पोस्ट्स

जगातील प्रत्येकाची इच्छा उघड करणारे गाणे

इमेज
जगात एक गोष्ट सोडून सर्व गोष्टींना शेवट आहे.ज्या एकमात्र गोष्टीला अंत नाही, ती गोष्ट म्हणजे मानवी इच्छा. ज्याने या इच्छेवर नियंत्रण मिळवले, त्याने जग जिंकल्यातच जमा आहे,असे आपण सातत्याने ऐकतो वाचतो.या इच्छा वेगवेगळ्या असतात.कोणत्याही दोन व्यक्तींचा इच्छा सारखे असणे कधीच शक्य नाही.कोणाला पैसा हवा असेल कोणाला समाजातील आपले स्थान उंचावण्याची इच्छा असेल. जसे इच्छेला अंत नाही तसेच या इच्छेच्या प्रकाराचा  शेवट नक्की कुठे होतो हे सांगणे देखील तितकेच अवघड आहे,असे देखील आपण ऐकतो वाचतो मात्र दोनच दिवसापुर्वी सहज विरंगुळ्यासाठी युट्युब वरील व्हिडीओ बघत असताना एक व्हिडीओ सजेशनमध्ये दिसला आणि इच्छेला आणि इच्छेच्या प्रकाराला देखील मोजता येईल अशी मर्यादा असल्याची जाणिव झाली.माझ्या वाचक मित्र-मैत्रीणींनो तो व्हिडीओ होता एका गाण्याचा. आज २०२६ साली जे गाणे रिलीज होऊन सुमारे १६+ वर्ष होऊन गेली आहेत अस्या त्या गाण्यात मला इच्छेचा अंत दिसला. ते गाणे होते, एकेकाळी अंगी असलेल्या कलेच्याऐवजी शरीरयष्टी आणि नागरिकत्वाच्या तसेच धर्माचा कारणामुळे विनाकारण चर्चेत आलेल्या अदनान सामी याचे 'मुझको तो लिफ्ट करा दे,...

असल्या भावी अधिकाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राचे भविष्य नकोच!

इमेज
काही दिवसापुर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२७ पासूनच्या पुर्व परिक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटरच्या मदतीने घेण्यात येणार असल्याचे जाहिर केल्यापासून परीक्षा पुर्वीप्रमाणेच घेण्यात याव्यात,यासाठी राज्यभरात भावी अधिकारी (?) आंदोलन करत आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांना कॉम्प्युटर वापरण्याचा पुरेसा सराव नाही, नेटच्या कनेटिव्हीटीची समस्या आहे.या सारख्या तांत्रीक अडचणीसह यू.पी.एस.सी जर ऑफलाईन परीक्षा घेते मग एम.पी.एस.सी ला ऑनलाईन परीक्षा घेण्याची गरज काय या अतिशय भंपक हास्यास्पद कारणासह परीक्षा विविध सत्रात घेतल्यामुळे जे वेगवेगळे पेपर होतील,त्या सर्व क्वेश्चनपेपरमधील डिफिक्लटी लेव्हल (काठीण्य पातळी) एकाच समान पातळीवर कशी ठेवणार? या सारखी बाष्कळ कारणे पुढे करत आहेत. माझा या सर्व भावी अधिकाऱ्यांना (?) एक प्रश्न आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात प्रवेश करणार आहात,त्या क्षेत्रातील आव्हानाची तुम्हाला काही माहिती आहे का? तूम्ही ज्या क्षेत्राचे अधिकारी असाल (झाले तर) त्या क्षेत्रातील लाखो लोकांची जवाबदारी तूमच्या खांद्यावर असेल. तुम्ही ज्या प्रदेशाची जवाबदारी घेणार आहात. त्यात देव न करो पण एखादी दुर्घ...

