पोस्ट्स

आयुष्यात काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावेच, असे पुस्तक 'दिनचर्या'

इमेज
 महान व्यक्ती कोणतेही वेगळे काम करत नाहीत तर आपण जे काम करतो तेच काम करतात मात्र आपण करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतात त्यामुळे ते महान होतात असे एक सुप्रसिद्ध इंग्रजी वाचन आहे. हा वेगळेपणा त्यांनी त्यांच्या आयुष्याला एक शिस्त लावून घेतल्यामुळे आलेला असतो आपण सुद्धा आयुष्याला शिस्त लावून घेतल्यास आपण सुद्धा सहजतेने महान म्हणून देऊ शकतो मात्र केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीनुसार सुरुवात करायची तीच काय अडचण.  आता जर आता तुम्हाला वाटले की आपल्याला सुरुवात करायची पण कुठून सुरुवात करायची कोण मार्गदर्शन करेल तर  विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित दिनचर्या याशिवाय उत्तम पर्याय तो कोणता असेच म्हणावे लागेल मी नुकतेच हे पुस्तक वाचले आहे त्या पुस्तक वाचनातून आलेल्या अनुभवातून हे सांगत आहेत   विवेकानंद केंद्र कन्याकुमारी संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त निमित्त साधत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाश विभागातर्फे तीन पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली होती ज्यामध्ये अत्यंत सोप्या चटकन आकलन हो...

आयुष शेटी : भारतीय बॅडमिंट क्षेत्रातील नाव उगवता तारा

इमेज
१७ ऑगस्ट २०२६ हा दिवस भारतासाठी सुवर्णक्षणांनी नोंदवण्यात येईल कारण नवी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशप मध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी अत्यंत चमकदार कामगिरी केली. बुद्धिबळ या वैयक्तिक खेळात भारतीय गेल्या कित्येक वर्षापासून चमकदार कामगिरी करत होतेच त्यामध्ये ॲथलेटिक्स ची भर पडल्याची आपण या कॉमनवेलमध्ये बघितलेच आता यामध्ये बॅडमिंटनची सुद्धा भर पडलेली आहे हे आपण या बॅडमिंटन चॅम्पियनशॉपमध्ये बघता आहोतच. तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असाल मोदीविरोधक असाल मोदीचे समर्थक असाल भारतीय खेळाडूंकडे ज्या पद्धतीने सध्या लक्ष देण्यात येत आहे हे नाकारू शकत नाही भारतीय खेळाडू विविध स्पर्धांमध्ये जी कामगिरी करत आहेत ती खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि त्याची ही झलक आपणास विविध स्पर्धांमध्ये भारतीयांनी घेतलेल्या पदकांमध्ये दिसत आहेच दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटनशिपमध्ये पहिल्या दिवशी सर्वचभारतीय खेळाडूंनी आपले सामने खिशात घातलेले असले तरी यामध्ये उठून दिसला तो 21 वर्षीय आयुष शेट्टी गेल्या काहीही स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत असणाऱ्या आयुषची कामगिरी याही स्पर्धेत अत्यंत उठावदार होत आ...

जीवनपट: लोकांप्रती कर्तव्याची जाणिव असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा

इमेज
भारत, जगातील २१०देशांपैकी लोकसंख्येच्या बाबत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमकाचा देश.क्षेत्रफळाचा विचार करता जगातील सातवा मोठा देश,  हिमालय सारखा बर्फाळ प्रदेश राजस्थानमधील वाळवंटाचा प्रदेश कोकणाचा समुद्रकिनारा ,उत्तर प्रदेश बिहार मधील गाळाची मैदाने ,इशान्य भारत आणि मध्यप्रदेश मधील विपुल वनसंपत्ती त्याचवेळी कच्छ मधील विराण भुमी. जगातील सर्व प्रकारची भौगोलिक विविधता एकटकवेला प्रदेश या बरोबर २२ अधिकृत भाषा, तसेच हजारोंच्या संख्येत मोजता येतील अस्या त्यांचा बोलीभाषा, ज्यु धर्मीय वगळता जगातील प्रत्येक प्रमुख धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदणारा देश म्हणजे आपला भारत अस्या या बहुधंगी, बहुरंगी देशाचे प्रशासन चालवणे मोठे कष्टाचे काम. त्यासाठी विस्तृत अशी यंत्रणा उभारणे आलेच. ही  यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी  नियम सुद्धा आलेच. भारतीय संविधानाचा कलम 304 ते 314 मध्ये ते सुद्धा आहेतच. मात्र हे प्रशासन ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी भल्यासाठी प्रगतीसाठी झटणार आहे. त्यांना या प्रशासनाचा फायदा होतो की जाचच ठरतो आहे. हा मात्र प्रश्न अनुत्तीतच राहिला आपल्या भारतात. प्रशासन खरंच लोकांना...

