पोस्ट्स

पती-पत्नीच्या विश्वासाची दृढता स्पष्टपणे दाखवून देणारे गाणे

इमेज
दोनच दिवसापुर्वीची गोष्ट आहे. एका वर्तमानपत्रात सध्या समाजात वाढणारे घटस्फोट, आणि त्यातून निर्माण होणारे एकल पालकत्व यावर परखड भाष्य करणारा लेख वाचायला मिळाला.पती-पत्नींचा संघर्षात त्याच्या अपत्यांचे होणाऱ्या मानसिक शोषणाबाबत लेख चिंता व्यक्त केली होती. मी फावल्या वेळात अनेकदा गाणी ऐकतो. त्यामुळे अनेकदा होत काय ? तर एखादी घटना बघितली एखादा लेख वाचला की, आपोआप अरे या प्रसंगाला हे गाणे याला शोभून दिसेल,असे लक्षात येते.याही वेळी अग्गदी तसेच झाले.या लेखाला मला एक गाणे आठवले ते म्हणजे, 'दिस येतील,दिस जातील भोग सरेल, सुख येईल',हे गाणे.१९८२ प्रदर्शित झालेल्या शापीत या चित्रपटातील हे गीत स्मिता पाटील आणि कुलदिप पवार यांच्यावर चित्रीत झाले आहे. या गीताचे गायक आशा भोसले आणि सुरेश वाडकर आहे गीतकार सुधीर मोघे असून संगीतकार    सुधीर फडके आहेत कातकरी समाजाच्या कष्टकरी जिवनाच्या पार्श्वभुमीवर हे गाणे चित्रीत झालेले असले तरी, माझ्यामते हे गाणे कोणत्याही नवरा -बायकोच्या नात्यावर भाष्य करणारे गाणे म्हणून ओळखले जाऊ शकते. ज्यात पत्नी आपल्या पतीस सध्या जरी कष्ट्राचे दिवस असले तरी आपण ए...

समाजसेवा करु इच्छिणाऱ्या व्यक्तीने बघावाच असा चित्रपट ट्रॅफिक सिग्नल'

इमेज
  तरुण भारत,नागपूरच्या पुणे आवृत्तीत सध्या दर रविवारी एक सदर प्रसिद्ध होत आहे, पोरकं पोरे नावाच. विविध कारणांनी बालपणीच्या आनंदाला मुकलेली, बालपणा देगा देवा मुंगी साखरेचा मेवा, या वाक्यप्रचारात सांगितल्याप्रमाणे बालपणीचा मनमुराद आनंद न घेता, करपलेल्या अभागी आयूष्याला सामोरे जाणाऱ्या मुला- मुलींची माहिती या सदरात देण्यात येते‌.याच मालिकेत एक लेख होता, ट्रॅफिक सिग्नलवर आयुष्य व्यतित करणाऱ्या मुला-मुलींच्या आयुष्यातील मन पिळटावून सोडणाऱ्या आयुष्यावर.तसे हा विषय अनेक प्रकार चित्रपटातून दाखवण्यात आला आहे‌. स्लमडॉग मिलेनीयम या चित्रपटातील  मधील बराच मोठा भाग यांच्या आयुष्यावर भाष्य करतो. असो. मी एस.पी .कॉलेजमध्ये शिकत असताना मोठ्या प्रमाणात चित्रपट बघितले त्या अनुभवानुसार सांगतोय,ही समस्या जर कोणत्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडली असेल तर ती मधुर भांडारकर  दिग्दर्शित आणि निर्मित ' ट्रॅफिक सिग्नल या चित्रप मधुर भांडारकर दिग्दर्शित ट्रॅफिक सिग्नल हा चित्रपटात. तसेच मधूर भांडारकर यांचे सर्वच चित्रपट जेल, पेज थ्री, कार्पोरेट, मै माधूरी दिक्षीत बनना चाहतू हूं,  सामाजिक समस्...

