पोस्ट्स

चला, आत्महत्या या विषयवार मनमोकळा संवाद साधूया !

इमेज
आत्महत्या फक्त शब्द नाहीये . जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता , त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या होतात . त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात . आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो . हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा , समाजात आत्महत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा आत्महत्याविरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो . हा दिन २००३ पासून जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेतर्फे ,(The International Association for Suicide Prevent...

गणपती उत्सवाच्या निमित्ताने खास

इमेज
  वाचक मित्रानो आणि मैत्रीणीनो तुम्ही दहीहंडी उत्सवाच्या आंनद घेत असताना हा लेख वाचत असल्याची दाट शक्यता आहे कृष्ण भक्तीत रममाण झाल्यावर साधारणतः १२ दिवसांनी (जन्माष्टमी नंतर ८ दिवसानी पोळा आणि त्यानंतर ४ दिवसानी गणेश चतुर्थी या हिशेबाने) आपण बुद्धीची देवता गणरायाचे आगमन तितक्याच भक्ती भक्तिभावाने करू. (सध्याचा वादंग त्यावेळी मोठ्या प्रमाणात शांत झाला असेल) याची मला तरी खात्री आहे. या गणेशोत्वाच्या काळात आपण गणपतीच्या विविध मंदिरात त्याची मोठ्या श्रद्धेने पूजा करत असू. ही पूजा आपणास जास्तीत आनंदायी ठरो यासाठी गणपतीच्या विशेष प्रसिद्ध नसलेल्या साडेतीन स्थानची माहिती देण्यासाठी सदर लेखन. या सर्व ठिकाणी मी वेगवेगळ्या वेळी भेटी दिल्या आहेत सर्व ठिकाणी माझा अनुभव मन प्रसन्न करणारा होता. बुद्धीची देवता असलेल्या गणरायाच्या सुखकर्ता विघ्नहर्ता रूपाचे दर्शन मला सर्व ठिकाणी झाले. गणपती केवळ बुद्धीची देवता नाही तर प्रसंगी दात तूटला तरी चालेल भक्तांना त्रास देणाऱ्या असुरांचा संहार करणारी देवता देखील आहे या एकदंत गजाननाचे दर्शन मला सर्वच ठिकाणी झाले मला हे माहिती आहे कि अनेक वाचकांचा गणपतीची सा...

आम्हाला वाहक हवेच..;

इमेज
प्रति  प्रताप सरनाईकजी  परिवहन मंत्री,  महाराष्ट्र राज्य यांच्या सेवेशी सप्रेम जय महाराष्ट्र  साहेब मी खासगी क्षेत्रात  नोकरी करत असलो तरी एसटी बसचा चाहता आहे. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेच्या फायदा घेत महारष्ट्राचा  कानाकोपरा अनेकदा पालथा घातला आहे. या प्रवाशामध्ये मला सर्वात जास्त मदत झाली असेल तर ती आपल्या एसटी महामंडळाच्या वाहकांची. आपल्या एसटी महामंडळाचे वाहक हे प्रवाशांसाठी अक्षरशः देवदूत असतात. कोणत्या प्रवाशास कुठे उतरायचे आहे? हे लक्षात घेत अचूकपणे त्याविषयी चालकाला सांगणे आणि प्रवासी पूर्ण उतरला आहे याची खात्री करूनच चालकाला बस पुढे नेण्यासाठी सुचना करणे याबाबत वाहक आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडतात. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. सर्व प्रवाशांनी तिकीटू घेतली आहेत ना ? कोणाचे पैसे देणे बाकी आहे का?  तसेच सध्याचा ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या मिश्र जगात पैश्याचे अचुक हिशोब ठेवण्याचे काम आपले वाहक करत असतात. मात्र असे असुन देखील एसटी महामंडळ नफ्यात आणण्यासाठी अनावश्यक खर्चात कपात व्हावी, या हेतूने आपण वाहकांवरील खर्च कम...

प्रवास एका ध्यासपुर्तीचा 'माझंही एक स्वप्न होतं’

इमेज
अमिताभ बच्चन यांच्या नेत्रदानाविषयी टिव्हीवरील एका  जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे त्यावेळेस कॅमेरा त्यांच्या पायावर स्थिर असतो कुछ लोगों के लिए मेरी आवाज ही मेरी पहचान है!  भारतातील सर्वात मोठा सहकारी दुग्ध प्रकल्प असणाऱ्या अमूल बाबत सुद्धा आपल्याला असेच म्हणता येईल भारतातील दुग्ध प्रकल्प म्हणजे अमूल असीच जगभरात फार मोठ्या प्रमाणात ओळख आहे. अमुल टेस्ट ऑफ इंडिया अमुल दूध पीता हे इंडिया अर्टली बर्टली डेलिशियस अमुल या  अनेक स्लोगननी अमुलला आपल्या भारताच्या घराघरात स्थान दिले आहे. मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना स्पर्धा परिक्षेचा सुद्धा अभ्यास करत होतो त्यावेळेस कॉलेज संपल्यावर क्लासला जाण्याचा आधी जो थोडासा मोकळा वेळ मिळत असे. त्यावेळेस पोट भरण्यासाठी मी अमुल कुल  पीत असे. आपला देखील अमुलबाबत हाच अनुभव असेल असो  गुजरात मधील काहीसा दुष्काळी भागातील असणाऱ्या आनंद या गावी  केरळी ख्रिश्चन असलेल्या वर्गिस कुरीयन यांनी  कष्टाने उभारलेल्या प्रकल्प म्हणजे अमुल. भारतातील दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी  वर्गीस कुरियन यांनी दिलेल्या योगदानामुळे आपण त्यांना मिल्...

