या धोक्याकडे कोण बघणार
आपल्या भारतात विविध राजकीय नेत्यांमध्ये विविध आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झाडल्या जात असताना एक फार मोठा धोका आपल्याकडे आवासून उभा आहे . मात्र विविध नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपणाच्या बातम्या देण्यात माध्यमे गुंतून गेल्याने या धोक्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये हा धोका आहे भूकंपाचा आणि ज्वालामुखी उद्रेकाचा . गेल्या काही महिन्यातील भुकंपाच्या आणि ज्वालामुखी उद्रेकाच्या वाढत्या घटना बघता याचे गांभीर्य लक्षात येते .( https://www.volcanodiscovery.com या संकेतस्थळावर तुम्ही जगभरात दररोज किती भूकंप होत आहेत याची प्रदेशनिहाय आणि तीव्रतानिहाय माहिती घेऊ शकतात . हा लेख याच माहितीवर अवलूंबून आहे ) आपल्या उत्तर भारतात मोठा विध्यसंक भूकंप येण्याची दाट शक्यता या आधीच भूकंप तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेच . त्या पार्श्वभूमीवर या आकडेवारीकडे बघायला हवे आपण या धोक्याला सर्मथपणे पेलू शकतो का या उत्तर जर दुर्दैवाने नकारत्मक असेल तर आपण काय पाऊले उचलायला हवीत याबाबत विचारमंथन होणे आवश्यक आहे जगभरातील सर्व भूकंपाची नोंद घेणाऱ्या संस्थेमार्फत प्रसिद