काही अनुत्तरीत प्रश्न
काही महिन्यांपुर्वी ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज आणि भारतीय पोलिस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी हिमांशू राँय यांनी आत्महत्या केली, आणि 29 जूलै2019 रोजी काँफी पार्लर ची भारतातील सर्वात मोठी साखळी चालवणाऱ्या व्ही जी सिद्धार्थ यांनी आत्महत्या केली . लौकिक अर्थाने ही माणसे खुप यशस्वी होती . अनेकांचे आदर्श होती . तरी त्यांच्या जीवनाची अखेर दुर्देवी होती . भय्युजी महाराज यांनी कौंटुबिक कारणांनी, हिमांशू राँय यांनी शाररीक अक्षमतेमुळे ,तर हि जी सिद्धार्थ यांनी आर्थिक विवंचनेतून मृत्यूला कवटाळले . थ्री इडियट हा चित्रपट हा जेव्हा प्रदर्शीत झाला , तेव्हाचा काळ आठवा , विद्यार्थ्यांनी आत्महत्येद्वारे जीवन संपवल्याचा बातमीने त्यावेळेची वर्तमान भरलेली असायची .शेतकऱ्यांच्या आत्महत्य...