पोस्ट्स

प्रवास एका ध्यासपुर्तीचा 'माझंही एक स्वप्न होतं’

इमेज
अमिताभ बच्चन यांच्या नेत्रदानाविषयी टिव्हीवरील एका  जाहिरातीमध्ये एक वाक्य आहे त्यावेळेस कॅमेरा त्यांच्या पायावर स्थिर असतो कुछ लोगों के लिए मेरी आवाज ही मेरी पहचान है!  भारतातील सर्वात मोठा सहकारी दुग्ध प्रकल्प असणाऱ्या अमूल बाबत सुद्धा आपल्याला असेच म्हणता येईल भारतातील दुग्ध प्रकल्प म्हणजे अमूल असीच जगभरात फार मोठ्या प्रमाणात ओळख आहे. अमुल टेस्ट ऑफ इंडिया अमुल दूध पीता हे इंडिया अर्टली बर्टली डेलिशियस अमुल या  अनेक स्लोगननी अमुलला आपल्या भारताच्या घराघरात स्थान दिले आहे. मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना स्पर्धा परिक्षेचा सुद्धा अभ्यास करत होतो त्यावेळेस कॉलेज संपल्यावर क्लासला जाण्याचा आधी जो थोडासा मोकळा वेळ मिळत असे. त्यावेळेस पोट भरण्यासाठी मी अमुल कुल  पीत असे. आपला देखील अमुलबाबत हाच अनुभव असेल असो  गुजरात मधील काहीसा दुष्काळी भागातील असणाऱ्या आनंद या गावी  केरळी ख्रिश्चन असलेल्या वर्गिस कुरीयन यांनी  कष्टाने उभारलेल्या प्रकल्प म्हणजे अमुल. भारतातील दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी  वर्गीस कुरियन यांनी दिलेल्या योगदानामुळे आपण त्यांना मिल्...

तू. जाता मागे उरेल काय !

इमेज
आपल्या मराठी भाषेतील एक प्रतिभान कवी भा.रा तांबे त्यांची एक सुप्रसिद्ध  कविता आहे.  'जन पळभर म्हणतील हाय हाय तू जाता राहील काय'. माणसाचा मृत्यूनंतर त्याचे अस्तित्व काय, असते? जगात तो नसल्याने कोणाचेही काही अडत नाही जग त्याच्या रहाटीला नित्यनियमाला कर्माला सुरूच ठेवते.  तेव्हा माणसाने कोणत्याही गोष्टीचा विनाकारण गर्व करू नये. हे या कवितेत सांगण्यात आले आहे. आज 30 ऑगस्ट 2026 रोजी ही कविता मला एका वेगळ्या अर्थाने आठवते आहे. कारण आज 30 ऑगस्ट 2026 रोजी पेशवाईचा विचार करता अत्यंत कमी काळासाठी राजेपदावर बसलेल्या नारायणराव पेशवे यांचा  त्यांचाच काकांनी रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबा दादांनी मारेकरी घालून शनिवार वाड्यातच हत्या केल्याच्या घटनेला 243 वर्षे पूर्ण होत आहेत.  रघुनाथराव हे अत्यंत पराक्रमी होते. त्या वेळेच्या लोकांचा विचार करता रघुनाथराव हेच पेशवे पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार होते.  रघुनाथरावांनी मराठेशाहीला अनेक लढाईत असामान्यरीत्या विजय मिळवून दिले, हे सर्व मान्य केले, तरी आज रघुनाथराव उर्फ राघोबा दादा यांच्या विचार केला असता ती हत्याच चटकन येते. त्यांनी के...

सध्याच्या ऑनलाईनच्या तडाख्यात टिकून राहिलेले पाक्षिक 'वाटसरू'

इमेज
  सध्या सर्वच गोष्टी सहजतेने ऑनलाइन मिळत असल्याने छापील माध्यमांना काहीसा कठीण का आला आहे.  घटलेली वाचक संख्या आणि या घटलेल्या वाचक संख्येमुळे  रोडवलेल्या जाहिराती.कमी झालेल्या  जाहिराती मुळे घसरलेले  उत्पन्न आणि कमी उत्पानमुळे इच्छा असून देखील अनेक उपक्रम राबवता येणे अवघड होणे आणि  उपक्रम नसल्यामुळे वाचक संख्या अजूनच कमी होणे  आणि परत सुरुवातीपासून सांगितलेले चक्र सुरू  सुरु होणे या चक्रात  सध्या छापील नियतकालिके  अडकलेली आढळतात. या चक्रामुळे अनेक नामवंत प्रतिष्ठित अशी नियतकालिकाने बंद देखील पडली. इंग्रजी आणि हिंदी भाषेतील नियतकालिकांची स्थिती अन्य प्रादेशिक नियतकालिकांपेक्षा तुलनेने काहीशी बरी आहे इतकेच  .लॉक डाऊन नंतर इंग्रजीतील सायन्स रिपोर्टर तसेच इकोनॉमिकल अँड पोलिटिकल विकली सारखी नामांकित इंग्रजी नियतकालिके बंद पडली लोकसत्ता चे भावंडं असलेले लोकप्रभा हे साप्ताहिक आणि  मूळचे गुजराती असलेले मात्र मराठी सारख्या अनेक भाषेत प्रसिद्ध होणारे चित्रलेखा हि दोन दोन साप्ताहिके बंद होऊन बराच काळ लोटला .  मात्र असे असून देखील का...

स्वामी विवेकानंदाचे विचार समजण्यासाठी वाचावेच असे पुस्तक, 'हिंदूतेज जाग रे'

इमेज
स्वामी विवेकानंद. साडेसात अक्षरी शब्द, मात्र मात्र ज्यांचे नाव घेतल्यावर प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने गौरव आणि भरून येते असे भारताचे अत्यंत महत्त्वाचे सुपुत्र 19 या शतकाचा शेवटी जेव्हा भारत आपला प्राचीन गौरवशाली इतिहास विसरला होता सत्व विसरला होतात त्यावेळेस भारतीय  आपल्या प्राचीन गौरवाची वारस्याची आठवण करून देणारा त्याच वेळी जगाला भारताची नवी ओळख करून देणारा योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद. उणेपुरे 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या कार्याची सांगावी तेवढी महती कमीच‌ त्यांचे ओजस्वी विचार आज देखील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगाची आहेत आज देखील त्यांचे विचार तितकेच प्रासंगिक आहेत. 21 वर्षांनी आपण भारताचा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असू त्यावेळेस आपण जे भारताचे महासत्ता हे स्वप्न बघत आहोत ते सत्यात उतरण्यासाठी काय करावे लागेल काय केल्याने ही एकेकाळी जगद्गुरु माता म्हणून ओळखले जाणारे भारत भूमी पुन्हा एकदा आपले वैभव प्राप्त करेल हे माहिती करुन घेण्यासाठी आपणास स्वामी विवेकानंद यांचे विचार माहिती असणे अत्यावश्यक आहेच याची  खात्री आपणास पटते ते स्वामी विवेकानंद यांच...

आयुष्यात काहीतरी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचावेच, असे पुस्तक 'दिनचर्या'

इमेज
 महान व्यक्ती कोणतेही वेगळे काम करत नाहीत तर आपण जे काम करतो तेच काम करतात मात्र आपण करतो त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतात त्यामुळे ते महान होतात असे एक सुप्रसिद्ध इंग्रजी वाचन आहे. हा वेगळेपणा त्यांनी त्यांच्या आयुष्याला एक शिस्त लावून घेतल्यामुळे आलेला असतो आपण सुद्धा आयुष्याला शिस्त लावून घेतल्यास आपण सुद्धा सहजतेने महान म्हणून देऊ शकतो मात्र केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या म्हणीनुसार सुरुवात करायची तीच काय अडचण.  आता जर आता तुम्हाला वाटले की आपल्याला सुरुवात करायची पण कुठून सुरुवात करायची कोण मार्गदर्शन करेल तर  विवेकानंद केंद्र कन्याकुमारी यांच्या मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित दिनचर्या याशिवाय उत्तम पर्याय तो कोणता असेच म्हणावे लागेल मी नुकतेच हे पुस्तक वाचले आहे त्या पुस्तक वाचनातून आलेल्या अनुभवातून हे सांगत आहेत   विवेकानंद केंद्र कन्याकुमारी संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त निमित्त साधत विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाश विभागातर्फे तीन पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली होती ज्यामध्ये अत्यंत सोप्या चटकन आकलन हो...

आयुष शेटी : भारतीय बॅडमिंट क्षेत्रातील नाव उगवता तारा

इमेज
१७ ऑगस्ट २०२६ हा दिवस भारतासाठी सुवर्णक्षणांनी नोंदवण्यात येईल कारण नवी दिल्ली येथे सुरू असणाऱ्या बॅडमिंटन चॅम्पियनशप मध्ये सर्वच भारतीय खेळाडूंनी अत्यंत चमकदार कामगिरी केली. बुद्धिबळ या वैयक्तिक खेळात भारतीय गेल्या कित्येक वर्षापासून चमकदार कामगिरी करत होतेच त्यामध्ये ॲथलेटिक्स ची भर पडल्याची आपण या कॉमनवेलमध्ये बघितलेच आता यामध्ये बॅडमिंटनची सुद्धा भर पडलेली आहे हे आपण या बॅडमिंटन चॅम्पियनशॉपमध्ये बघता आहोतच. तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे असाल मोदीविरोधक असाल मोदीचे समर्थक असाल भारतीय खेळाडूंकडे ज्या पद्धतीने सध्या लक्ष देण्यात येत आहे हे नाकारू शकत नाही भारतीय खेळाडू विविध स्पर्धांमध्ये जी कामगिरी करत आहेत ती खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि त्याची ही झलक आपणास विविध स्पर्धांमध्ये भारतीयांनी घेतलेल्या पदकांमध्ये दिसत आहेच दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटनशिपमध्ये पहिल्या दिवशी सर्वचभारतीय खेळाडूंनी आपले सामने खिशात घातलेले असले तरी यामध्ये उठून दिसला तो 21 वर्षीय आयुष शेट्टी गेल्या काहीही स्पर्धांमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत असणाऱ्या आयुषची कामगिरी याही स्पर्धेत अत्यंत उठावदार होत आ...

जीवनपट: लोकांप्रती कर्तव्याची जाणिव असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा

इमेज
भारत, जगातील २१०देशांपैकी लोकसंख्येच्या बाबत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमकाचा देश.क्षेत्रफळाचा विचार करता जगातील सातवा मोठा देश,  हिमालय सारखा बर्फाळ प्रदेश राजस्थानमधील वाळवंटाचा प्रदेश कोकणाचा समुद्रकिनारा ,उत्तर प्रदेश बिहार मधील गाळाची मैदाने ,इशान्य भारत आणि मध्यप्रदेश मधील विपुल वनसंपत्ती त्याचवेळी कच्छ मधील विराण भुमी. जगातील सर्व प्रकारची भौगोलिक विविधता एकटकवेला प्रदेश या बरोबर २२ अधिकृत भाषा, तसेच हजारोंच्या संख्येत मोजता येतील अस्या त्यांचा बोलीभाषा, ज्यु धर्मीय वगळता जगातील प्रत्येक प्रमुख धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदणारा देश म्हणजे आपला भारत अस्या या बहुधंगी, बहुरंगी देशाचे प्रशासन चालवणे मोठे कष्टाचे काम. त्यासाठी विस्तृत अशी यंत्रणा उभारणे आलेच. ही  यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी  नियम सुद्धा आलेच. भारतीय संविधानाचा कलम 304 ते 314 मध्ये ते सुद्धा आहेतच. मात्र हे प्रशासन ज्या सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी भल्यासाठी प्रगतीसाठी झटणार आहे. त्यांना या प्रशासनाचा फायदा होतो की जाचच ठरतो आहे. हा मात्र प्रश्न अनुत्तीतच राहिला आपल्या भारतात. प्रशासन खरंच लोकांना...