? तर आजोबांचे ते हुकुमी वाक्य मुळातील समर्थ रामदास स्वामींचे आहे. ते म्हणजे ................ प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ...... ते नेहमी सांगतात अरे मी नाही पण समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे म्हणून तरी वाचा मात्र हे आजोबा हे सांगताना एक गोष्ट विसरतात किंबहुना त्यांच्या मुद्दा जोरकसपाने पुढे यावा म्हणून त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात असे म्हणा हवेतर तो म्हणजे मुळात समर्थ रामदास स्वामींना हा उपदेश करण्याची गरज का वाटावी ? माझ्यामते लोकांची मुळातच वाचनाची प्रवृत्ती नसावी.आज मोबाइलमुले वाचन कमी झालंय असे म्हणतात त्यावेळी दुसरे...