पोस्ट्स

राष्ट्रीय प्रतीकांच्या उभारणीची प्रेरणादायी गोष्ट- कथा विवेकानंद शिला स्मारकाची

इमेज
  कन्याकुमारी ,  अंदमान   निकोबार   बेटे   आणि   लक्षद्वीप   बेटे   वगळता   भारताच्या   मुख्य   भूमीचे   दक्षिणेकडील   टोक   असलेले   एक   असे   शहर   आहे ,  जिथे   हिंदी   महासागर ,  अरबी   समुद्र   आणि   बंगालचा   उपसागर   एकत्र   येतात .  जगात   तीन   समुद्र   एकत्र   येण्याची   तीन   ठिकाणे   आहेत .  एक   म्हणजे   कन्याकुमारी ,  तर   अन्य   दोन   ठिकाणे   अंटार्तिका   खंडाजवळ   आहेत .  मात्र   जगभरात   ज्या   ठिकाणाजवळ   वस्ती   आहे ,  असे   ठिकाण   एकच   कन्याकुमारी . ( २०२१   मार्चमध्ये   अंटार्तिका   खंडाजवळच्या   समुद्राला   दक्षिण   महासागर   म्हणून   जागतिक   महासागर   संघटनेने   मान्यता   दिल्याने   प्रशांत ,  हिंदी   आणि ...

त्यांचा अनुभवातून आपण शिकणार ना ?

इमेज
मी आपणाशी हा संवाद साधताना (17सप्टेंबर ) उझबेकिस्तान देशातील समरकंद या शहरात 46 व्या बुद्धिबळ ओलंपियाडची सुरुवात झाली आहे.  तर जपानमध्ये असे खेळाची सुरुवात होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. स्पर्धांच्या आयोजनाचा विषयीचा ज्या बातम्या या स्पर्धेच्या आधी आल्या. त्या कोणत्याही जागतिक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या देशासाठी खूप काही शिकवून देणाऱ्या होत्या. खेळाडूंना राहण्यासाठी योग्य सुविधा नसणे हा मुद्दा दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला. बुद्धिबळ ओलंपियाड चा विचार करता नाशिकचे भूषण ग्रँडमास्टर विदित गुजराती यांनी केलेले ट्विट आपणास खूप काही शिकवून जाते. समरकंद येथे होणाऱ्या बुद्धिबळ ओलंपियाड मध्ये आयोजकांकडून भारतीय संघाला खूप उशिरा राहण्याची सोय करून देण्यात आली. आणि ही फक्त भारताचीच तक्रार नव्हती अन्य देशातील खेळाडूंनी सुद्धा समरकंद येथील राहण्याच्या सोयीबाबत ना पसंती दर्शवली आहे जपानमध्ये सुद्धा खेळाडूंना राहण्यासाठी हॉटेल रूम नाही तर जहाजे आणि अन्य तंबूमध्ये राहण्याची सोय केल्याच्या बातम्या येत आहेत.  हॉटेलमधील रूम्स देखील खूप छोट्या आणि असूविधांनी परिपूर्ण अस...

महाराष्ट्राच्या शेजारील राज्यातील बाप्पा

इमेज
  महाराष्ट्राचा सांस्कृतिक उत्सव अशी ओळख असलेल्या गणेशोत्सवामध्ये आता आपण   नेहमीप्रमाणे रंगून गेलेलो आहोत . बुद्धीची देवता तसेच विघ्नहर्ता असे ओळख असलेल्या गणपतीला आपल्या महाराष्ट्र बरोबर अन्य ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुजले जाते . स्थानपर्त्वे काही प्रमाणात बदल मात्र होतात हे बदल प्रमुख्याने आरती आणि गणरायाची विविध स्तोत्र मध्ये असतात ‌. आरती मधील बदल प्रमुख्याने भाषेचा विविधतेने तयार झालेल्या असतात असे महाराष्ट्राचे मराठी , गुजरातची गुजराती , गोव्याची कोकणी कर्नाटकचे कन्नड मध्यप्रदेशची हिंदी असे बरोबरच त्या राज्यातील ऐतिहासिक राजे राजवाडे आणि शासन व्यवस्था याच्या देखील परिणाम आरती बदल वर होतो उदाहरणार्थ गोव्यामध्ये बराच का पोर्तुगीज सत्ता होती या काळात हिंदू धर्मांचा सण सादर करण्यावर मोठ्या प्रमाणात बंधने आली त्याचा परिणाम स्वरूप महाराष्ट्राचा अगदी शेजारी असून सुद्धा गोव्याच्या गणेशोत्सव थोडा वेगळा स्वरूपात साजरा होतो . स्थानिक खाद्यपदार्थ यांच्या देखील काही...