पोस्ट्स

ह_ड_प_स_र पुणे शहराचे अप्रतिम उपनगर (भाग १ )

इमेज
  आपल्या मनुष्याच्या स्वभाव मोठा विलक्षण आहे.  मनुष्य त्याच्या जवळ जे आहे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. आणि दुसऱ्या ठिकाणच्या वस्तूचा शोध घेतो . जर  आपण मानवी स्वभावाचे तटस्थ पद्धतीने निरीक्षण केले तर मानव प्राण्याने हा नियम सर्व ठिकाणी वापरला असल्याचे लक्षात येते अगदी आपण राहतो त्या प्रदेशाला सुद्धा हा नियम लावल्याचे आपण सहज दिसून येते. आपण काय इथेच राहतो हा भाग कधीही बघता येईल, या  समजुतीतून आपण राहतो त्या शहरातील अनेक भाग ना बघितलेले सुद्धा आपणास अनेक जण सापडू शकतात. किंबहुना आपण राहतो आणि आपण व्यवसाय, नोकरी करतो त्या परिसरात बघण्यास फारसे काही आढळलेले  नसल्याने  (मुळात तो त्यांचा दोष असतो, त्या भागात देखील अनेक बघण्याचे भाग असतात मात्र रोजच्या जगण्यात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने किंवा तशी दृष्टी नसल्याने त्यांना ते सापडत नाहीत )  शहराच्या इतर भागात देखील तसेच असल्याचे वाटून जाते आणि ते एका मोठ्या खजिन्याला मुकतात.  माझ्याकडून ही  चूक होऊ नये म्हणून मी पुणे शहराचे एक अप्रतिम उपनगर असलेल्या हडपसरला नुकतीच भेट दिली. हडपसर उपनगर पर्यटनाच्या निम...

सुरुवात एका नव्या पर्वाची थेऊरच्या अष्टविनायकाच्या दर्शनाने

इमेज
 मी जे फिरतो, त्याविषयी माझ्या मित्र परिवारात  जेव्हा चर्चा होते त्यावेळी  एक मुद्दा अनेकदा चर्चेस  येतो ,तो म्हणजे मी एसटी बसने का फिरतो? .स्वतःच्या  टू व्हीलरवर  का फिरत नाही ?  .माझे काही मित्र मला अनेकदा सांगत असतात. अजिंक्य आम्ही तुझ्या बरोबर फिरायला येऊ पण ती एसटी बस नको रे ! ठीक ठिकाणी थांबत जाण्यापेक्षा आपल्या टू व्हीलरने गेले कि मस्त सारखे थांबायला नको .एकदा निघालो कि थेट सुसाट.बरे मध्ये थांबावेसे वाटले कि थांबायचे ते देखील हवा तेव्हढा वेळ .आगीचं निघायची घाई नाही आपल्याला हवा तसा प्रॉग्रॅम आखता येतोस्वतःच्या गाडीमुळे/ चल निघायचे का ?  मात्र अनेक कारणांनी मी एसटी बसने फिरण्याचे काही सोडत नव्हतो. टू व्हीलरने काही फिरायला जात नव्हतो. मात्र कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्रासदायक वाटते .एकदा केल्यावर त्यातील भीती मोठ्या प्रमाणात पळून जाते असे म्हंटले जाते. याचाच प्रत्यय मला नुकताच आला स्वःता टू  व्हीलर चालवत मी नुकतेच पर्यंटन पूर्ण केले.   कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपल्याकडे देव दर्शनाने करण्याची आपल्याकडे पद्धत आहे माझ्या य...

कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....

इमेज
 यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल.  मी आतापर्यंत, 'यस आय एम गिल्टी, बलुतं,  उपरा, लोकवन आनंदवन, डायरी ऑफ ऍना फ्रॅंक ही  पुस्तके वाचली आहेत . याच आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांच्या साखळीत सहजतेने समाविष्ट होऊ शकेल असे पुस्तक, ' कहाणी लंडनच्या आजीबाईची' सुद्धा मी नुकतेच वाचून पूर्ण केले आहे. माझे आजचे लेखन तुम्हाला या पुस्तकाविषयी सांगण्यासाठी  तर वाचक मित्रहो , इंग्रजीचा गंध सोडा, धड मराठी सुद्धा न येणाऱ्या विदर्भातील एका पूर्ण अर्थाने अशिक्षित असणाऱ्या राधाबाई बोरकर,  ज्यांना  लंडन देश आहे की एखादे शहर हे सुद्धा माहिती नाही‌‌. त्यांनी जिद्दीने प्रयत्नपूर्वक आणि कष्टाने उभारलेल्या लंडनमधील सुप्रसिद्ध हॉटेलची कथा या सांगण्यात आली आहे.सरोजिनी वैद्य लिखित १८८ पानी या पुस्तकाचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन.  कष्ट केले की यश मिळतेच हा संदेश आपणांस या पुस्तकातून मिळतो.  १८ प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकात आपणास स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच ...

