पोस्ट्स

विनाशकाले...

इमेज
आजपासून साधरणत: आठवड्याभरापूर्वी राज्य सरकारने एसटी महामंडळाबाबत एक निर्णय घेतला. महामंडळाच्या जागा खासगी विकासकाच्या माध्यमातून ४९ वर्ष इतक्या दिर्घ मुदतीच्या कराराने विकसीत करण्याचा. मुळात एसटी महामंडळाची आजची आर्थिक स्थिती बघता, महामंडळ पुढचे वर्ष तरी बघू शकेल का?असी स्थिती असताना राज्य सरकारने थेट अर्ध शतक वर्षासाठी महामंडळाची जागा खासगी विकासकांना देण्याचा निर्णय घेतला. या जागा विकसीत करुन त्याद्वारे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारली जाईल,असे यावेळी राज सरकारकडून सांगण्यात आले.  कोंबडी रोज एक सोन्याचे अंडी देत असताना सर्वच अंडी एकाचवेळी मिळावी,यासाठी कोंबडीला मारले असता,एकही अधिकचे अंडे न मिळता कोंबडी मरुन जाण्याची कथा आपण पंचततंत्रात वाचली असेल.माझा मते राज्य सरकारचा निर्णय याच पथडीतील आहे.  एसटी महामंडळाच्या जागा शहरात मोक्याचा ठिकाणी आहेत. त्यांचे क्षेत्र ही मोठे आहे.ही गोष्ट विचारात घेता एकेका जमिनीची किंमत डोळे पांढरे करणारी आहे,हे मान्य केले तरी या जमिनीच्या आधारे आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याचे धोक्याचे आहे.देव न करो पण नाशिकचा ठक्कर बझार सारखा हा प्रकल्प फसला त...

भारताच्या विकासदृष्टीचे समग्र दर्शन घडवणारी मासिके

इमेज
आपल्याकडे  भारताच्या विकासाबाबत विविध दावे प्रतिदावे सातत्याने करण्यात येतात.आपण ज्या माध्यमातून याबाबत माहिती घेतो आहोत त्या माध्यमाच्या विचारसरणीनुसार आपणास माहिती मिळते .जर माध्यम  केंद्र सरकारच्या माताच पुरस्कर्ता असेल तर वास्तवात नसलेली आदर्श स्थिती थंडी अधिक उजळ करून आपल्यापुढे सादर करेल.याउलट जर माध्यम विरोधी पक्षाच्या बाजूचे असेल तर वास्तवातील चांगली बाजू कारण नसताना ऋणात्मक दाखवत भारताची प्रगती दाखवणार नाही . अश्या स्थितीत भारताचे जसे आहे तसे चित्र उभे करणारे कोणतेच माध्यम नाही का स प्रश्न आपणस पडलं असेल तर सांगतो चित्रफारच निराशजनक  नाहीये  आपणास खरे चित्र  समोर करणारी दोन मासिके सहज सापडतात ती म्हणजे स्पर्धा परिक्षतेची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांच्या मुखाशी असणारी मासिकाने अर्थात योज़ना आणि कुरुक्षेत्र . मी हो दोन्ही मासिके गेली सुमारे १५ वर्ष नियमिपणे वाचत असे सुरुवातीला मराठी भाषेतील वाचत असे आता मात्र थेट इंग्रजी भाषेतील वाचतो  . भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित होणारी ही दोन्ही मासिके देशाच्या विकास प...

