शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्याने
आज ६ जून अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस . त्या निमित्याने आज इतक्या वर्षांनी जेव्हा आपण त्यांचा राज्याभिषेकाच्या घटनेकडे बघतो तेव्हा चटकन लक्षात येते , की त्यांनी राज्य कारभाराची भाषा ही मराठी अर्थात सर्वसामान्य जनतेची भाषा केली . आज आपण स्वतंत्र होऊन ७२ वर्षे होत आली आहेत, मात्र आपण अजून आपला कारभार भारतातील प्रादेशिक भाषेत आणू शकलेलो नाही . आजही आपला बहुतांशी कारभार हा इंग्रजीत चालतो . हे इंग्रजीचे भूत आपल्या मानगुटीवरून इतक्या वर्षांनी देखील उतरलेले नाही . ते जेव्हा उतरेल तोच खरा अर्थाने सुराज्य दिन म्हणायला हरकत नसावी . छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार मराठीत आणतांना खास राज्य व्यवहार कोष तयार केला . त्यावेळच्या राज्यकारभाराची प्रमुख भाषा असलेल्या फारशी भाषेतील शब्दांना अनेक मराठी शब्द दिले जे सहजतेने मराठीत स्वीकारले गेले . आजही नाही म्हणायला आपल्या राज्य सरकारचा कारभार मराठीत चालतो मात्र ते मराठी फारच त्रासदायक असते , जे सहजतेने अंगवळणी पडत नाही , आणि दुर्दैवाने राज्य सरकारही त्याचा प्रसारासाठी