पोस्ट्स

फक्त अनावश्यक सवलती आवरा !

इमेज
प्रति  देवेंद्रजी फडणवीसजी   मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेशी  जय महाराष्ट्र  साहेब, आपल्या आदेशान्वये, 'महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळला, नागरिकांच्या बोलीभाषेत एसटीला आपण निधी देणार नसल्याचे जाहिर केले.राज्याची आर्थिक स्थिती उत्तम नसल्याने निधी देत नसल्याचे कारण आपण यावेळी दिले. एसटीने स्वत:हुन उत्पनाचे स्त्रोत शोधावेत असी आपली भुमिका देखील आपण त्यावेळी जाहिर केली.  मुळात एसटीला राज्य सरकारकडे निधी का मागावा लागतो,याचा विचार कराल का, साहेब. राजकीय स्वार्थासाठी नेत्यांकडून विविध सवलती जाहिर केल्या जातात. या सवलतीमुळे एसटीला कमी किमतीत तिकीट संबंधित प्रवाश्यास द्यावे लागते‌.नियमित प्रवाशी वर्गाला जेव्हढा वाहतूक खर्च येतो,तितकाच या सवलती मिळवणाऱ्या प्रवाश्याकडून येतो.मात्र त्या बदल्यात रक्कम मिळत नाही.ती कमी मिळते साहेब.आपले एसटी महामंडळ तब्बल ५२ प्रकारच्या तिकीटात सवलती देते. देशातील कोणतेही राज्य परिवहन महामंडळ इतक्या मोठ्या प्रमाणात तिकिटात सवलत देत नाही.ज्या आपण देतो साहेब.  लोककल्याणकारी राज्यात गोरगरीब जनतेला सम्मानाचे जगणे जगता ...

शिक्षणामुळे होणारा बदल दाखवून देणारे आत्मचरीत्र, 'माज्या जल्माची चित्तरकथा'

इमेज
 साधरणत:१९८० ते१९९० या कालखंडात समाजातील शोषित,पिडीत समजला जाणारा तळागाळातील समाज आपल्या लेखनाद्वारे व्यक्त होऊ लागला.पॅथरच्या माध्यमातून आपल्या समाजातील वेदनेला वाचा फोडु लागला. मात्र यात प्रामुख्याने पुरुषवर्गाचे प्रमाण अधिक होते.माता-भगिनी महिलावर्ग तूलनेत यामध्ये काहीसा मागे होता.आता ज्याला आपण समांतर साहित्य/विद्रोही साहित्य म्हणून ओळखतो त्याचा सोन्याचा या दिवसात जी आत्मचरीत्रे प्रसिद्ध झाली,ती प्रामुख्याने पुरुषांनी लिहलेलीच जास्त संख्येने दिसतात.तूरळक स्वरुपात दिसणाऱ्या या महिलांच्या साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मचरीत्र म्हणजे, , 'माज्या जल्माची चित्तरकथा' जे मी नुकतेच वाचले. शिक्षणामुळे होणारा बदल दाखवून देणारे आत्मचरीत्र म्हणजे 'माज्या जल्माची चित्तरकथा' असे या आत्मचरीत्राबाबत आपण म्हणू शकतो. पहिले दलित महिला आत्मचरीत्र असी ओळख असलेले हे आत्मचरीत्र अन्य  विद्रोही साहित्यातील आत्मचरीत्राप्रमाणेच गावकुस्यात झालेला अन्याय, त्यावर मात करण्यासाठी केलेला संघर्षाचे दर्शन घडवते.या प्रकारच्या अन्य आत्मचरीत्रात असते, त्याचप्रमाणे सुरुवातीला बोली भाषा आणि पुस्तकाचा साध...