बदलत्या काळाची दिशा ओळखत 'साप्ताहिक सकाळ'चे स्वागतार्ह्य पाउल

इमेज
आपल्या मराठीला साप्ताहिकाची मोठी परंपरा आहे.वेगवेगळ्या विषयावरची साप्ताहिके मराठीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध  आलेली आहेत.समाजाचा  वचनाबद्दलच्या बदलणारा   दृष्टिकोन, आपसातील स्पर्धा, तसेच छपाईच्या दारात झालेली  वाढ या सारख्या अनेक कारणामुळे त्यातील काही बंद देखील पडली आणि अजून देखील  बंद होत आहे . मात्र डार्विनचा सक्षम तोच टिकणार या सिद्धांतानुसार काही साप्ताहिकांनी काळाची पाऊले उचलत आपल्यामध्ये  मोठ्या प्रमाणात बदल करत आजदेखील त्यांच्या वाचकवर्ग खप मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवला आहे. या कालानुरूप बदललेल्या साप्ताहिकांमध्ये नवा घ्यावेच लागेल ते म्हणजे साप्ताहिक सकाळचे सकाळ माध्यम समूहाचे पूर्णतः राजकारणावर आधारित साप्ताहिक 'सरकारनामा 'या दही अनेकदा छापील स्वरूपात आले आणि बंद होऊन ऑनलाईन स्वरूपात घेणे .मात्र गेली ४० वर्ष छापील रूपात प्रसिद्ध होणारे त्याच माध्यम  वॉमूहाचे साप्ताहिक मात्र अजून टिकून आहे  सध्याचा साप्तहिक सकाळचे  वैशिष्ट  म्हणजे विशेषांक होय. सध्या साप्ताहिकाचा  प्रत्येक अंक  एक विशेषांक असतो. एका व...

साधना’ साप्ताहिक – प्रबोधनाची परंपरा जपणारे मराठी साप्ताहिक

इमेज
साप्ताहिकांनी फार पूर्वीपासून समाजाचे मनोरंजन करण्यासह त्यांना विविध प्रकारची माहिती देण्यात मोठी भूमिल्का बजावली आहे . रोज प्रसिद्ध होणाऱ्या न्यूजपेपरमधून ज्या गोष्टी वेळेच्या प्रेशरमुळे  येणे अवघड आहे . महिन्याच्या अंतराने दिल्यास खूप उशीर झालेला असू शकतो त्या गोष्टी देण्याचे मोठे काम साप्ताहिकाने  केल्याचे आपणास सहजतेने दिसते .  आपल्या मराठीत अनेक विषयावरची अनके विचारधारणेची साप्ताहिके आली आणि अनेक  कारणाने बंद  देखील  पडली मात्र विविध अडचणींना तोंड देत काही अजून देखील सुरु आहेत .या सुरु असलेल्या साप्तहिकापैकीच एक म्हणजे पुणे शहरातील शनवार पेठ येथून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक साधना  साधना’ हे मराठीतील एक प्रतिष्ठित साप्ताहिक आहे ज्याची  स्थापना १९४८ साली साने गुरुजी यांच्या प्रेरणेने झाली. समाजातील प्रबोधन, समता, न्याय आणि मानवी मूल्ये यांचा प्रसार करणे हा या साप्ताहिकाचा मूलभूत उद्देश आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी‘साधना’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजच्या काळात मागे पडलेल्या किंबहुना...

मुंबईच्या ऐतिहासिक गिरणी कामगाराच्या संपानंतरची गुन्हेगारी विश्वाची माहिती देणारे पुस्तक, 'भायखळा ते बँकॉक'

इमेज
  मुंबई,  आपल्या भारताची आर्थिक राजधानी, जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या भारतीय सिनेमाचे मुख्य केंद्र (बॉलिवूड ही संज्ञा प्रामुख्याने हिंदी चित्रपटांना वापरतात हिंदीत्तेर भाषांसाठी वेगवेगळी नवे आहेत सबब भारतीय सिनेमा )“भारताच्या लोकसंसंख्येंत सुमारे ९ टक्के प्रतिनिधित्व करणाऱ्या  महाराष्ट्राची राजधानी मुबई . मुळात सात बेटावर वसलेल्या या शहराची वेगाने जडणघडण सुरु होते . ती पोर्तुगीजांनी लग्नात हुंडा म्हणून ब्रिटिशांना मुंबईचा प्रदेश दिल्यावर .तेव्हापासून आता २०२६ पर्यतचा शहराचा आढावा घेतल्यास गिरणी कामगारांचा ऐतिहासिक म्हणता येईल असा संपाचा उल्लेख करावाच लागेल. या संपामुळे मुंबई शहराचाचेहरामोहरा खूपच मोठ्या प्रमाणात बदलला या बदलात तेथील मराठी समाजजीवन आणि आर्थिक उलाढाल हे तर बदललेच त्याशिवाय ज्याला आता  अंडरवर्ल्ड  म्हणतात ते विश्व देखील मोठ्या प्रमाणात बदलले गिरणी कामगारांच्या संपामुळे आलेल्या आर्थिक  अडचणीवर मात करण्यासाठी येथील अनेक  तरुण गुन्हेगारीकडे वळाले आणि मुंबईतील गुन्हेगारीने वेगळे वळण घेतले या वेगळ्या वळणाची आपणास माहिती होते ती ...

