बदलती शेजारची गणिते (भाग3)
आपल्या भारताच्या 27 पैकी संवेदनशील राज्य म्हणून ओळख असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणीपूर या राज्यांबरोबर एकंदरीत 1600 किमीची सीमा शेअर करणाऱ्या म्यानमारमध्ये 2021 फ्रेबुवारी1 रोजी लष्करी उठाव करुन जेमतेम बाळसे धरणाऱ्या लोकशाहीला गुंडाळल्यानंतर हा लेख लिहण्यापर्यत त्याविरुद्ध म्यानमारच्या नागरीकांनी जोरदारपणे आंदोलन सुरु केले आहे. म्यानमारला ब्रिटीश सत्तेपासून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1962 पर्यत लोकशाही नांदल्यावर 1962 मध्ये उठाव करुन लष्कराने तेथील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून 2011 ते2021 चा कालखंड वगळता तिथे लष्कराचीच सत्ता राहिली.या 50 हुन अधिक वर्षाच्या लष्करी राजवटीत लोकशाहीसाठी1988आँगस्ट 8 रोजी झालेले आंदोलन आणि 2007 ला आंदोलन झाले .1988आँगस्ट 8 ला झालेले आंदोलन.हे 888 आंदोलन म्हणून ओळखले जाते. या आंदोलनामुळे तेथील लष्करी प्रशासन नमले नाही. मात्र 2007 साली काही महिने चाललेल्या आंदोलनामुळे लष्करी प्रशासन नमले.त्यांनी लोकशाहीचा देखावा तयार करण्यासाठी एक संविधान तयार केले. ज्यानुसार 2020 नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणूकीत गैरप्रकार झाले असे सांगून तेथील लष