पोस्ट्स

भारत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!

इमेज
           आपल्या भारताच्या संविधानाने कलम १९ नुसार आपल्यला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे.   मात्र हे स्वातंत्र्य अनिर्बध दिलेले नाही  तर त्यावर काही बंधने दिलेली आहेत जी शासन परिस्थिनुसार वाढवू अथवा कमी करू शकते आपल्या लोकशाहीतील काळा अध्याय असलेल्या आणीबाणीत आपण त्याच्या अनुभव घेतलेलाच आहे आपण सध्या  देखील आणीबाणी नसताना ही  बंधने लक्षात घेतली पाहिजे आपण घटनेने दिलेले स्वातंत्र्य उपभोगताना हे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे याची जाण ठेवणे अत्यावश्यक आहे तरच आपण देशाचे जवाबदार नागरिक म्हणायला लायक ठरू  हे सर्व सांगायचे कारण म्हणजे युट्युब या सोशल मीडियावर प्रदर्शित झालेला एक टॅलेन्ट हंट कार्यक्रम या कार्यक्रमात विनोद सादर करताना अत्यंत अयोग्य भाषेचा वापर केला गेला असल्याने मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला आहे आसाम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून या कार्यक्रमांच्या निर्मात्यांच्या विरोधात पोलिसी कारवाई सुरु करण्यात आलेली आहे यावरून या घटनेचे गांभीर्य लक्षात येईल  पुस्तके किंवा पारंपरिक टीव्हीला काही मर्य...

एका उत्तम व्यवस्थेवर विनाकारण उडालेले शिंतोडे

इमेज
            गेला आठवडाभर टीव्हीवर कोणत्या बातम्या दाखवल्या जात आहेत ? याचा आढावा घेतल्यास आपणास सर्वाधिक वेळ पूजा खेडकर यांच्याविषयीच्या बातम्यांनी व्यापलेला दिसतो . या बातम्या देताना काही माध्यमांनी विशेषतः इंग्रजी माध्यमांनी काहीही चूक नसताना, त्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाला मध्ये खेचले सहजतेने लक्षात येते . मराठी वृत्तवाहिन्यांच्या युट्युब चॅनेलवरील प्रतिक्रिया वाचल्यातर नंतर  सर्वसाधारणपणे याच प्रकारच्या प्रतिक्रिया आपणास  बघावयास मिळतात . अमेरिकेत अशी कायम स्वरूपाची  नोकरीची हमी देणारी प्रशासकीय यंत्रणा नाही  मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर ७५ वर्षे होऊन देखील आपण ब्रिटिशकालीन प्रशासनव्यवस्था का अमलात आणत आहोत अशा त्रागा करणारा एक चर्चेचा कार्यक्रम एका सुप्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीवर तितकाच किंबहुना कणभर जास्तच प्रसिद्ध असलेल्या वृत्तनिवेदकाने केलेला  मी बघितला केंद्रीय लोकसेवा अयोग्य सुद्धा भ्रष्ट झाला आहे सखोल चौकशी केल्यास हिच्यासारखे अजून ५६ अधिकारी सापडतील आय ए एस अधिकारी होणे आता फक्त पैसेवाल्या लोकांचेच काम आहे ज्या हात...

सिंहावलोकन २०२३ :भारतात झालेले, आंदोलन आणि हिंसा

इमेज
सध्या सुरु असणारे ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष संपण्यास आता  मोजकेच दिवस राहिले आहेत . भौगोलिक दृष्ट्या आपल्या भारतीय कालगणेनुसार ज्या प्रकारचे बदल वर्ष संपताना आणि नवीन वर्ष सुरु होताना होतात तसे बदल जुने नविन कॅलेंडर वर्ष संपंतांना आणि नवीन ग्रेनीयन कॅलेंडर वर्ष सुरु होताना दिसत नसले तरी जगभरात आता  ग्रेनीयन कॅलेंडर वर्षचा सर्वाधिक प्रमाणात वापरले जात असल्याने वर्षाखेर म्हणून सरत्या वर्षाच्या आढावा घेयचा असल्यास तो आताच घेणे क्रमप्राप्त आहे चला तर जाणून घेउया या सरत्या वर्षात काय काय घडामोडी घडल्या हा आढावा मी क्षेत्रनिहाय घेणार आहे प्रत्येक क्षेत्राचा एक लेख असेल या लेखात, आंदोलन, हिंसा या क्षेत्रातील घडामोडी बघूया          सरत्या वर्षात झालेल्या आंदोलनाचा विचार करता, महाराष्ट्रात वर्षाच्या सुरवातीलाच झालेले एम पी एस सी द्वारे अधिकारी होवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून झालेल्या  आंदोलनाचा विचार करावाच लागेल. परीक्षेचे स्वरूप लेखी वर्णनात्मक करु नये. ते पुर्वीप्रमाणे ऑब्जेटिव्हच ठेवावे,20 असी त्यांची मागणी होती. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ऑब्जेटिव्हच प्र...

