मुंबईच्या ऐतिहासिक गिरणी कामगाराच्या संपानंतरची गुन्हेगारी विश्वाची माहिती देणारे पुस्तक, 'भायखळा ते बँकॉक'
मुंबई, आपल्या भारताची आर्थिक राजधानी, जगात सर्वात जास्त चित्रपट निर्मिती करणाऱ्या भारतीय सिनेमाचे मुख्य केंद्र (बॉलिवूड ही संज्ञा प्रामुख्याने हिंदी चित्रपटांना वापरतात हिंदीत्तेर भाषांसाठी वेगवेगळी नवे आहेत सबब भारतीय सिनेमा )“भारताच्या लोकसंसंख्येंत सुमारे ९ टक्के प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राची राजधानी मुबई . मुळात सात बेटावर वसलेल्या या शहराची वेगाने जडणघडण सुरु होते . ती पोर्तुगीजांनी लग्नात हुंडा म्हणून ब्रिटिशांना मुंबईचा प्रदेश दिल्यावर .तेव्हापासून आता २०२६ पर्यतचा शहराचा आढावा घेतल्यास गिरणी कामगारांचा ऐतिहासिक म्हणता येईल असा संपाचा उल्लेख करावाच लागेल. या संपामुळे मुंबई शहराचाचेहरामोहरा खूपच मोठ्या प्रमाणात बदलला या बदलात तेथील मराठी समाजजीवन आणि आर्थिक उलाढाल हे तर बदललेच त्याशिवाय ज्याला आता अंडरवर्ल्ड म्हणतात ते विश्व देखील मोठ्या प्रमाणात बदलले गिरणी कामगारांच्या संपामुळे आलेल्या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी येथील अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळाले आणि मुंबईतील गुन्हेगारीने वेगळे वळण घेतले या वेगळ्या वळणाची आपणास माहिती होते ती ...