या भारतीय खेळाडूंना शाबासकीची थाप कधी ?
आपल्या भारतात खेळ म्हंटले की साधारणतः मैदानी खेळच समजले जातात . मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचाच गौरव करण्यात येतो ज्यामुळे बुद्धिबळासारखा अस्सल भारतीय भूमीतील शारीरिक क्षमता आणि बौद्धिक चातुर्य यांच्या अनोखा संगम असलेला खेळ खेळत असणाऱ्या खेळाडूंवर काहीसा अन्याय होतो . निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हा वाक्यप्रचार आपण सर्वांना माहिती आहेच आता निरोगी शरीररसाठी शारीरिक तंदरुस्ती हवीच ना ? बुद्धिबळ खेळताना बुद्धिबळाचा सराव करताना सातत्याने बसून वजन वाढते आणि या वाढलेल्या वजनामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर काहीसा विपरीत परिणाम होतो त्यामुळे बुद्धिबळपटूंना खेळाच्या सरावाबरोबर शारीरिक व्यायाम देखील करावा लागतो . तासंतास एका जागी चित्त स्थिर करणे यासाठी पाठ आणि मान शारीरिक दृष्ट्या योग्य असावीच लागते पाठ आणि मान योग्य राहण्यासाठी बुद्धिबळपटूंना शारीरिक तंदरुस्ती राखावीच लागते . असा रीतीने खेळासाठी दुहेरी मेहनत घेऊन सुद्धा आपल्याकडे बुद्धिबळपटूंना योग्य तो सम्मान