एका पिढीचा कालखंड सरून देखील समस्या त्याच

इमेज
  कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल १९९७ साली  सकाळच्या दिवाळी अंकासाठी फटका या काव्यप्रकारातील कविता लिहली होती .ज्याची मध्यवर्ती कल्पना स्वातंत्र्यदेवता भारतीयांना अरे बाबानो स्वातंत्र्य मिळून आता ५० वर्षे झाली आहेत आता तरी या समस्या कायमच्या सोडवा असे सांगत आहे ही  होती. 'स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ' असे शीर्षक असलेल्या या सुप्रसिद्ध कवितेला पहिल्यांदा प्रसिद्ध होऊन आता लवकरच ३० वर्षे अर्थात एका पिढीचा कालखंड पूर्ण होईल तर  ज्या घटनेचा संदर्भ घेत हि कविता लिहण्यात आली होती. त्याला ३० वे वर्ष येत्या शनिवारी जेव्हा आपण ८० व स्वातंत्र्यदिन साजरा करत असू तेव्हाच पूर्ण होईल  या ३० वर्षात आपण यात सांगितलेल्या कोणत्या उणिवांवर मात केली .कोणत्या समस्या तेव्हा होत्या त्याच स्थितीत आहेत .कोणत्या समस्या पूर्ण सुटल्या नसल्या तरी त्यात बऱ्यापैकी मात केली आहे तसेच कोणत्या समस्या गेल्या ३० वर्षत अजूनच चिघळला आहेत याचा आढावा घेतला तर समोर येणारे चित्र फार अनुकूल म्हणता येण्यासारखे नाही . असे दुःखाने म्हणावे लागतेय  या कवित...

वारसा ६७ वर्षाचा

इमेज
  १३ ऑगस्ट १९६० या दिवसाला मराठी पत्रकारितेत अनन्य साधारण महत्व आहे .नुकत्याच काही महिन्यापूर्वी द्विभाषिक मुंबई राज्यातून मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य साकारले होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यासाठी मराठी व्यक्तीने मोठा लढा उभारला होता. या संघर्षातून मिळालेल्या महाराष्ट्राचा तेथील जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न सर्वच जण करत होता.मात्र से असून देखील  त्यावेळी असणाऱ्या अनेक समस्यांना वाचा फोडण्यात येत नव्हते .मात्र ते विषय महत्वाचे होते समाजावर या समस्यांचा मोठा परिणाम होत होता   अश्या या वातावरणात ज्याच्या घरात समाज सुधारणेचा मोठा वारसा आहे अश्या तिशीतील एक युवक  जो मुळात एका नावाजलेल्या साप्ताहिकात व्यंगचित्रकार म्हणून काम करत आहे तो तेथील नोकरी सोडून स्वतःचे एक व्यंगचित्राद्वारे सामाजितल उणिवा अवगुणांवर कोणालाही त्रास होणार नाही मात्र अचूक संदेश देता येईल  असे साप्ताहिक सुरु करण्याचा तो दिवस आहे. त्या तिशीतील युवकाने सुरु केलेले साप्ताहिक अजून देखील सुरु आहे आज या साप्तहिकाला पण मार्मिक म्हणून ओळखतो आणि ते सुरु करणारे होते श्रद्धेय आदरणीय हिंद...

इथेनॉलच्या चुलत भावाच्या दिनाच्या निमित्ताने

इमेज
इथेनॉलच्या  चुलत भावाच्या दिनाच्या निमित्ताने .. ! शीर्षक वाचून गड्बडलात का ? आधीच इथेनॉलमुळे  गाड्या खराब होत आहेत. जिथे आठवड्याला एकदा गाडीच्या इंधनाची टाकी फुल केली तरी चालत होते तिथे मायलेज कमी झाल्याने आठवड्यातून दोनदा काही  ठिकाणी तर तीनदा पेट्रोल भरायला जावे लागत आहे .या जास्त वेळा पेट्रोल भरायला जावे लागत असल्याने पाकिटावर जास्तीचा भर आला आहे तर या इथेनॉलला चुलत भाऊ देखील आहे विशेष म्हणजे त्याचा साठी एखादा आंतराष्ट्रीय दिन देखील साजरा करण्यात येतो असे एक ना अनेक प्रश्न तुमच्या मनातशीर्षक वाचून आले असल्याची शक्यता आहे तर सांगतो   आजपासून १३३ वर्षांपूर्वी अचूकपणे सांगायचे झाल्यास १८९३ ऑगस्ट १० या दिवशी सर रुडॉल्फ डिझेल यांनी पारंपरिक कोळसा डिझेल यान पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून शेंगदाणा तेलाचा वापर करत पहिल्यांदा मॅकेनिकल्स इंजिन चालवले होते . या इंजिन चालवल्यामुळे जगात बायो डिझेल युगाचा प्रवास सुरु झाला  तेव्हापासून आतापर्यंत यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होत होत आज २०२६ साली डिझेलला तोडीस तोड पर्याय म्हणून बायो डिझेल जगात अनेक ठिकाणी वापरले जाते...

साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम

इमेज
 आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत  थांबलेला किंबहुना जाणीपूर्वक थांबवण्यात आलेला विकास समाजाच्या सर्व थरात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेगाने व्हावा . गुलामीचे जोखड जुगारून  हा देश पुन्हा कधीही गुलामीच्या साखळीत अडकू नये.मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित राहावे .यासासाठी देदश्तील प्रत्येक घटक नव्या उत्सहात काम करू लागला/ या भारलेल्या वातावरणात काम करणी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक काम करत होते . तसेच त्यांचे मार्ग सुद्धा वेगवेगळे होते विचारसरणी आणि कार्यपद्धती वेगवेगळे असले तरी त्यांचे उद्दिष्ट एकच होते भारताचं सर्वांगीण विकास. या एकाच उद्दिष्टसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती समूहामध्ये नाव घ्यावेच लागेल असा समूह म्हणजे हिंदुस्थान प्रकाशन आणि त्यांनी २६ सप्टेंबर १९४८  पासून सुरु केलेले साप्ताहिक विवेक स्वातंत्र मिळाल्यानंतरच्या नव्या ऊर्जेच्या वातावरणात अनेक साप्ताहिके सुरु झाली त्यातील बहुतांशी विविध कारणांनी बंद  पडली त्यानंतर सुरु झालेली देखील बंद पड...