पोस्ट्स

शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ...

इमेज
  पुणे शहरात  दोन वर्षापूर्वी झालेल्या, 'बडे बाप कि बिगडी हुवी संतान' या वर्गवारीत सहज मॉडेल अश्या पर्सो कार  दुर्घटनेत अटकेत असेलेल्या वडिलांना जमीन मिळाल्यावर झालेल्या जल्लोष्याचे  फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली अनेकांनी सोशल मीडियावर त्याबाबत तीव्र नापसंती दर्शवली. .मात्र हे करताना हे नागरिक  हे विसरले की,याच प्रकारची घटना पुणे शहरात सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वी  घडली होती. त्यावेळी कटाची संपूर्ण माहिती पोलिसाना दिल्यामुळे पोलिसांनी ज्यास शिक्षेतून सूट दिली त्या आरोपीची देखील कुटुंबियांनी  याच प्रकारची भव्य मिरवणूक काढली होती .जणू त्यांनी निष्पाप पुणेकरांना नव्हे तर पाकिस्तानी अतिरेक्यांना कंठस्नान घेतले होते . त्यामुळे माझ्या मते सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या घटनेचे वर्णन 'शहर तेच, वृत्ती तीच फक्त नावात आणि तारखेत बदल बस्स ... असेच करावे लागेल .  मी बोलत आहे जोशी- अभ्यंकर खून खटल्यात माफी मिळालेल्या सुहास चांडक याच्या विषयी. सुहासचा कुटंबीयांनी देखील त्याची याच प्रकारची मिरवणूक काढली होती.  इंटरनेटवर ...

आत्महत्येच्या विळख्यात तरुणाई .. !

इमेज
 कोणत्याही देशाचे भवितव्य तेथील तरुणाई ठरवत असते. तरुणाईच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थावर कोणत्याही देशाच्या भविष्याची दिशा आणि दशा ठरत असते., आणि याच मुद्ययावर आपल्या भारताचे टेंशन वाढवणारी आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झालीये . ही आकडेवारी 'राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असल्याने ती झटकून टाकता येणे अशक्य  .कारण राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडे येणारी माहिती हि देशभरातील पोलीस स्टेशनमधून थेट येत असते .देशभरातील विविध पोलीस सटेशनमध्ये वेगवेगळ्या क्लालाखाली नोंदवण्यात आलेल्या गुन्हयाची एकत्रित नोंद म्हणजे ही आकडेवारी या आकडेवारीत विविध गुन्हयात देशभरात किती प्रकरणे दाखल झाली याची ,माहिती असते .जसे रस्ते अपघात इतक्या , दरोड्याच्या तितक्या , देशभरात दखल झाल्या या प्रमाणे  तर वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडून नुकतीच  सन २०२४ मध्ये देशभरात किती आत्महत्या झाल्या ? त्यापैकी कोणत्या वयोगटातली किती आत्महत्या होत्या ?आत्महत्या करणाऱ्यां व्यक्तींचे व्यवसाय काय होते याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे . यातील आकडे हृदय पिळटवून ट...

कॉस्टिंग आणि मॅनेजमेन्ट या विषयाची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट'

इमेज
नाशिक येथे मुख्यालय असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठाच्या विद्यापीठ गीतात एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे  'ज्ञानाची साधना निरंतर ' साधारणतः १९८० ते १९९० या दरम्यान कविवर्य कुसुमाग्रजांनी लिहीहेले गे विद्यापीठ आजच्या काळात देखील त्यांत महत्वाचे आहे .किंबहुन सध्याच्या चॅट जीपीटी, आर्टिफिशियल इंटेलिजिनसिनच्या काळात तर त्याचे महत्व अजूनच वाढले आहे.जर मनुष्याने सतत काहीतरी नवीन शिकले नाही तर तो या स्पर्धेत पार दूरवर फेकला जाईल,हे कटू असले तरी सत्य आहे ,माझ्याकडून हि चूक होऊ नये यासाठी मी कॉमर्सच्या अभ्यास सुरु केला आहे .या अभ्यासाला मदत होण्यासाठी मी अच्युत गोडबोलेंहि लिखित 'कॉस्ट अँड मॅनेजमेंट' हे पुस्तक नुकतेच वाचले,असो .        कॉस्ट अँड मॅनेजमेंट हे पुस्तक मॅनेजमेंट  आणि अकाउंटिंग या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक म्हणून ओळखता येऊ शकते . गुंतागुंतीच्या  आर्थिक व व्यवस्थापकीय संकल्पना या पुस्तकात खूपच सोप्या,  शाळेत असताना ९ आणि १० त शिकलेले अर्थशास्त्र  सोडून  कॉमर्सच्या काहीही गंध नसलेल्या माझ्यासारख...

मनोव्यथा राजहंसाची

इमेज
  काही दिवसापूर्वी मराठीतील एक सुप्रसिद्ध साहित्यकार गजानन दिंगबर माडगूळकर अर्थात ग . दि .मा यांच्या पुणे शहरातील बंगल्याविषयीच्या उलट सुलट बातम्या सोशल मीडिया आणि न्यूजपेपरमध्ये ‘आपण वाचल्या असतीलच. मला त्या वादात पडायचे नाही.  गीत रामायण सारखी अवीट भक्तीने भरलेली रचना करणाऱ्या या साहित्यिकाच्या  गीत रामायण सोडून अनेक साहित्यकृती देखील  या अक्षरशः जीव ओवाळून टाकण्यासारख्याच आहे यातलीच एक प्रसिद्ध कविता म्हणजे, ' एका तळ्यात होती,बदके पिल्ले सुरेख,होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक' इतरांच्या पेक्षा वेगळी प्रतिभा असलेल्या व्यक्तींच्या प्रतिभेची समाजाकडून यथोचित दाखल घेतली न गेल्याने त्यांना काय त्रास सोसावा लागतोय हे एका बदक आणि राजहंसचे प्रतीक वापरत अत्यंत सोप्या भाषेत यात गदिमांनी मांडलंय . आपण जर समाजाकडे उघड्या डोळस नजरेने बघितले तर अशी प्रतिभेची योग्य प्रकारे दाखल न घेतलेली अनेक राजहंस  दिसतात. आपल्यापेक्षा कमी प्रतिभा असलेली माणसे आपल्या पुढे जात आहेत हे बघताना त्यांच्या मनाची काय अवस्था होत असेल हे आपण त्या गाण्यातून समजावून घेऊ शकतो .  एखाद्याकडे अपार क...

