५९ वर्षाची भळभळती जखम
आजपासून ५९ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही , ऑक्टोबर महिन्याचे दिवस होते ते . भारताच्या उत्तर सीमेवर तणावपूर्ण शांतता होती. चीनने भारताच्या जमू काश्मीर राज्यातील लडाख भागात चीनने एक रस्ता बांधल्याचे समोर आले होते, त्या घटनेवरून दोन्ही देशांच्या संबंधात काहीशी कटुता आली होती अश्यातच चीनच्या लष्कराकडून उत्तराखंड राज्यात भारत चीन सीमेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेटियन फोर्सच्या काही पोलिसांवर १७ ऑक्टोबर रोजी अचानक हल्ला करून त्यांची हत्या केली जाते, आणि भारत चीन यांच्यातील सुप्त तणाव उघड होतो आणि दोन्ही देशात युद्धाची ठिणगी पडते आज २०२१ साली या युद्धाला ५९ वर्षे पूर्ण झाली आहे सरकारी नियमानुसार व्यक्ती ६०वर्षाचा झाल्यावर त्यास सेवेतून निवृत्त केले जाते या हिशोबाने या हल्ल्याचा एक वर्ष आधी जन्मलेली व्यक्ती आता सेवानिवृत्त होईल ,इतकी वर्षे होऊन सुद्धा हि जखम अजून भळभळतीच आहे . त्या निमित्याने या युद्धात आप्तेष्ट गमावलेल्या लोकांच्या दुःखात सहभागी राहूया. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या हल्ल्याचा स्मरणार्थ दरवषी १७ ऑक्टोबर हा दिवस पोलीस शाहिद दिवस म्हणून साजरा करतात या दिवशी अतु