'पोरकी पोरं' मन हेलावून टाकणारे साप्ताहिक सदर

इमेज
मुल ही देवा घरची फुले, रम्य ते बालपण, या सारख्या वाक्यप्रचारातून कोणत्याही व्यक्तीचा लहानपणाचा काळ हा सुखाचा असतो असे सांगितले जाते. मात्र प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच,असतो. तसा या नियमाला देखील आहे,हो काही लहान मुलांचे आयुष्य करपलेले, दु:खाने ग्रस्त, प्रेमाचा अभावातच सरते. लहानपणी जे मिळणे कोणत्याही व्यक्तीचा मुलभुत म्हणा किंवा नैसर्गिक अधिकार असतो,तो त्यांचापासून दुरावला जातो. आई- वडील किंवा जवळचे सांभाळणारे नातेवाईक नसणारी अनथालयातील मुला-मुलींचाच नव्हे,तर आई -वडील जिवंत असलेल्या काही अभागी मुला-मुलींचा आयुष्याचे देखील रखरखीत वाळवंट झालेले असते. हे सर्व आपणास उलगडते, ते दैनिक तरुण भारतच्या पुणे आवृत्तीत दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या आसमंत या साप्ताहिक पुरवणीतील लेखमालिकेद्वारे. नाशिकचे रहिवासी असलेल्या डॉ.तूषार सावरकर यांनी लिहलेल्या पोरकं पोरं या लेखमालिकेद्वारे आपणास या अभागी मुला-मुलींचा आयुष्यातील दाहक वास्तव समजते‌. आपल्यापेक्षा कितीतरी मोठे दु:ख ही मुले-मुली भोगत आहेत.यांचा तूलनेत आपले दू:ख काहीच नाही,या जाणिवेतून आपल्या दु:खाला विनाकारण कुरवाळीत बसण्...

पर्यटनाच्या निमित्ताने भाग क्रमांक ११(पर्यटन म्हणजे नक्की काय )

इमेज
मी, सध्या माझ्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मी ज्या शहरात राहतोय, त्या पुणे शहरातील विविध भागांना भेटी देतोय, हे एव्हाना आपणास माहिती असेलच. त्याच संदर्भात माझ्या एका मित्राशी बोलताना, हे काय पर्यटन म्हणायचे? पर्यटन म्हणजे दुसऱ्या देशात फिरायला जाणे. ते जमले नाही तर दुसऱ्या राज्यात जाणे.तेही जमेल नाही तर भलेही आपल्याच राज्यात असे ना, दुसऱ्या शहरात जाणे होय.आपण ज्या शहरात राहतो.त्याच शहराच्या वेगवेगळ्या भागांना भेटी देणे म्हणजे पर्यटन म्हणायचे का ?  हा मुद्दा निघाला.मुद्दा निघाला खरा मात्र काही कारणाने त्यावर चर्चा काही आमच्यात रंगू शकली नाही.जरी आमच्यात चर्चा रंगू शकली नसली तरी माझ्या मनात विचारचक्र मात्र सुरू झाले.तेच तूमच्यापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन. तर प्रत्येक शहराचे नव्हे तर शहरातील प्रत्येक भागाचे एक स्वतंत्र्य वैशिष्ठ असते. आपण ज्या शहरात राहतो.त्या शहराचे सर्वसाधरण वैशिष्ठ  आपणास माहिती असते.मात्र आपल्या शहरातीलच मात्र आपण फारसे न गेलेल्या भागाचे वैशिष्ट आपणास माहिती असेलच असे नाही‌.उदाहरणार्थ आपण पुणे शहरातील गणेश पेठ, रविवार पेठ याला एक भ...