प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'

इमेज
  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुमारवयीन टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा ठसा त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर राहतो. या काळात जर त्यास योग्य संगत न मिळण्यास त्याचे दुष्परिणाम संबधित व्यक्तीलाआयुष्यभर भोगावे लागतात. आयुष्याचे सोने किंवा मातेरे करण्याची ताकद या कुमारवयीन आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये असते.व्यक्तीला जगाची ओळख  होण्याच्या या काळातील एखादे चुकीचे पाऊल आयुष्याचा नाश करायला पुरेसे असते .असे सातत्याने म्हंटले जाते.आणि या विधानाची साक्ष आपणास पटते ती, मुनव्वर शाह लिखित आणि निराली प्रकाशनतर्फे प्रकशित  ' यस आय एम गिल्टी'   या २०० पानी पुस्तकातून.  वाचक मित्र,मैत्रीणीनो इसवी सन २०२६ या वर्षात माझ्या वाचनाचा रोख प्रामुख्याने आत्मचरित्र,  चरित्र आणि अनुभव कथन असलेल्या पुस्तकांवर असणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याच साखळीतील एक पुस्तक म्हणून मी हे एका गुन्हेगाराचे अनुभव कथन वाचले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही पुणे शहरात एके काळी खूप चर्चेत असलेल्या जोशी - अभ्यंकर खून खटल्यातील आरोपी...

रफी साहब, आपने मराठी को किरणे खूबसूरत चांद , दिये मान गये !

इमेज
 दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे.काही कामानिमित्त पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रोने प्रवास करत होतो. वेळ दुपारची असल्याने फारशी गर्दी नव्हती. माझ्या शेजारीच एक सत्तरीचे आजोबा प्रवास करत होते. आजोबानी मेट्रोच्या संगीताच्या नियमाला बगल देत हेडफोन न वापरता, मोबाईलवर गाणी लावली होती. त्यामुळे त्या गाण्याच्या आस्वाद मला देखील घेता आला. आजोबानी शोधिसी मानव लावुनी अंतरी,  प्रभू तू दयाळू कृपावंत  दाता, हा छंद जीवाला लावी पिसे, हा रुसवा सोड सखे, हे मना आज कोणी बघ तुला या सारखी गाणी आपल्या मोबाईलवर लावली होती  आजोबांची गाणी शांत संगीताची आणि सहज गुणगुणता येतील या प्रकारच्या मराठी भाषेतील असल्याने मी आजोबांना गाणी आवडल्याचे सांगितलेत्यावर त्यांनी स्मितहास्य देत,ही  सगळी गाणी पंजाबी मुसलमान असलेल्या मोहंमद रफी यांनी गायलेली आणि श्रध्येय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे  भाऊ श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली आहेत अशी माहिती पुरवली. त्यांना शिवाजीनगर येथे जायचे असल्याने ते उतरून गेले मात्र  त्यांनी एका नव्या वादळाला जन्म दिला . हे वादळ होते मराठीला किती समृद्ध व...

समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'

इमेज
 मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दया पवार लिखित 'बलुतं' हे सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यातील महत्त्वाचे आत्मचरित्र मी नुकतेवच वाचले. समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं' असे त्याचे एका वाक्यात वर्णन करता येईल आपल्याच समाजातील एका घटकाचे आयुष्य किती त्रासदायक आणि कष्टकरी होते याचे मन सुन्न करणारे वर्णन सुमारे २०० पानी पुस्तकात आहे.समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे स्वच्छतेचे काम करून सुद्धा समाज आपल्यातील एकाला कोणत्या प्रकारे हीन वागणूक देत होता हे या पुस्तकाच्या वाचनातून मला पुन्हा एकदा समजले.  मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना किबे थेटरमध्ये 'तुरुंग देश' हा माहितीपट बघितला होता.त्यावेळी पडद्यावर बघितलेली दाहकता मी या पुस्तकातून पुन्हा एकदा अनुभवली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. 'हीच आमुची प्रार्थना, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हे का आवश्यक आहे हे या आतमचरित्रामुळे मला समजले.  शून्यातून विश्व निर्माण करणारा लेखक म्हण...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

इमेज
 मा. प्रताप सरनाईक साहेब, परिवहनमंत्री  महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेसी  साहेब, आम्ही डायव्हरांनी दारू पिऊन बस चालवू नये, तूम्ही आम्हाला ड्युटी सुरु करण्यापुर्वी टेस्ट कंम्पलसरी केली.पण साहेब आम्ही मुळात दारू का पितो,याचा विचार कराल का ?अहो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो साहेब .अस्या वेळी ज्याचा खांद्यावर बसमधील ३०ते ३५ जणांचे भवितव्य अवलुंबन असते अस्या डायव्हरांना दारू पिऊन स्वत:सह त्यांचा जीव धोक्यात घालायला का वाटतो, याचा विचार कराल का, ? साहेब, जर कुठे नरक असेलच तर तो इथे आहे,अस्या पद्धतीच्या ठिकाणी आमच्या मुक्कामाची सोय असते.साहेब रेल्वेमध्ये डायव्हरांना रहायला चांगल्या खोल्या असतात,खायला मोफत असते.ड्युटीवर जॉइन होण्याचा आधी त्याची पुरेसी विश्रांती होईल याची काळजी घेतलेली असते.आठवड्याभरात किती तास रेल्वे चालवायची याचे निश्चित नियम आहेत.आमच्या येथे काही हाताच्या बोटावर मोजता येतील,असे अपवाद वगळता चित्र नरकापेक्षा वेगळे नाही हो साहेब. सकाळी घरुन निघताना डब्यात बांधलेले अन्नच कितीही गार झाले तरी,आम्हाला खावे लागते.ते गरम करण्याची देखील सोय अनेक ठिकाणी नाही‌.झोपा...