पोस्ट्स

शाहण्याच्या सायक्राटिस्टची चटका लावून जाणारी एक्झिट

इमेज
  "बाबुमोशाय, ज़िंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहाँपनाह... उसे न आप बदल सकते हैं न मैं। हम सब तो रंगमंच की कठपुतलियाँ हैं जिनकी डोर ऊपर वाले की उँगलियों में बँधी है। कब, कौन, कैसे उठेगा ये कोई नहीं जानता।  मृत्यूचे वास्तव सांगणारा हा १९७१ साली प्रदर्शित 'आंनद ' या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यातील हा डायलॉग.  आपल्यापैकी प्रत्येकजणच कधीना कधी हे जग सोडून जाणारच आहे. मृत्यू येणार हे निश्चित आहे मात्र तो कधी येणार हे मात्र अनिश्चित आहे. हे दाखवून देतो.  या अनिश्चितेचा फटका १५ मे रोजी सकाळी अनेकांना बसला. कारण होते अनेकांना मानसिक त्रासातून बाहेर काढत जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यास शिकवणारे ठाण्याचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांची कॅन्सरची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचे निधन झाल्याचे  मी त्यांचे आत्मचरित्र 'शहाण्यांच्या सायकॉस्टीक' हे वाचले आहे. जीवनातील कटू त्रासदायक अनुभवांना शांतपणे सामोरे कसे जायचे हे आपणास त्यातून समजते.  आयुष्यातील अडचणीचा त्रासाचा बागुलबुवा ना उभा करता किंबहुना समोरच्याला त्याबाबत शंका देखील य...

महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ...

इमेज
  महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझताना ... हे शीर्षक वाचून तुम्ही काहीसे दुखावले गेले असण्याची दाट शक्यता आहे तरी लेखाच्या सुरुवातीलाच त्याबाबद्दल तुमची माफी मागून सांगतो,तुम्ही काहीही म्हणा ही  आजची वस्तुस्थिती आहे. नुकत्याच जाहीर  झालेल्या एस एस सी च्या मराठी भाषा विषयाने यावर जवळपास शिक्का मोर्तब केले आहे. तुम्ही म्हणाल मराठी विषयात ९४००० विद्यार्थी नापास होणे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिवा विझणे चा अर्था अर्थी काही संबंध आहे का ? उगीच वडाची साला पिंपळाला जोडून रडायला का सुरुवात करायची ?  तर जरा थांबा मी जे म्हणतो ते समजून घेण्यासाठी आपणास आजपासून २९ वर्ष मागे सन  १९९७ मध्ये जावे लागेल. माझ्या  नाशिकचे भूमिपुत्र कविवर्य कुसुमाग्रज यांनी एका दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी लिहलेल्या सुप्रसिद्ध अश्या ' स्वातंत्र्य देवतेची विनवणी' या कवितेपर्यंत मागे जावे लागेल. या कवितेत त्यांनी परभाषेतही व्हा पारंगत असा उपदेश केलेला असला तरी मराठी भाषेबाबत देखील चिंता व्यक्त केली होती  मायमराठी मरते इकडे परकींचे पाय चेपू नका.  भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचा...

आयुष्यातली आणि भारतातील राजकारणाची वस्तुस्थिती मांडणारे ३ 'स'

इमेज
  आयुष्यातली आणि भारतातील वस्तुस्थिती मांडणारे ३ ' स ' हे शीर्षक वाचून गोंधळात पडला ना ? हे कसले शीर्षक ?/ ' ' स ' या मुळाक्षराचा आणि आयुष्यातील आणि भारतातील वस्तुस्थितीचा काय तो संबंध ? बरे असेल काही संबंध मात्र त्यात ३ या आकड्याच्या संबंध तो काय ? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात   हे शीर्षक बघून आले असतील तर सांगतो मी या लेखात बोलणार आहे तीन मराठी चित्रपटांविषयी . या तिन्ही चित्रपटांच्या सुरुवातीचे अक्षर आहे ' स ' . या तिन्ही चित्रपटांमधून काय संदेश   देण्यात आला आहे . याचा विचार करता त्यातील एक चित्रपट आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो अगदी चांगल्या गोष्टीच्या आहारी गेले तरी आयुष्याची मातीच होते हे सांगतो . तर राहिलेले दोन चित्रपट राजकारणी आणि सार्सामान्य जनता आणि राजकारणी व्यक्तींमधील एकमेंकांवर कुरघोडी कोणत्या पद्धतीने करतात यावर भाष्य करतात   तसे बघायला गेले   तर या चित्रपटात सांगण्यात आलेले संदेश अनेक चित्रपटातून देण्या...