वंदन भारताची नवी ओळख जगाला करणाऱ्या संन्यास्याला
आजपासून 129 वर्षापुर्वीची गोष्ट आहे,स्थळ अमेरीका या देशातील शिकागो हे शहर . या शहरात ते शहर ज्या देशात आहे, त्या भुभागाचा जगाला शोध लागल्याच्या घटनेला 400 वर्षे पुर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ जगातील सर्व धर्मातील बाबींवर चर्चा करण्यासाठी एक परीषद आयोजीत करण्यात आली होती. आज परीषदेचा पहिला दिवस आहे, या दिवशी ज्या वक्त्यांनी बोलण्याचे नियोजन केले आहे, त्यातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता , सर्व वक्त्यांची भाषणे झाली आहेत,अश्यावेळी तेथील आयोजक एका 30 वर्षीय वक्त्याला बोलण्यास आमंत्रीत करतात, वक्ता त्यांचा गुरूचे स्मरण करुन भाषणास सुरवात करण्यासाठी शद्ब उचारतो, आणि त्याचे पहिले चार शद्ब उचारुन होत असतानाच जमलेले हजारो लोक त्या वक्त्याचा सम्माणार्थ सलग साडेतीन मिनीटे टाळ्या वाजवते, त्या व्यक्तीचे नाव असते, स्वामी विवेकानंद , आणि ज्या परीषदेत त्यांनी भाषण केले असते, ती असते शिकागो येथील सर्वधर्म परीषद .येत्या रविवारी जगाला भारताच्या महान वारस्याची जगाला ओळख करुन देणाऱ्या त्या भाषणास 129 वर्षे पुर्ण होणार आहेत. अनेक चूकीच्या समजूती असणाऱ्या आपल्या भारताची नविन