आपल्या देवाविषयीच्या संकल्पना विस्तारणारे गाणे,

इमेज
  दोनच दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . व्हाट्सएपच्या एका ग्रुपवर मराठीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या देऊळबंद २ या चित्रपटावर चर्चा सुरु होती.चर्च करता करता गाडी याच चित्रपटाच्या नावाशी सारखेपणा असलेल्या देऊळ या चित्रापाशी येऊन थांबली .चर्चा भुरकट आहे हे लक्षात अळ्यांचे ऍडमिनने चर्चा लगेच थांबवली .मात्र त्यावेळी माझ्या मनात सुरु असलेले विचार चक्र अजून सुरूच आहे .तसे बघायला गेले तर हा विषय आपणास काही नवीन नाही हिंदीतील गोष्टच सोडा आपल्या मराठीत देखील हा विषय कल्पकतेने मांडण्यात आला आहे . आपल्या मराठीच्या उत्तमोत्तम  गाण्याच्या खजिन्यातील एक असलेले 'देव  देव्हाऱ्यात नाही देव नाहोती देवालयी'  हे झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातील गाणे हे याचे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणता येईल  ‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ हे मराठी गाणे आपल्यास काय सांगते ? याचा एका ओळीचा सारांश  सांगायचं झाल्यास,  देव ही केवळ मूर्ती, मंदिर किंवा देव्हाऱ्यात मर्यादित असलेली संकल्पना नाही. उलट, देव हा प्रत्येक सजीवात, प्रत्येक चांगल्या कृतीत आणि माणसाच्या अंतःकरणात वास करतो. आपण अनेक...

पुणे शहराची बहुसांस्कृतिक विविधता ही ओळख निर्माण करत स्वत्व न विसरलेला परिसर, 'औंध,बाणेर,पाषाण'

इमेज
गेल्याच रविवारची गोष्ट आहे. लहान मुले-मुली, युवा वर्गातील सळसळत्या शक्तीला विधायक स्वरुप देऊन २०४७मधील शक्तीशाली, बलशाली खऱ्या अर्थाने जागतिक महासत्ता असलेला अमृत भारत उदयास यावा,म्हणून तन मन झोकुन कार्य करणाऱ्या 'विवेकानंद केंद्र' या संस्थेच्या पाषाण येथे झालेल्या एका संस्कार वर्गाला भेट देण्याची संधी मिळाली.कार्यक्रम उत्तमच झाला.या कार्यक्रमा दरम्यान मला एका गोष्टीची जाणिव झाली, ती म्हणजे अरे आपल्या पुणे शहर जाणून घेण्याचा उपक्रमात पुणे शहराच्या काहीस्या एका कोपऱ्यात असलेल्या या भागाला जाणून घेणे राहिलेच की, मग काय कार्यक्रम संपल्यावर लागलो मी नेहमीच्या कार्यक्रमाला, अर्थात पुणे शहर भ्रमंतीला. कार्यक्रम पाषाण टेकडी परिसरात असल्याने अर्थातच सुरुवात त्या ठिकाणापासून झाली. पाषाण टेकडी आणि पाषाण तलावाच्या आसपासचा निसर्ग, शांतता आणि हिरवाई यामुळे शहराच्या गोंगाटापासून दूर असल्याचा अनुभव आला. थंड वाऱ्याची झुळूक आणि पक्ष्यांचे किलबिलाट मनाला प्रसन्न करणारा होता. पुणे शहराची भौगोलिक रचना बशीप्रमाणे असल्याचे न्युजपेपरमध्ये वाचले होते,ते प्रत्यक्ष दिसले पाषाण टेकडी,चतूश्रूं...

प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ......