पेटते पश्चिम बंगाल

इमेज
  भारताच्या अध्यात्माची पाश्चात्य जगातला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद , भारतात रसायनशास्त्रावर आधारित उद्योगाची पायाभरणी करणारे प्रफुल्लचंद्र रे , भारताला साहित्य क्षेत्रातील नोबेल देणारे रवींद्रनाथ टागोर . अर्थशास्त्रज्ञांचे नोबेल देणारे अमात्य सेन ,  ज्येष्ठ क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस,  .आणि  बिपिनचंद्र पाल बाँलीवूडची जगाला उत्तम ओळख करुन देणारे सत्यजित रे . भारतात प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे राजा राममोहन रॉय .एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या या सर्व व्यक्तींमधे एक सामान दुवा आहे . या  सर्व व्यक्ती बंगाली आहेत  बंगाल गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे अत्यंत सुपीक झालेला प्रदेश त्यामध्ये तागासारख्या नगदी पिकांमुळे शेतीही समृद्ध म्हणावी अशी .त्या मध्ये सुरवातीला सांगितल्याप्रमाणे या सारख्या अत्यंत प्रतिभावान व्यक्तींमुळे  त्यात तर सोन्याहून पिवळे होण्यासारखी स्थिती.  भारतात सर्वाधिक पुस्तके बंगाली भाषेत वाचली जात असल्याचा इतिहास आहे. मात्र आजमितीस बंगालची स्थिती अत्यंत वाईट आहे . भारतातील सर्वात जास्त रस्त्यावरील भिकारी पश...

39 वर्षानंतर....

इमेज
  काही घडामोडी घडून गेल्यावर कित्येक वर्ष उलटून गेली तरी त्या घडामोडींचा परिणाम शिल्लक राहतो , जून महिन्यात दक्षिण आशियाचा विचार करता   या घडामोडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे . 25 जून 1975 रोजी भारतात लादण्यात   लादण्यात आलेली आणीबाणी , जून 1975 मध्ये सिक्कीमचे भारतात झालेले एकत्रीकरण ,   3 जून 1947 रोजी ब्रिटिश संसदेत   पारित करण्यात आलेला भारताचा स्वातंत्र्याचा कायदा किंवा   3 जून 1984 रोजी अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली   लष्करी    कारवाई त्यापैकीच एक        ऑपरेशन ब्ल्यू स्टार या नावाने प्रसिद्ध असलेल्या   अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली लष्करी कारवाईचे    वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्...

स्मरण एका भारत बदलणाऱ्या घटनेचे

इमेज
                 आज बुधवार 19 एप्रिल 2023 आजच्याच दिवशी 48 वर्षापूर्वी म्हणजे 1976 एप्रिल 19 रोजी एक चमत्कार घडला होता. एक विकसनशील देशाने युनाटेड सेव्हीयत सोशालिस्ट रशिया या देशाच्या मदतीने आपला पहिला उपग्रह आकाशात यशस्वी प्रक्षेपित केला होता. तो विकसनशील देश होता भारत. आणि त्या उपग्रहाचे नाव.होते आर्यभट्ट . आज भारत जगभरातील अनेकांचे उपग्रह स्वतःच्या प्रक्षेपण यानातून प्रक्षेपीत करतो, भारताचे सुद्धा कित्येक उपग्रह आज अंतराळात भ्रमण करत आहेत. या सर्वाची मुहुर्तमेढ या गोष्टीने रोवली गेली होती. या ऐताहासिक घटनेच्या 48व्या वर्धापनदिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा .                            मित्रांनो, त्यावेळी भारतात प्रचंड प्रमाणात भुकबळी जात होते. गरीबांची संख्या देखील प्रचंड होती. देशातील दूधाचे उत्पादन नगण्य होते. मासेमारीत देश जगाचा विचार करता प्रचंड मागे होता. अस्यावेळी काळाची पाउले ओळखून उचललेल्या पाउल किती गरजेचे आहे. हे आपण जाणतातच.      ...

