पोस्ट्स

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

इमेज
  माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्रतिक्रियांमध्ये एकाने  मला विचारले होते की, अजिक्य  कोणती पद्धत वापरून पुस्तके निवडतो . म्हणजे तू माहितीवर पुस्तके मोठ्या संख्येने वाचतो. हे माहिती आहे मात्र विविध विषयावरची माहिती देणारीं पुस्तक असताना,  एखादे  पुस्तक वाचायचे किंवा एखादे पुस्तक वाचायचे नाही हे तू कोणते निकष वापरून ठरवतो हे मला जाणून घेयला आवडेल. तर माझे आजचे लेखन याच प्रश्नाच्या उत्तरासाठी तर मित्रानो माझ्या पुस्तक निवडण्याचे दोन निकष आहेत .पहिला निकष आहे लेखकाचा तर दुसरा निकष आहे विषयाचा. मी माझे वाचन भाग ४  मध्ये सांगितल्याप्रमाणे माझे आवडते  लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि गिरीश  कुबेर. (आता मला ते लेखक की आवडतो हे ज्यांना माहिती करायचे असेल त्यांनी या लेखालिकेचा भाग क्रमांक ४ वाचावा.त्या ठिकणी मी हा मुद्दा सविस्तर मांडल्याने तो पुन्हा इथे मांडत नाही ) या दोन्ही लेखकांनी नवीन काही लिहले कि ते वाचण्यास माझी पहिली पसंती आहे मी आतार्यंत अच्युत...

होय महात्मा गांधींमुळेच !

इमेज
नेत्रदानाचा एका सुप्रसिद्ध जाहिरातीत अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे, कुछ लोंगो केलीय मेरी आवाज ही मेरी पहचान है! आपल्या भारताच्या संदर्भात हे वाक्य म्हणायचे झाल्यास महात्मा गांधी हीच काही लोकांसाठी भारताची ओळख आहे.अमेरीकेत कृष्णवर्णीयांचा हक्कांसाठी लढा उभारणारे मार्टिन ल्युथर किंग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन म़डेला ही त्यापैकी काही प्रमुख नावे .मात्र दुर्देवाने आपल्या भारतात काही उजव्या लोकांकडून त्यांची खिल्ली उडवली जाते‌.पाकिस्तानचा निर्मितीचे पाप त्यांच्या गळ्यात मारले जाते. जनभावना सरदार पटेल यांनी भारताचे पहिले पंतप्रधान व्हावे, ही  असताना, पंडीत नेहरु यांना स्वत:ची इच्छा म्हणून पंतप्रधान केले असा आरोप करतात.मात्र  हे लोक विसरतात की, महात्मा गांधी आहे, म्हणून आपला भारत देश आज टिकून आहे.जगातील चौथी मोठी आर्थिक ताकद आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान मान्य करावेच लागेल.त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला जनसामान्यापर्यत पोहचवले.क्रांतीकारकांच्या मार्गाचा अवलंब प्रत्येक सर्वसामान्य नागरिक  करू शके...

वाचनाची इच्छा आहे पण ... (माझे वाचन भाग क्रमांक ७ )

इमेज
 मला अनेक व्यक्ती  अश्या भेत ट असतात ,ज्या  मला सांगत असतात अरे अजिंक्य काय आहे ना आम्हाला वाचायला आवडते. पूर्वी मी देखील तुझ्यासारखी अनेक पुस्तके  वाचली आहेत.पण आता काय हे ना ? रोजचा दिवस एर्व्हढा बिझी जातो ना की,वाचायला वेळच भेटत नाही. पण मी वाचणार आहे /कोणी मला असे सांगितले कि मला हसायला येते. जर अय वे मिळत नसेल तर पुढे भविष्यात काय चमत्कार होणार आहे ज्यामुळे त्यांना वाचायला वेळ मिळणार आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती असो   माझे म्हणाल तर माझ्या बँगमध्ये नेहमी एक पुस्तक असतेच जर कोणाला भेटायला गेलो आंणि त्या ठिकाणी व्यक्ती भारतीय प्रमाणवेळेला जागून उशिरा आली तर मोबाईल बघण्यापेक्षा मी पुस्तक वाचायला सुरुवात करतो.  मी घरापासून दूर राहत असल्याने मेसमध्ये जेवतो  त्यावेळेस सुद्धा मेसमध्ये नंबर येण्यापर्यंत वाचू शकतो मी माझे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात दिले आहे .आपण आपल्या  रुटीन प्रमाणे यात बदल करू शकतात. ऑफिसमध्ये चहा पिणे जेवण करतो या वेळेस सादर गोष्ट लवकर करुंन आपण वाचण्यास सुरवात करू शकतो. एखादा व्यक्ती प्रवाश्यात वाचू शकतो .एखादा...

मानववतेच्या तिर्थस्थानाची माहिती देणारे पुस्तक "आनंदवन प्रयोगवन'

इमेज
  जे दुःखी, कष्टी आणि पीडित आहेत, त्यांना जो माणूस आपलं मानतो, तोच खरा साधू (संत) आहे आणि त्याच्या ठिकाणीच देव वास करतो हे सांगणारा संत तुकाराम यांचा  'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा अभंग सुरसिद्ध आहे.अभंग सुप्रसीद असला तरी प्रत्यक्षात त्या प्रमाणे वागणारे हाताचा बोटावर मोजता येतील इतकेच लोक आचरण करत असल्याचे आपणास सहज दिसते. या मोजक्या लोकांमध्येच मोजता येतील असे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे होय. बाबा  आमटे यांनी कुष्ठरोगी, दिव्यांग, वनवासी व्यक्ती आणि यासारख्या समाजातील मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या नागरिकांना समजाजच्या मूळ प्रवाहात आणण्यसासाठी  लोक बिरादरी, हेमलकसा, आनंदवन सोमनाथ आदी प्रकल्प उभारले आहेत . या प्रकल्पाची माहिती देणारी पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध आहेत अश्याच प्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकांपैकी एक  म्हणजे बाबा आमटे यांचे सुपुत्र असलेल्या डॉ विकास आमटे यांनी लिहलेले "आनंदवन लोकवन हे पुस्तक .या पुस्तकात  डॉ विकास आमटे  "आनंदवन चा इतिहास उलगडला आहे .हे पुस्तक मी नुकतेच वाचले    ...

क्वांटम तंत्रज्ञान : भविष्यातील जगाची किल्ली

इमेज
          सध्याचे जग हे तंत्रज्ञांचे म्हणायला सुरवात होऊन आता सुमारे अडीच पिढ्यांचा काळ उलटून गेला आहे . आताचे जग आहे क्वांटम तंत्रज्ञानाचे .   २१ व्या   शतकातील विज्ञानतंत्रज्ञान क्षेत्राचे चित्र पूर्णतः बदलवून टाकणारा शोध म्हणजे क्वांटम फिजि   नेहमीच्या कम्पुटरच्या मर्यादा ओलांडणारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष   प्रयत्न केले   या शास्त्रज्ञांमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावेच   लागेल ते म्हणजे .   जॉन क्लार्क , मिशेल एच . डेवोरेट आणि जॉन एम . मार्टिनिस .   यांचे नाव घ्यावेच लागेल किंबहुना या शासत्रज्ञांचे नाव न घेता क्वांटम कम्पुटिंग चा विचार केला तर हाती फक्त आणि फक्त शून्य राहील इतके मोठे योगदान या शास्त्रज्ञाचे आहे .   या तीन शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे , आणि याच योगदांबद्दल त्यांना २०२५ चा फिजिक्सचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे .   जॉन क्लार्क हे प्रायोगिक...