तू. जाता मागे उरेल काय !

इमेज
आपल्या मराठी भाषेतील एक प्रतिभान कवी भा.रा तांबे त्यांची एक सुप्रसिद्ध  कविता आहे.  'जन पळभर म्हणतील हाय हाय तू जाता राहील काय'. माणसाचा मृत्यूनंतर त्याचे अस्तित्व काय, असते? जगात तो नसल्याने कोणाचेही काही अडत नाही जग त्याच्या रहाटीला नित्यनियमाला कर्माला सुरूच ठेवते.  तेव्हा माणसाने कोणत्याही गोष्टीचा विनाकारण गर्व करू नये. हे या कवितेत सांगण्यात आले आहे. आज 30 ऑगस्ट 2026 रोजी ही कविता मला एका वेगळ्या अर्थाने आठवते आहे. कारण आज 30 ऑगस्ट 2026 रोजी पेशवाईचा विचार करता अत्यंत कमी काळासाठी राजेपदावर बसलेल्या नारायणराव पेशवे यांचा  त्यांचाच काकांनी रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबा दादांनी मारेकरी घालून शनिवार वाड्यातच हत्या केल्याच्या घटनेला 243 वर्षे पूर्ण होत आहेत.  रघुनाथराव हे अत्यंत पराक्रमी होते. त्या वेळेच्या लोकांचा विचार करता रघुनाथराव हेच पेशवे पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार होते.  रघुनाथरावांनी मराठेशाहीला अनेक लढाईत असामान्यरीत्या विजय मिळवून दिले, हे सर्व मान्य केले, तरी आज रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांच्या विचार केला असता ती हत्याच चटकन येते. त्यांनी के...

सध्याच्या ऑनलाईनच्या तडाख्यात टिकून राहिलेले पाक्षिक 'वाटसरू'

इमेज
  सध्या सर्वच गोष्टी सहजतेने ऑनलाइन मिळत असल्याने छापील माध्यमांना काहीसा कठीण का आला आहे.  घटलेली वाचक संख्या आणि या घटलेल्या वाचक संख्येमुळे  रोडवलेल्या जाहिराती.कमी झालेल्या  जाहिराती मुळे घसरलेले  उत्पन्न आणि कमी उत्पानमुळे इच्छा असून देखील अनेक उपक्रम राबवता येणे अवघड होणे आणि  उपक्रम नसल्यामुळे वाचक संख्या अजूनच कमी होणे  आणि परत सुरुवातीपासून सांगितलेले चक्र सुरू  सुरु होणे या चक्रात  सध्या छापील नियतकालिके  अडकलेली आढळतात. या चक्रामुळे अनेक नामवंत प्रतिष्ठित अशी नियतकालिकाने बंद देखील पडली. इंग्रजी आणि हिंदी भाषेतील नियतकालिकांची स्थिती अन्य प्रादेशिक नियतकालिकांपेक्षा तुलनेने काहीशी बरी आहे इतकेच  .लॉक डाऊन नंतर इंग्रजीतील सायन्स रिपोर्टर तसेच इकोनॉमिकल अँड पोलिटिकल विकली सारखी नामांकित इंग्रजी नियतकालिके बंद पडली लोकसत्ता चे भावंडं असलेले लोकप्रभा हे साप्ताहिक आणि  मूळचे गुजराती असलेले मात्र मराठी सारख्या अनेक भाषेत प्रसिद्ध होणारे चित्रलेखा हि दोन दोन साप्ताहिके बंद होऊन बराच काळ लोटला .  मात्र असे असून देखील का...

स्वामी विवेकानंदाचे विचार समजण्यासाठी वाचावेच असे पुस्तक, 'हिंदूतेज जाग रे'

इमेज
स्वामी विवेकानंद. साडेसात अक्षरी शब्द, मात्र मात्र ज्यांचे नाव घेतल्यावर प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने गौरव आणि भरून येते असे भारताचे अत्यंत महत्त्वाचे सुपुत्र 19 या शतकाचा शेवटी जेव्हा भारत आपला प्राचीन गौरवशाली इतिहास विसरला होता सत्व विसरला होतात त्यावेळेस भारतीय  आपल्या प्राचीन गौरवाची वारस्याची आठवण करून देणारा त्याच वेळी जगाला भारताची नवी ओळख करून देणारा योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद. उणेपुरे 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या कार्याची सांगावी तेवढी महती कमीच‌ त्यांचे ओजस्वी विचार आज देखील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगाची आहेत आज देखील त्यांचे विचार तितकेच प्रासंगिक आहेत. 21 वर्षांनी आपण भारताचा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असू त्यावेळेस आपण जे भारताचे महासत्ता हे स्वप्न बघत आहोत ते सत्यात उतरण्यासाठी काय करावे लागेल काय केल्याने ही एकेकाळी जगद्गुरु माता म्हणून ओळखले जाणारे भारत भूमी पुन्हा एकदा आपले वैभव प्राप्त करेल हे माहिती करुन घेण्यासाठी आपणास स्वामी विवेकानंद यांचे विचार माहिती असणे अत्यावश्यक आहेच याची  खात्री आपणास पटते ते स्वामी विवेकानंद यांच...