यूपीएससी बदलाच्या वाटेवर , एमपीएससीत कधी होणार बदल ?

इमेज
       लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एक असणाऱ्या प्रशासनाची आपल्या भारतात अत्यंत मजबूत व्यवस्था आहे किंबहुना अशी व्यवस्था असे हे आपल्या संविधानाचे एक वैशिष्ट समजले जाते देशातील हा प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी दोन स्वायत्त संस्था कार्यरत आहेत प्रशासनातील जिल्हाधिकारी सारख्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी केंद्रीय स्तरावरची  यंत्रणा कार्यरत आहे जिला आपण युनियन पब्लिक सर्विस कमिशन अर्थात यूपीएससी या संक्षिप्त नावाने ओळखतो .उपजिल्हाधिकारी आणि त्यासारखी प्रशासनातील पदांवर कोणी काम करायचे यासासाठी देशभरात त्या त्या  राज्याचे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत या  स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनपैकी एक म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन .जी एमपीएस्सी  या नावाने प्रसिद्ध आहे          हे सांगायचे कारण की . देशपातळीवर अधिकारी निवडणाऱ्या  यूपीएससीमध्ये अनेक बदल प्रस्तावित आहेत.  सरकारचे कार्य सुरळीत होण्यासाठी   खासदारांच्या अनेक समित्या कार्यरत असतात . या समित्या अभ्यासपूर्ण अहवाल स...

आतातरी हवामानबदल हा मुद्दा चर्चेत येणार का?

इमेज
        सध्या उत्तर महाराष्ट्र बेमोसमी पावसाचा तडाखा सहन करतोय.या तडाख्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यथावकाश या नुकसानीचे पंचनामे होऊन   शेतकऱ्याना  योग्य तो मोबदला देखील मिळेल . मात्र गेल्या काही वर्षातील मार्च महिन्यातील घडामोडी बघता हा पाऊस काही नवीन घडामोडी राहिला नाहीये हा लेख वाचणारे सुद्धा सध्या पडणाऱ्या पावसाचा व्हिडीओ किंवा यावरील एखादे व्यंगचित्र फेसबुकवर अपलोड करून पुढील २०२४ या वर्षी फेसबुक मेमरी द्वारे त्यांचा अनुभव घेऊ शकतात किंवा मागील काही वर्षात ज्यांनी याविषयी फेसबुकवर काहीतरी अपलोड केले आहे ते याचा अनुभव घेतच असतील     मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या समस्येचा आपण अनुभव घेत असून देखील आपल्याकडून या समस्येला तोंड देण्यासाठी काही ठोस कायमस्वरूपी उपाययोजना केल्याचे चित्र समोर येत नाहीये दरवर्षी शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्पुरती मलमपट्टी केली जाते मात्र जगभरात ज्या प्रमाणे सरकारे हवामानबदला या विषयावर बदलली त्याप्रमणे आपल्या देशात काहीही होत नाही मागील वर्षी २०२२ मध्ये  मे महिन्यात ऑ...

अर्थसंकल्पाशी संबंधित संकल्पना आपणास माहिती आहेत का ?

इमेज
         येत्या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प मांडतील . पुढील वर्षी मे २०२४मध्ये निवडणुका असल्याने त्या वर्षी मांडण्यात येणारा अर्थसंकल्प हा पूर्ण अर्थसंकल्प नसेल तर फक्त मे महिन्यापर्यंत सरकारचा खर्च भागवण्यासाठी मांडण्यात आलेला अशांकालिक अर्थसंकल्प असेल ज्याला तांत्रिक भाषेत I इंटरिम   बजेट   असे म्हणतात हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने तो आपणासाठी अत्यंत महत्वाचा आहे जो समजण्यासाठी काही तांत्रिक संकल्पना आपणास माहिती असणे आवश्यक आहे . ज्यामध्ये चालू करंट अकाउंट डेफिसिट , फिस्कल डेफिसिट ,   रेव्हन्यू डेफिसिट , प्लॅन एक्सापाँडिचर , नॉनप्लॅन एक्सापाँडिचर आदी विविध सुमारे ३५ ते ४० संकल्पनेचा समावेश होतो त्यातील प्रत्येक संकल्पना आपल्यला समजायलाच हवी असे नाही मात्र किमान काहीतरी संकल्पना आपल्यला माहिती असणे अत्यवश्यकच आहे च   ...