जगातील प्रत्येकाची इच्छा उघड करणारे गाणे

इमेज
जगात एक गोष्ट सोडून सर्व गोष्टींना शेवट आहे.ज्या एकमात्र गोष्टीला अंत नाही, ती गोष्ट म्हणजे मानवी इच्छा. ज्याने या इच्छेवर नियंत्रण मिळवले, त्याने जग जिंकल्यातच जमा आहे,असे आपण सातत्याने ऐकतो वाचतो.या इच्छा वेगवेगळ्या असतात.कोणत्याही दोन व्यक्तींचा इच्छा सारखे असणे कधीच शक्य नाही.कोणाला पैसा हवा असेल कोणाला समाजातील आपले स्थान उंचावण्याची इच्छा असेल. जसे इच्छेला अंत नाही तसेच या इच्छेच्या प्रकाराचा  शेवट नक्की कुठे होतो हे सांगणे देखील तितकेच अवघड आहे,असे देखील आपण ऐकतो वाचतो मात्र दोनच दिवसापुर्वी सहज विरंगुळ्यासाठी युट्युब वरील व्हिडीओ बघत असताना एक व्हिडीओ सजेशनमध्ये दिसला आणि इच्छेला आणि इच्छेच्या प्रकाराला देखील मोजता येईल अशी मर्यादा असल्याची जाणिव झाली.माझ्या वाचक मित्र-मैत्रीणींनो तो व्हिडीओ होता एका गाण्याचा. आज २०२६ साली जे गाणे रिलीज होऊन सुमारे १६+ वर्ष होऊन गेली आहेत अस्या त्या गाण्यात मला इच्छेचा अंत दिसला. ते गाणे होते, एकेकाळी अंगी असलेल्या कलेच्याऐवजी शरीरयष्टी आणि नागरिकत्वाच्या तसेच धर्माचा कारणामुळे विनाकारण चर्चेत आलेल्या अदनान सामी याचे 'मुझको तो लिफ्ट करा दे,...

असल्या भावी अधिकाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राचे भविष्य नकोच!

इमेज
काही दिवसापुर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२७ पासूनच्या पुर्व परिक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटरच्या मदतीने घेण्यात येणार असल्याचे जाहिर केल्यापासून परीक्षा पुर्वीप्रमाणेच घेण्यात याव्यात,यासाठी राज्यभरात भावी अधिकारी (?) आंदोलन करत आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांना कॉम्प्युटर वापरण्याचा पुरेसा सराव नाही, नेटच्या कनेटिव्हीटीची समस्या आहे.या सारख्या तांत्रीक अडचणीसह यू.पी.एस.सी जर ऑफलाईन परीक्षा घेते मग एम.पी.एस.सी ला ऑनलाईन परीक्षा घेण्याची गरज काय या अतिशय भंपक हास्यास्पद कारणासह परीक्षा विविध सत्रात घेतल्यामुळे जे वेगवेगळे पेपर होतील,त्या सर्व क्वेश्चनपेपरमधील डिफिक्लटी लेव्हल (काठीण्य पातळी) एकाच समान पातळीवर कशी ठेवणार? या सारखी बाष्कळ कारणे पुढे करत आहेत. माझा या सर्व भावी अधिकाऱ्यांना (?) एक प्रश्न आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात प्रवेश करणार आहात,त्या क्षेत्रातील आव्हानाची तुम्हाला काही माहिती आहे का? तूम्ही ज्या क्षेत्राचे अधिकारी असाल (झाले तर) त्या क्षेत्रातील लाखो लोकांची जवाबदारी तूमच्या खांद्यावर असेल. तुम्ही ज्या प्रदेशाची जवाबदारी घेणार आहात. त्यात देव न करो पण एखादी दुर्घ...