इमेज
 माझ्या ओळखीचे एक आजोबा आहेत .ते आम्हा तरुणांच्या मोबाईलप्रेमावर सातत्याने  बोलत असतात ते म्हणतात, 'अरे तुमच्या हातात जेवहा बघावा तेव्हा मोबाईल मोबाईल आणि फक्त मोबाईल अरे जरा वाचत जा'' वाचनाचे महत्व सांगताना या आजोंबाच्या हक्काचे पेटंट म्हणता येईल वाक्य असतेच असते किंबहुना जर त्यांनी वाचनाचे महत्व सांगताना त्यांनी ते वाक्य बोलले नाही तर त्यांना आठवण करून द्यावी का ? की तुम्ही तुमचे नेहमीचे वाक्य बोलला नाहीत विसरले की काय ? तर आजोबांचे ते हुकुमी वाक्य मुळातील समर्थ रामदास स्वामींचे आहे.  ते म्हणजे ................  प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ...... ते नेहमी सांगतात अरे  मी नाही पण समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे म्हणून तरी वाचा  मात्र हे आजोबा हे सांगताना एक गोष्ट विसरतात किंबहुना त्यांच्या मुद्दा जोरकसपाने पुढे यावा म्हणून त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करतात असे म्हणा हवेतर तो म्हणजे मुळात समर्थ रामदास स्वामींना हा उपदेश करण्याची गरज का वाटावी ? माझ्यामते  लोकांची मुळातच वाचनाची प्रवृत्ती नसावी.आज मोबाइलमुले वाचन कमी झालंय असे म्हणतात त्यावेळी दुसरे...

मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा ..

इमेज
  मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा .. शीर्षक वाचून गडबडलात का ? आता हा काय सांगतोय मोबाईलला कोणी केले बळीचा बकरा .. मुळात मोबाईल हे एक यंत्र आहे तो काही सजीव प्राणी नाही त्यामुळे त्याला मुळातच बळीचा बकरा कसे केले जाऊ शकते असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर जरा थांबा आणि मी काय म्हणतोय (म्हणजे लिहितोय हो...! ) हे जरा समजून घ्या  तर वाचक मित्र मैत्रिणींनो आजची पिढी काही वाचतच नाही जेव्हा बघावे तेव्हा त्यांच्या हातात मोबाईल आणि मोबाईल असे आपण अनेकदा ऐकतो वाचतो.  आजच्या पिढीच्या वाचायला न आवडण्याचे पाप सरळ मोबाईलवर ढकलून दिले जाते जसे काही मोबाइलमुळेच वाचन संपले म्हूणनच  म्हंटले मोबाईलला केले जात आहे बळीचा बकरा  मला मान्य आहे की, मोबाईलमुळे वाचन काहीसे कमीच झाले आहे.मात्र वाचन कमी होण्यामागचे तेच एक कारण नाहीये. आपण जर इतिहासात बघितले तर  कारणे काहीही असो  वाचन मुळातच कमीच होते, असे दिसते.  किंबहुना त्यामुळेच समर्थ रामदास स्वामींना,  ... प्रसंगी अखंडित वंचित जावे असा उपदेश करावा लागला. जरा विचार करा जर रामदास स्वामींच्या काळात वाचन म...

इतर राज्यातील एसटी बसेसचे काय ?

इमेज
मा‌.प्रताप सरनाईक, साहेब परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज   सप्रेम जय  महाराष्ट्र  साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्यातील एसटी बसचे आर्थिक उत्पन वाढावे, आणि प्रवाश्यांना सुरक्षीत प्रवास करता यावा, यासाठी एसटी बस स्टँडपासून २०० मीटरच्या हद्दीत खासगी वाहतूक होणार नाही, हे बघण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे आपण नुकतेच जाहिर केले. एसटीची स्थिती सुधारण्यासाठी आपण उपाययोजना करत आहात,हे बघून आनंद वाटला. आज आपल्या महाराष्ट्रात अनेक पालक आपल्या मुलीला फक्त कमी तिकीट आहे, म्हणून घरापासून दूर असलेल्या गावात शिक्षणासाठी पाठवत आहेत.त्यांना शिक्षणाचा प्रवाहात टिकण्यासाठी एसटी टिकणे आवश्यक आहे. साहेब, मी  एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेच्या मार्फत महाराष्ट्राचा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया या ४ जिल्ह्याचा अपवाद वगळता आपली महाराष्ट्राची एसटी जाते अस्या राज्याच्या काना कोपऱ्यात आणि राज्याबाहेर अहमदाबाद,सुरत, इंदोर, बेळगाव, बंगळूरू,पणजी, वापी आदी ठिकाणी  फिरलोय. या फिरण्यात मला काही बाबी निर्दसनास आल्या आहेत.ज्या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत...