पोस्ट्स

साप्ताहिक ‘विवेक’ : विचारजागृती आणि संस्कृती संवर्धनाचे प्रभावी माध्यम

इमेज
 आपल्या भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर या नव्या देशाची वाटचाल वेगाने प्रगतीच्या वाटेवर व्हावी.गुलामीच्या ब्रिटिश राजवटीत  थांबलेला किंबहुना जाणीपूर्वक थांबवण्यात आलेला विकास समाजाच्या सर्व थरात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेगाने व्हावा . गुलामीचे जोखड जुगारून  हा देश पुन्हा कधीही गुलामीच्या साखळीत अडकू नये.मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित राहावे .यासासाठी देदश्तील प्रत्येक घटक नव्या उत्सहात काम करू लागला/ या भारलेल्या वातावरणात काम करणी वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक काम करत होते . तसेच त्यांचे मार्ग सुद्धा वेगवेगळे होते विचारसरणी आणि कार्यपद्धती वेगवेगळे असले तरी त्यांचे उद्दिष्ट एकच होते भारताचं सर्वांगीण विकास. या एकाच उद्दिष्टसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्ती समूहामध्ये नाव घ्यावेच लागेल असा समूह म्हणजे हिंदुस्थान प्रकाशन आणि त्यांनी २६ सप्टेंबर १९४८  पासून सुरु केलेले साप्ताहिक विवेक स्वातंत्र मिळाल्यानंतरच्या नव्या ऊर्जेच्या वातावरणात अनेक साप्ताहिके सुरु झाली त्यातील बहुतांशी विविध कारणांनी बंद  पडली त्यानंतर सुरु झालेली देखील बंद पड...

शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध !

इमेज
शांततेसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात रंगणार युद्ध ! शीर्षक वाचून गोंधळलात पडला का,? आधीच जगात दोन युद्ध सुरु आहेत.एक आहे गेल्या साडेतीन वर्षापासून सुरु असलेले रशिया -युक्रेन युद्ध आणि दुसरे म्हणजे इराण विरूद्ध अमेरिका इस्राइल हे युद्ध .या दोन्ही युद्धामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे.आता पुन्हा नवीन  युद्ध होणार म्हणजे फक्त त्रास त्रास आणि त्रासच .असा विचार येत असेल तर जरा थांबा. या युद्धामुळे तूम्हाला त्रास होणार नाही तर आनंदच मिळणार आहे.बौद्धिक आनंदाचा अनुभव तूम्हाला या युद्धातून तूम्हाला घेता येणार आहे. 'गर्व से कहो हम भारतीय है' असे अभिमानाने म्हणत तिरंगा फिरवण्याची संधी तूम्हाला या युद्धामुळे मिळणार आहे.भारतीयांची बुद्धीची दखल जगाला आदराने घेण्याचा प्रसंग या युद्धामुळे  होवू शकतो.   हे युद्ध शस्त्रांनी लढले जाणार नाही.तर बुद्धीने  लढले जाणार आहे. आता बुद्धीने लढले जाणारे युद्ध म्हटल्यावर तूम्हाला वाटले असेल ए.आय.चा वापर असेल,गेला बाजार एकमेकांचा महत्त्वाच्या प्रणालीत सायबर अटॅक करून त्या निकामी करणे असेल.किमानपक्षी रॉकेट उडवून दुसऱ्याचे उपग्रह निकामी करत...

नादवेध संगीताची अदभूत सफर घडवणारे पुस्तक

इमेज
  संगीत , आपल्या मानवी जीवनातील अविभाज्य घटक .मानवी जीवनातील ताण तणाव अडचणीनं क्षणभर का होईना विसरायला लावून मनुष्याला आनंदाचेक्षण समाधानाची अनुभूती करायला लावणारी अदभूत अशी नैसर्गिक शक्ती म्हणजे संगीत.  .याच संगीताच्या या विलक्षण शक्तीमुळे वैद्यकीय उपचार पद्धतीत  संगीताचा   उपयोग   मानसशास्त्रीय   तसेच   शारीरिक   आजारांच्या   उपचारात   महत्त्वपूर्ण   ठरतो . ‘ म्युझिक   थेरपी ’ द्वारे   ताण ,  चिंता ,  नैराश्य   यांसारख्या   मानसिक   आजारांमध्ये   आराम   मिळतो .  शांत   संगीत   मन   स्थिर   करते ,  भावनांवर   नियंत्रण   ठेवण्यास   मदत   करते   आणि   सकारात्मक   विचार   वाढवते .  शारीरिक   आजारांमध्येही   संगीत   वेदना   कमी   करण्यास ,  रक्तदाब   नियंत्रित   ठेवण्यास   आणि   झोप   सुधारण्यास   सहाय्यक   ठरते .  तसेच   मेंदूच्या   कार्य...

विनाशकाले...

इमेज
आजपासून साधरणत: आठवड्याभरापूर्वी राज्य सरकारने एसटी महामंडळाबाबत एक निर्णय घेतला. महामंडळाच्या जागा खासगी विकासकाच्या माध्यमातून ४९ वर्ष इतक्या दिर्घ मुदतीच्या कराराने विकसीत करण्याचा. मुळात एसटी महामंडळाची आजची आर्थिक स्थिती बघता, महामंडळ पुढचे वर्ष तरी बघू शकेल का?असी स्थिती असताना राज्य सरकारने थेट अर्ध शतक वर्षासाठी महामंडळाची जागा खासगी विकासकांना देण्याचा निर्णय घेतला. या जागा विकसीत करुन त्याद्वारे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारली जाईल,असे यावेळी राज सरकारकडून सांगण्यात आले.  कोंबडी रोज एक सोन्याचे अंडी देत असताना सर्वच अंडी एकाचवेळी मिळावी,यासाठी कोंबडीला मारले असता,एकही अधिकचे अंडे न मिळता कोंबडी मरुन जाण्याची कथा आपण पंचततंत्रात वाचली असेल.माझा मते राज्य सरकारचा निर्णय याच पथडीतील आहे.  एसटी महामंडळाच्या जागा शहरात मोक्याचा ठिकाणी आहेत. त्यांचे क्षेत्र ही मोठे आहे.ही गोष्ट विचारात घेता एकेका जमिनीची किंमत डोळे पांढरे करणारी आहे,हे मान्य केले तरी या जमिनीच्या आधारे आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याचे धोक्याचे आहे.देव न करो पण नाशिकचा ठक्कर बझार सारखा हा प्रकल्प फसला त...

भारताच्या विकासदृष्टीचे समग्र दर्शन घडवणारी मासिके

इमेज
आपल्याकडे  भारताच्या विकासाबाबत विविध दावे प्रतिदावे सातत्याने करण्यात येतात.आपण ज्या माध्यमातून याबाबत माहिती घेतो आहोत त्या माध्यमाच्या विचारसरणीनुसार आपणास माहिती मिळते .जर माध्यम  केंद्र सरकारच्या माताच पुरस्कर्ता असेल तर वास्तवात नसलेली आदर्श स्थिती थंडी अधिक उजळ करून आपल्यापुढे सादर करेल.याउलट जर माध्यम विरोधी पक्षाच्या बाजूचे असेल तर वास्तवातील चांगली बाजू कारण नसताना ऋणात्मक दाखवत भारताची प्रगती दाखवणार नाही . अश्या स्थितीत भारताचे जसे आहे तसे चित्र उभे करणारे कोणतेच माध्यम नाही का स प्रश्न आपणस पडलं असेल तर सांगतो चित्रफारच निराशजनक  नाहीये  आपणास खरे चित्र  समोर करणारी दोन मासिके सहज सापडतात ती म्हणजे स्पर्धा परिक्षतेची तयारी करणाऱ्या विदयार्थ्यांच्या मुखाशी असणारी मासिकाने अर्थात योज़ना आणि कुरुक्षेत्र . मी हो दोन्ही मासिके गेली सुमारे १५ वर्ष नियमिपणे वाचत असे सुरुवातीला मराठी भाषेतील वाचत असे आता मात्र थेट इंग्रजी भाषेतील वाचतो  . भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित होणारी ही दोन्ही मासिके देशाच्या विकास प...

बदलत्या काळाची दिशा ओळखत 'साप्ताहिक सकाळ'चे स्वागतार्ह्य पाउल

इमेज
आपल्या मराठीला साप्ताहिकाची मोठी परंपरा आहे.वेगवेगळ्या विषयावरची साप्ताहिके मराठीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रसिद्ध  आलेली आहेत.समाजाचा  वचनाबद्दलच्या बदलणारा   दृष्टिकोन, आपसातील स्पर्धा, तसेच छपाईच्या दारात झालेली  वाढ या सारख्या अनेक कारणामुळे त्यातील काही बंद देखील पडली आणि अजून देखील  बंद होत आहे . मात्र डार्विनचा सक्षम तोच टिकणार या सिद्धांतानुसार काही साप्ताहिकांनी काळाची पाऊले उचलत आपल्यामध्ये  मोठ्या प्रमाणात बदल करत आजदेखील त्यांच्या वाचकवर्ग खप मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवला आहे. या कालानुरूप बदललेल्या साप्ताहिकांमध्ये नवा घ्यावेच लागेल ते म्हणजे साप्ताहिक सकाळचे सकाळ माध्यम समूहाचे पूर्णतः राजकारणावर आधारित साप्ताहिक 'सरकारनामा 'या दही अनेकदा छापील स्वरूपात आले आणि बंद होऊन ऑनलाईन स्वरूपात घेणे .मात्र गेली ४० वर्ष छापील रूपात प्रसिद्ध होणारे त्याच माध्यम  वॉमूहाचे साप्ताहिक मात्र अजून टिकून आहे  सध्याचा साप्तहिक सकाळचे  वैशिष्ट  म्हणजे विशेषांक होय. सध्या साप्ताहिकाचा  प्रत्येक अंक  एक विशेषांक असतो. एका व...

साधना’ साप्ताहिक – प्रबोधनाची परंपरा जपणारे मराठी साप्ताहिक

इमेज
साप्ताहिकांनी फार पूर्वीपासून समाजाचे मनोरंजन करण्यासह त्यांना विविध प्रकारची माहिती देण्यात मोठी भूमिल्का बजावली आहे . रोज प्रसिद्ध होणाऱ्या न्यूजपेपरमधून ज्या गोष्टी वेळेच्या प्रेशरमुळे  येणे अवघड आहे . महिन्याच्या अंतराने दिल्यास खूप उशीर झालेला असू शकतो त्या गोष्टी देण्याचे मोठे काम साप्ताहिकाने  केल्याचे आपणास सहजतेने दिसते .  आपल्या मराठीत अनेक विषयावरची अनके विचारधारणेची साप्ताहिके आली आणि अनेक  कारणाने बंद  देखील  पडली मात्र विविध अडचणींना तोंड देत काही अजून देखील सुरु आहेत .या सुरु असलेल्या साप्तहिकापैकीच एक म्हणजे पुणे शहरातील शनवार पेठ येथून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक साधना  साधना’ हे मराठीतील एक प्रतिष्ठित साप्ताहिक आहे ज्याची  स्थापना १९४८ साली साने गुरुजी यांच्या प्रेरणेने झाली. समाजातील प्रबोधन, समता, न्याय आणि मानवी मूल्ये यांचा प्रसार करणे हा या साप्ताहिकाचा मूलभूत उद्देश आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही मूल्यांची जपणूक आणि सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी‘साधना’ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजच्या काळात मागे पडलेल्या किंबहुना...