पोस्ट्स

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ......

इमेज
 माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत .ते आम्हा तरुणांच्या मोबाईलप्रेमावर सातत्याने  बोलत असतात ते म्हणतात, 'अरे तुमच्या हातात जेवहा बघावा तेव्हा मोबाईल मोबाईल आणि फक्त मोबाईल अरे जरा वाचत जा'' वाचनाचे महत्व सांगताना या आजोंबाच्या हक्काचे पेटंट म्हणता येईल वाक्य असतेच असते किंबहुना जर त्यांनी वाचनाचे महत्व सांगताना त्यांनी ते वाक्य बोलले नाही तर त्यांना आठवण करून द्यावी का ? की तुम्ही तुमचे नेहमीचे वाक्य बोलला नाहीत विसरले की काय ? तर आजोबांचे ते हुकुमी वाक्य मुळातील समर्थ रामदास स्वामींचे आहे.  ते म्हणजे ................  प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ...... ते नेहमी सांगतात अरे  मी नाही पण समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे म्हणून तरी वाचा  मात्र हे आजोबा हे सांगताना एक गोष्ट विसरतात किंबहुना त्यांच्या मुद्दा जोरकसपाने पुढे यावा म्हणून त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात असे म्हणा हवेतर तो म्हणजे मुळात समर्थ रामदास स्वामींना हा उपदेश करण्याची गरज का वाटावी ? माझ्यामते  लोकांची मुळातच वाचनाची प्रवृत्ती नसावी.आज मोबाइलमुले वाचन कमी झालंय असे म्हणतात त्यावेळी दुसरे...

मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा ..

इमेज
  मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा .. शीर्षक वाचून गडबडलात का ? आता हा काय सांगतोय मोबाईलला कोणी केले बळीचा बकरा .. मुळात मोबाईल हे एक यंत्र आहे तो काही सजीव प्राणी नाही त्यामुळे त्याला मुळातच बळीचा बकरा कसे केले जाऊ शकते असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर जरा थांबा आणि मी काय म्हणतोय (म्हणजे लिहितोय हो...! ) हे जरा समजून घ्या  तर वाचक मित्र मैत्रिणींनो आजची पिढी काही वाचतच नाही जेव्हा बघावे तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल आणि मोबाईल असे आपण अनेकदा ऐकतो वाचतो.  आजच्या पिढीच्या वाचायला न आवडण्याचे पाप सरळ मोबाईलवर ढकलून दिले जाते जसे काही मोबाइलमुळेच वाचन संपले म्हूणनच  म्हंटले मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा  मला मान्य आहे की, मोबाईलमुळे वाचन काहीसे कमीच झाले आहे.मात्र वाचन कमी होण्यामागचे तेच एक कारण नाहीये. आपण जर इतिहासात बघितले तर  कारणे काहीही असो  वाचन मुळातच कमीच होते, असे दिसते.  किंबहुना त्यामुळेच समर्थ रामदास स्वामींना,  ... प्रसंगी अखंडित वंचित जावे असा उपदेश करावा लागला. जरा विचार करा जर रामदास स्वामींच्या काळात वाचन म...

इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?

इमेज
मा‌.प्रताप सरनाईक, साहेब परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज   सप्रेम जय  महाराष्ट्र  साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्यातील एसटी बसचे आर्थिक उत्पन वाढावे, आणि प्रवाश्यांना सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी एसटी बस स्टँडपासून २०० मीटरच्या हद्दीत खासगी वाहतूक होणार नाही, हे बघण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे आपण नुकतेच जाहिर केले. एसटीची स्थिती सुधारण्यासाठी आपण उपाययोजना करत आहात,हे बघून आनंद वाटला. आज आपल्या महाराष्ट्रात अनेक पालक आपल्या मुलीला फक्त कमी तिकीट आहे, म्हणून घरापासून दूर असलेल्या गावात शिक्षणासाठी पाठवत आहेत.त्यांना शिक्षणाचा प्रवाहात टिकण्यासाठी एसटी टिकणे आवश्यक आहे. साहेब, मी  एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेच्या मार्फत महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया या ४ जिल्ह्याचा अपवाद वगळता आपली महाराष्ट्राची एसटी जाते अस्या राज्याच्या काना कोपऱ्यात आणि राज्याबाहेर अहमदाबाद,सुरत, इंदोर, बेळगाव, बंगळूरू,पणजी, वापी आदी ठिकाणी  फिरलोय. या फिरण्यात मला काही बाबी निर्दसनास आल्या आहेत.ज्या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत...

