जेव्हा एका घटनादुरुस्तीमुळे दुसरी घटना दुरुस्ती झोकोळली जाते तेव्हा ........
सध्या समस्त भारत नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे घुसमुळून जात असताना संसदेमध्ये इतर अनेक विधेयके सुद्धा मंजूर करण्यात आली आहेत . जी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे . मात्र त्याविषयी भारतीय माध्यमांमध्ये फारशी चर्चा झालेली नाही . माझे आजचे लेखन त्या घटनादुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी आहे . मला ज्या घटनादुरुस्तीकडे आपणाचे लक्ष वेधायचे आहे . त्यामुळे लोकसभेतील आणि काही राज्याच्या विधानसभेतील सदस्य संख्येत बदल झाला आहे . तर समस्त भारत CAA वरील चर्चेत दंग असताना आपल्या संसदेत 126 व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली . ज्या अन्वये भारतीय संविधानाच्या कलम 331, 333 आणि कलम 362 च्या उपकलम 2 या कलामामध्ये बदल करण्यात आले. कलम 331नुसार लोकसभेमध्ये अँग्लोइंडियन समाजाला 2 सदस्यांचे प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती. तर कलम 333नुसार राज्य विधानसभेत अँग्लो इंडियन समाजाला 1सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे . या दोन्ही ठिकाणी राष्ट्रपती सदस्यांची नेमणूक करत असे . कलम 362च्या उपकलम 2 मध्ये अँग्लो इंडियन कोणास म्हणावे याची व्याख्या करण्यात आली आहे . भारतीय संविधान