जगाच्या छप्पराची सफर घडवणारे प्रवासवर्णन :वाट तिबेटची

इमेज
  प्रवासवर्णन   हा   लेखन   प्रकार   मराठीत   मोठ्या   प्रमाणात   रुळला   आहे .  सन   १८५७   साली   गोडसे   गुरुजी   या   नावाने   प्रसिद्ध   असलेल्या   विष्णू   भट   गोडसे   यांनी   लिहलेले   माझा   प्रवास   हे   मराठीतील   पहिले   प्रवासवर्णन   समजले   जाते   १८५७   च्या   पहिल्या   स्वातंत्र्य   युद्धाच्या   वेळी   लेखकाने   ऊत्तर   भारतात   केलेल्या   प्रवासाचे   यात   वर्णन   आहे  .  सध्या   आपल्या   मराठीत  ' अपूर्वाई '  आणि  ' पूर्वरंग ' ' धुक्यातून   लाल   ताऱ्याकडे ' ' माझा   युरोपचा   प्रवास ' ' विलायतेचा   प्रवास '  या   सारखी   अनेक   प्रवासवर्णन   प्रहद   आहेत . किंबहुना   काही   लेखक   फक्त   त्यांच्या   प्रवासवर्णनासठीच ...

‘माझं लंडन’ लंडन शहराच्या अंतरंगाची बाह्यांगाची सहजतेने करून दिलेली ओळख

इमेज
 जग फार मोठ्या विविधतेने नटलंय,सजलंय.यातील काहीच घटकांची, पैलूंची ओळख करून घेयची म्हटले तरी एकच काय अनेक मानवी जन्म अपुरे पडतील.इतकी विविधता जगात आहे. मग ही विविधता अनुभवयाची तर कशी? उत्तर अगदी सोप आहे, इतरांच्या चष्यातून बघत आपण जगाचे हे बहढंगी व्यक्तीमत्व सहज अनुभवू शकतो. इतर लोकांनी त्यांचे जे अनुभव शेअर केले आहेत,ते लिखित असतील तर वाचून किंवा व्हिडीओ स्वरूपात असतील तर बघून किंवा ऑडिओ स्वरूपात असतील तर ऐकुन आपण या अनुभवांच्या मदतीने आपण या विविध छटाच्या जगाशी स्वत:ला जोडुन घेत असतो.वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेली प्रवासवर्णने, अनुभवकथने आपल्याला या बाबत खुपच छान मदत करतात. आपल्या सुद्दैवाने मराठीत हा प्रकार खुपच रूळला आहे. मराठी ही मातृभाषा असलेल्या अनेकांनी त्यांचे जगभरातील अनुभव मराठी भाषेत लिहून मराठीला अनुभवचा विचार करता श्रीमंत केले आहे. व्यवसायाने मुळच्या डॉक्टर असलेल्या मात्र आपल्या डॉक्टरिपेशापेक्षा आपले फिरण्याचे अनुभव जगाला पुस्तक रुपाने सांगितल्यामुळे प्रसिद्ध झालेल्या 'मीना प्रभू' या मराठीला श्रीमंत करणाऱ्यापैकीच एक.मी नुकतेच त्यांचे, 'माझे लंडन' हे पुस्तक वा...

विविध मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन भुमीतील एक दिवस

इमेज
क्रातीसिंह नाना पाटील , भारताचे संरक्षण आणि अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील , राज्याचे महत्त्वाचे गृहमंत्री आर आर पाटिल ,  महाराष्ट्राच्या संस्कृतिक वारस्याचे आधारस्तंभ माडगुळकर आणि मंगेशकर परिवार ,  थोर उद्योजक लक्ष्मणराव किलोरस्कर , समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर , अण्णा भाउ साठे ,  ज्येष्ठ क्रीडापटु विजय हजारे , आपल्या क्षेत्रातील मातब्बर मंडळी , यांचे क्षेत्र वेगवेगळे असले तरी यांच्यात एक समान धागा आहे .  या सर्व मंडळीचा या ना त्या कारणाने सांगली शहर आणि परिसराशी संबंध आला आहे . महाराष्ट्राच्या आर . टी . ओ चा विचार करता महाराष्ट्रात एम एच १० या नावाने प्रसिद्ध असलेल्या या परिसराला मी नुकतीच भेट दिली . खुपच छान अनुभव होता तो . तर वाचक मित्र मैत्रीणींनो , ऑफिसच्या विकली ऑफच्या दिवशी साधरणत : २००किमी अंतरावरील शहराला एका दिवसात फिरण्याचा माझा छंद आहे ‌, हे आपणास एव्हाना माहिती झाले असेलच . अनेकांना ऑफिसच्या विकली ऑफच्या दिवश...