मानवी आयुष्यातील नात्यांचे महत्त्व उलगडणारा चित्रपट '“अमृत

इमेज
  आज २०२६ साली सुद्धा गावाच्या साधारणतः मध्यभागी असलेल्या महादेवाच्या मंदिराला केंद्र मानून एक दीड  किलोमीटरचे वर्तुळ काढले तर संपूर्ण गाव येऊ शकेल अश्या धार्मिक महत्त्व असलेल्या त्रंबकेश्वर या शहरातील एका ब्राह्मण कुटूंबियातील धोंडोपंत फाळके (दादासाहेब फाळके ) यांनी ११३ वर्षांपूर्वी भारतात आणलेले चित्रपट हे तंत्र मोठे विलक्षण आहे. मानवी आयुष्यतील रंजकता, दाहकता यांचे प्रभावीपणे सादर करणे. समाजाला उपयोगी पडेल असा संदेश समोरच्याला आपणास उपदेश केला आहे याची थेट जाणीव न होता समजेल अश्या पद्धतीने देण्यासह व्यक्तीचे मनोरंजन करण्यात चित्रपटाचा हात कोणी धरू शकणार नाही, असे मला वाटतंय.   संगीत नाटक, एकपात्री नाटक,  दोन अंकी नाटक, फिरता रंगमंच असलेले नाटक तमासातील वगनाट्य आणि यासारखे कोणतेही प्रकार घेतले तरी त्यास चित्रपटाची सर येणे निव्वळ  अशक्यच .  आपल्या भारताला अनेक उत्तोमत्तम आशयघन चित्रपटाची मोठी परंपरा आहे . याच अभिंनदनास्पद वाटचालीतील अनेक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे अमृत  “अमृत हा १९८६ साली प्रदर्शित झालेला अत्यंत संवेदनशील आणि आशयघन हिंदी आहे....

पती-पत्नीच्या विश्वासाची दृढता स्पष्टपणे दाखवून देणारे गाणे

इमेज
दोनच दिवसापुर्वीची गोष्ट आहे. एका वर्तमानपत्रात सध्या समाजात वाढणारे घटस्फोट, आणि त्यातून निर्माण होणारे एकल पालकत्व यावर परखड भाष्य करणारा लेख वाचायला मिळाला.पती-पत्नींचा संघर्षात त्याच्या अपत्यांचे होणाऱ्या मानसिक शोषणाबाबत लेख चिंता व्यक्त केली होती. मी फावल्या वेळात अनेकदा गाणी ऐकतो. त्यामुळे अनेकदा होत काय ? तर एखादी घटना बघितली एखादा लेख वाचला की, आपोआप अरे या प्रसंगाला हे गाणे याला शोभून दिसेल,असे लक्षात येते.याही वेळी अग्गदी तसेच झाले.या लेखाला मला एक गाणे आठवले ते म्हणजे, 'दिस येतील,दिस जातील भोग सरेल, सुख येईल',हे गाणे.१९८२ प्रदर्शित झालेल्या शापीत या चित्रपटातील हे गीत स्मिता पाटील आणि कुलदिप पवार यांच्यावर चित्रीत झाले आहे. या गीताचे गायक आशा भोसले आणि सुरेश वाडकर आहे गीतकार सुधीर मोघे असून संगीतकार    सुधीर फडके आहेत कातकरी समाजाच्या कष्टकरी जिवनाच्या पार्श्वभुमीवर हे गाणे चित्रीत झालेले असले तरी, माझ्यामते हे गाणे कोणत्याही नवरा -बायकोच्या नात्यावर भाष्य करणारे गाणे म्हणून ओळखले जाऊ शकते. ज्यात पत्नी आपल्या पतीस सध्या जरी कष्ट्राचे दिवस असले तरी आपण ए...

