पोस्ट्स

मार्च २१, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने मार्च २१, २०१६

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो पर्यायाने हवेत गारवा टिकून रहातो ही या मागची कल्पना आहे . मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो . मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे  वृक्षांचे महत्व  आपण अनूभवू पण शकतो उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया  पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते  पुणे अधिक प्रमाणात  ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो  . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आसपास असणार्या तळजाई पर्वती चर्तश्र

लोणार मी बघीतलेले

इमेज
आजच  दिनांक 20मार्च 2016 पञ नव्हे स्मार्ट मिञ असे घोषवाक्य असणार्या एका दैनिकात लोणार विषयक लेखन वाचले अन माझे मन  लोणारला केलेल्या सहली आठवायला लागले. मी आतापर्यत 4 ते5 वेळा लोणारला गेलोय . दर वेळी लोणारला काही बदल झालेले दिसले काहि बदल सकारात्मक होते , काहि नकारात्मक होते असो मी इयत्ता आठवीत असताना सर्वप्रथम लोणारला गेलो . ते खगोल मंडळ या संस्थेमार्फत (ही पोस्ट वाचणार्रापैकी काहि लोकांना मी या संस्थेबरोबर सोमेश्वर धावत्या (धबधब्याचे छोटेरुप म्हणजे धावत्या  ) नाशिक  येथे केलेले आकाशदर्शन आठवू शकते ) नंतर परत एकदा याच संस्थेबरोबर गेलो . नंतर स्वतंञ ही गेलो . लोणारला प्रसिध्द असणार्या मुख्य सरोवराबरोबर गणेश तळे आणि अंबर तळे ही दोन छोटी सरोवरे देखील आहेत . त्याचा निर्मितीकाळ देखील मुख्य सरोवराच्या समकालीन आहे . तसेच प्रचंड मँगेंटीक पॉवर असलेली की ज्यामुळे चुंबकीय सुई देखील विचलीत होते अशी हनुमानाची उत्तर दक्षीण अशी झोपलेली मुर्ती पण लोणारचे आकर्षण आहे या मुर्तीला उभे करणे सोडाच पुर्व पश्चीम देखील कोणी करु शकत नाही भारतात  असणार्या काहि गोष्टीचा प्रचंड पगड्यामुळे त्या मुर्तीला प्रचंड