समस्या सारखीच फक्त माध्यमात बदल

इमेज
कालच मला व्हाट्सअप वर एक व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये आजची तरुण पिढी  झेन झी ही इंटरनेटच्या आहारी गेल्यामुळे कसे देशाचे वाटोळे होत आहे, यावर साधरणत:सत्तरीच्या वयाचे आजोबा चिंता करत होते. तो व्हिडीओ बघत असताना, मला का जाणे कुणास ठाउक, माझ्या नाशिकच्या कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवायला लागल्या. 'तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी । करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥' कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध 'स्वातंत्र्य देवतीची विनवणी' या कवितेतील या ओळी व्हिडीओशी देखील मेळ खात होत्या. आजोबा तरुणाईच्या व्यसनाविषयी बोलत होते, आणि कवीवर्य कुसुमाग्रज देखील आजपासून २९ वर्षापुर्वी याच तरुणाईला वेळ वाया घालण्यापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्न करत होते.तशी ती संपूर्ण कविताच विचार करण्यासारखी आहे.गेल्या ३०वर्षात परिस्थिती किती सुधारली (किंबहुना बिघडली)याचा विचार करणारा स्वतंत्र लेखाचा विषय होईल.मात्र तूर्तास आपण तो विषय बाजुला ठेवूया.असो तर कविवर्य कुसुमाग्रजांनी त्या वेळच्या निरर्थक गोष्ट्रीत तरुणाईने वेळ वाया घालवू नये.तरुणाईने करमणूकीला कमी म...

आपल्या शरीरातील बहुमोल ईश्वरी देणगीची माहिती देणारे पुस्तक 'रक्त'

इमेज
  अरे,तो माझा रक्ताचा नातेवाईक आहे,तरी असा कसा काय वागला ? लोक सध्या रक्ताची नाती देखील विसरत चालली आहेत. रक्ताच्या नात्यातील माणसे एकवेळ दगा देतील मात्र आमची माणसे नाहीत.रक्तातील माणसांसारखीच काळजी आमच्या येथे घेतली जाते .या प्रकारची अनेक वाक्ये आपण अनेकदा ऐकतो, बोलतो .हिंदी चित्रपटाचा विचार करता, मै तुम्हारा खून पी जाऊंगा हा एकेकाळचा सुप्रसिद्ध डायलॉग . त्याचप्रमाणे हिंदू संस्कृतीचा विचार करता त्या राक्षसांच्या प्रत्येक थेंबापासून नवीन दैत्य जन्मला येत असल्याचा कथा आहेत .इतिहासात रक्त सांडून लढाई जिंकल्याचे अनेक दाखले देण्यात येतात . रक्ताचे पाणी होणे. या सारख्या अनेक म्हणी वाक्यप्रचार आपल्या मराठीत आहेत  जास्त रक्तस्त्राव होऊन रुग्णाचा मृत्यू या बातम्या देखील आपल्या परिचयाचा आहेत .तर असा आपल्या शरीरातील महत्वाचा घटक जो आपल्या संस्कृतीशी देखील जोडला गेला आहे तो घटक म्हणजे रक्त. इतके असून देखील या घटकांविषयी आपल्या मराठीत शास्त्रीय दृष्ट्या अचूक माहिती देणाऱ्या पुस्तकाचा मात्र अभाव होता .  मात्र मराठीत ज्या विषयावर   माहितीचा अभाव तिथे अच्युत गोडबोले हजर  ...

शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ...

इमेज
  पुणे शहरात  दोन वर्षापूर्वी झालेल्या, 'बडे बाप कि बिगडी हुवी संतान' या वर्गवारीत सहज मॉडेल अश्या पर्सो कार  दुर्घटनेत अटकेत असेलेल्या वडिलांना जमीन मिळाल्यावर झालेल्या जल्लोष्याचे  फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली अनेकांनी सोशल मीडियावर त्याबाबत तीव्र नापसंती दर्शवली. .मात्र हे करताना हे नागरिक  हे विसरले की,याच प्रकारची घटना पुणे शहरात सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वी  घडली होती. त्यावेळी कटाची संपूर्ण माहिती पोलिसाना दिल्यामुळे पोलिसांनी ज्यास शिक्षेतून सूट दिली त्या आरोपीची देखील कुटुंबियांनी  याच प्रकारची भव्य मिरवणूक काढली होती .जणू त्यांनी निष्पाप पुणेकरांना नव्हे तर पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घेतले होते . त्यामुळे माझ्या मते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या घटनेचे वर्णन 'शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ... असेच करावे लागेल .  मी बोलत आहे जोशी- अभ्यंकर खून खटल्यात माफी मिळालेल्या सुहास चांडक याच्या विषयी. सुहासचा कुटंबीयांनी देखील त्याची याच प्रकारची मिरवणूक काढली होती.  इंटरनेटवर ...