समाजाच्या एका भीषण वास्तवाचे वास्तविक स्वरूप दखवणारे पुस्तक. 'उपरा'
पुस्तकाचे विविध प्रकार असतात जसे कथासंग्रह कांदबरी नाटक वगैरे हे आपणाला माहिती असेलच. या प्रत्येक प्रकारचे काही फायदे तोटे आहेत. त्यातील चरित्र या प्रकारचा विचार केला असता आपणास मोठ्या प्रमाणात सकारात्मकता मिळू शकते अरे या व्यक्तीने इतक्या अडचणीतून प्रवास केला आहे आपल्या अडचणी तर यापुढे अतिशय शुल्लक आहेत आपण परिस्थिती बदलण्यास प्रयत्न केलाच पाहिजे हा विचार आपणास चरित्र आणि आत्मचरित्र वाचनातून मिळू शकतो. तसेच चरित्रे वाचल्यास आपणास दुसऱ्याच्या संघर्षाचे ज्ञान होत असल्याने जर एखादा व्यक्ती संघर्ष करत असल्यास संघर्ष करत असलेल्या व्यक्तीविषयी काहीसे ममत्व देखील निर्माण होते असे अनेक मानस शास्त्रज्ञ सांगत असतात याशिवाय ज्या व्यक्तीने चरित्र किंवा आत्मचरित्र लिहले आहे त्या व्यक्तीने ते लिहताना त्या व्यक्तीला समाजातील विविध समाजघटकांचा त्यास काय अनुभव आलाया विषयी देखील लिहले असते त्या अर्थाने चरित्रे आत्मचरित्रे समाजाचा आरसा देखील ठरतात. चरित्र वाचनातून होणारे हे फायदे लक्षात घेत या २०२६ अर्शी माझ्यावाचनाला काहीसे वळण लागावे म्हणून य वर्षी जास्तीत जास्...