समाजसेवा करु इच्छिणाऱ्या व्यक्तीने बघावाच असा चित्रपट ट्रॅफिक सिग्नल'

इमेज
  तरुण भारत,नागपूरच्या पुणे आवृत्तीत सध्या दर रविवारी एक सदर प्रसिद्ध होत आहे, पोरकं पोरे नावाच. विविध कारणांनी बालपणीच्या आनंदाला मुकलेली, बालपणा देगा देवा मुंगी साखरेचा मेवा, या वाक्यप्रचारात सांगितल्याप्रमाणे बालपणीचा मनमुराद आनंद न घेता, करपलेल्या अभागी आयूष्याला सामोरे जाणाऱ्या मुला- मुलींची माहिती या सदरात देण्यात येते‌.याच मालिकेत एक लेख होता, ट्रॅफिक सिग्नलवर आयुष्य व्यतित करणाऱ्या मुला-मुलींच्या आयुष्यातील मन पिळटावून सोडणाऱ्या आयुष्यावर.तसे हा विषय अनेक प्रकार चित्रपटातून दाखवण्यात आला आहे‌. स्लमडॉग मिलेनीयम या चित्रपटातील  मधील बराच मोठा भाग यांच्या आयुष्यावर भाष्य करतो. असो. मी एस.पी .कॉलेजमध्ये शिकत असताना मोठ्या प्रमाणात चित्रपट बघितले त्या अनुभवानुसार सांगतोय,ही समस्या जर कोणत्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडली असेल तर ती मधुर भांडारकर  दिग्दर्शित आणि निर्मित ' ट्रॅफिक सिग्नल या चित्रप मधुर भांडारकर दिग्दर्शित ट्रॅफिक सिग्नल हा चित्रपटात. तसेच मधूर भांडारकर यांचे सर्वच चित्रपट जेल, पेज थ्री, कार्पोरेट, मै माधूरी दिक्षीत बनना चाहतू हूं,  सामाजिक समस्...

'पोरकी पोरं' मन हेलावून टाकणारे साप्ताहिक सदर

इमेज
मुल ही देवा घरची फुले, रम्य ते बालपण, या सारख्या वाक्यप्रचारातून कोणत्याही व्यक्तीचा लहानपणाचा काळ हा सुखाचा असतो असे सांगितले जाते. मात्र प्रत्येक नियमाला अपवाद हा असतोच,असतो. तसा या नियमाला देखील आहे,हो काही लहान मुलांचे आयुष्य करपलेले, दु:खाने ग्रस्त, प्रेमाचा अभावातच सरते. लहानपणी जे मिळणे कोणत्याही व्यक्तीचा मुलभुत म्हणा किंवा नैसर्गिक अधिकार असतो,तो त्यांचापासून दुरावला जातो. आई- वडील किंवा जवळचे सांभाळणारे नातेवाईक नसणारी अनथालयातील मुला-मुलींचाच नव्हे,तर आई -वडील जिवंत असलेल्या काही अभागी मुला-मुलींचा आयुष्याचे देखील रखरखीत वाळवंट झालेले असते. हे सर्व आपणास उलगडते, ते दैनिक तरुण भारतच्या पुणे आवृत्तीत दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या आसमंत या साप्ताहिक पुरवणीतील लेखमालिकेद्वारे. नाशिकचे रहिवासी असलेल्या डॉ.तूषार सावरकर यांनी लिहलेल्या पोरकं पोरं या लेखमालिकेद्वारे आपणास या अभागी मुला-मुलींचा आयुष्यातील दाहक वास्तव समजते‌. आपल्यापेक्षा कितीतरी मोठे दु:ख ही मुले-मुली भोगत आहेत.यांचा तूलनेत आपले दू:ख काहीच नाही,या जाणिवेतून आपल्या दु:खाला विनाकारण कुरवाळीत बसण्...