अकाउंटिंगची मुळाक्षरे गिरवण्यापासून  निभाव लागू शकेल असे अकाउंटींग ची माहिती देणारे पुस्तक"अकाउंट फॉर डमीज'

इमेज
  सध्याच्या ए. आय च्या काळात आपणास जॅक ऑफ ऑल ट्रेडस असणे अत्यावश्यकच आहे. त्याशिवाय आपला निभाव लागणे निव्वळ अशक्य. मात्र आपल्या रोजच्या आयुष्यात फार मोठ्या प्रमाणात आवश्यक असणाऱ्या 'अकाउंटंसी' या विषयाबाबत माझे ज्ञान खूपच तुकडे होते सध्याचा काळात आपल्यला ज्या विषयाची काहीही माहिती नाही. त्या विषयावरची मुळाक्षरे गिरवण्यापासून सुरुवात करण्याची आवश्यकता आहे अश्या विषयाबाबत आपणास मदत करायचा एकच उपाय आहे तो म्हणजे त्या विषयावर अच्युत गोडबोले यांचे एखादे पुस्तक आहे का ?हे बघणे मी देखील तेच  केले आणि मला त्यांची दोन पुस्तके सापडली त्यातील एक म्हणजे "अकाउंट फॉर डमीज' आणि दुसरे म्हणजे 'कॉस्ट अँड मॅनेजमेन्ट ' माझ्या घरी कॉमर्सची मोठी परंपरा असली तरी शाळेत नववी आणि दहावीला शिकलेल्या अर्थशात्राच्या पुस्तकांखेरीज मला कॉमर्सचा  गंध नव्हता त्यामुळे मी चटकन ती पुस्तके विकत घेतली काही जण मी विनाकारण पुस्तके विकत घेतली असे म्हणतील त्यांच्यामते चॅट जीपीटीमुळे थेट माहिती मिळत असताना पुस्तके का विकत घेयची ? तर अश्या मित्र - मैत्रीणींना मी सांगू इच्छितो की चॅट जीपीटीमुळे माहिती मिळत...

शाहण्याच्या सायक्राटिस्टची चटका लावून जाणारी एक्झिट

इमेज
  "बाबुमोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहाँपनाह... उसे न आप बदल सकते हैं न मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपर वाले की उँगलियों में बँधी है। कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं जानता।  मृत्यूचे वास्तव सांगणारा हा १९७१ साली प्रदर्शित 'आंनद ' या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हा डायलॉग.  आपल्यापैकी प्रत्येकजणच कधीना कधी हे जग सोडून जाणारच आहे. मृत्यू येणार हे निश्चित आहे मात्र तो कधी येणार हे मात्र अनिश्चित आहे. हे दाखवून देतो.  या अनिश्चितेचा फटका १५ मे रोजी सकाळी अनेकांना बसला. कारण होते अनेकांना मानसिक त्रासातून बाहेर काढत जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यास शिकवणारे ठाण्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांची कॅन्सरची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचे निधन झाल्याचे  मी त्यांचे आत्मचरित्र 'शहाण्यांच्या सायकॉस्टीक' हे वाचले आहे. जीवनातील कटू त्रासदायक अनुभवांना शांतपणे सामोरे कसे जायचे हे आपणास त्यातून समजते.  आयुष्यातील अडचणीचा त्रासाचा बागुलबुवा ना उभा करता किंबहुना समोरच्याला त्याबाबत शंका देखील य...

महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ...

इमेज
  महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... हे शीर्षक वाचून तुम्ही काहीसे दुखावले गेले असण्याची दाट शक्यता आहे तरी लेखाच्या सुरुवातीलाच त्याबाबद्दल तुमची माफी मागून सांगतो,तुम्ही काहीही म्हणा ही  आजची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच जाहीर  झालेल्या एस एस सी च्या मराठी भाषा विषयाने यावर जवळपास शिक्का मोर्तब केले आहे. तुम्ही म्हणाल मराठी विषयात ९४००० विद्यार्थी नापास होणे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझणे चा अर्था अर्थी काही संबंध आहे का ? उगीच वडाची साला पिंपळाला जोडून रडायला का सुरुवात करायची ?  तर जरा थांबा मी जे म्हणतो ते समजून घेण्यासाठी आपणास आजपासून २९ वर्ष मागे सन  १९९७ मध्ये जावे लागेल. माझ्या  नाशिकचे भूमिपुत्र कविवर्य कुसुमाग्रज यांनी एका दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी लिहलेल्या सुप्रसिद्ध अश्या ' स्वातंत्र्य देवतेची विनवणी' या कवितेपर्यंत मागे जावे लागेल. या कवितेत त्यांनी परभाषेतही व्हा पारंगत असा उपदेश केलेला असला तरी मराठी भाषेबाबत देखील चिंता व्यक्त केली होती  मायमराठी मरते इकडे परकींचे पाय चेपू नका.  भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचा...