अस्वस्थ मनाचे वर्तमान
माझी रविवार 3आँक्टोबरची सकाळ उजाडली, ती एका अस्वस्थ करणाऱ्या बातमीने.नाशिकच्या विनयनगर भागातील माय लेकींनी घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनाने निधन झाल्यामुळे आलेल्या रिते पणाने मृत्यूस कवटाळले असल्याची ती बातमी होती.मनुष्य समाजशील प्राणी आहे. काही लोकांचा सम्माणीय अपवाद वगळता बहुसंख्य लोकांना समाजात राहणे आवडते. आपले विचार अन्य लोकांनी ऐकावेत, आपल्या सुख दुःखात इतरांनी सहभागी असावे, असी त्यांची स्वाभाविक इच्छा असते. दुर्देवाने त्या माय लेकींची तीच इच्छा पुर्ण होत नव्हती. आपले दुःख शेअर करायला कोणी नाही, या त्रासातून त्यांनी मृत्यूस कवटाळले. आपली समाजव्यवस्था कोणत्या कड्यावरुन खाली कोसळत आहे, याचे हे वाइट पण स्पष्ट निदर्शक आहे. असेच याबाबत म्हणावे लागेल. आपण सातत्याने ऐकतो मानवा कधी होशील मानव. मात्र सातत्याने ऐकून सुद्धा मानव अजून मानव बनला नाही हेच यातून दिसून येत आहे.आजपासून सुमारे पंचवीस वर्षापुर्वी कवीवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कवितेत सांगितलेला उणे कुणाचे दिसता किंचीत, देत दवंडी फिरु नका, हा सल्ला अमंलात न आणल्यामुळे, किंबहूंना त्या