भारत कंबोडिया संबंध मैत्रीच्या नव्या वळणावर
आपल्या भारतीय संस्कृतीचा फार मोठा प्रभाव जगभरात आहे भारताच्या सभोवतालचे देशच नव्हें तर त्या पासून दूर असणाऱ्या देशांवर देखील फार पूवीपासून भारताचा प्रभाव आहे . कंबोडिया हा अशाच एक देश आशिया खंडाच्या आग्नेय दिशेला असलेल्या इंडो चायना भागातील भारताचा प्रभाव असणारा देश . युके (इंग्लड )सारखी घटनादत्त राजेशाही असणाऱ्या या देशाचे राष्ट्रप्रमुख अर्थात विद्यमान कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी यांनी 29 मे ते 31 मे या कालावधीत भारताचा दौरा केला भारत आणि कंबोडिया यांच्यातील राजनैतिक संबंधांस 70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा दौरा आयोजित करण्यात आला होता 1952 मध्ये त्यांच्या तत्कालीन राजाने भारताला भेट दिल्यावर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते त्यास यंदा 70 वर्षे पूर्ण झाली आहेत1952 च्या त्या भेटीनंतर विद्यमान राजे नोरोडोम सिहामोनी यांचे वडील वडील नोरोडोम सिहानोक यांनी सन १९६३ साली . भेट दिली होती नोरोडोम सिहामोनी यांचे राष्ट्रपती भवनात भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी स्वागत केले आणि त्यांना सेरेमोनिअल गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नंतर