भारताचे शेजारी आणि 2020 सिहावलोकन
सन 2020 संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. हे वर्ष प्रामुख्याने करोना संसर्गामुळे चर्चेत आलेले असले तरी भारताच्या शेजारी देशांचा विचार करता भारताचे आपल्या शेजारी असलेल्या देशांबरोबर अनेक करार झाले, काही देशांबरोबर चकमकी उडाल्या .तर काही देशात भारताच्या हित संबधांना बाधा उत्पन होईल, अश्या गोष्टी घडल्या . थोडक्यात या बाबत आढावा घेयचा असल्यास बांगलादेशबरोबर आणि म्यानमारबरोबर झालेले करार, मालदिवने आंतराष्ट्रीय पातळीवर घेतलेली भारताची बाजू, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांना केलेली मदत , नेपाळ आणि चीन झालेल्या चकमकी आणि पाकिस्तानने पाकव्यात काश्मीरच्या भाग असणाऱ्या गिलगीट बाल्टीस्तान या भागाला स्वतंत्र्य प्रांत म्हणून दिलेली मान्यता या बाबी प्रमुख मानता येतील . आता या बाबी विस्ताराने बघूया प्रथमतः बांगलादेश तर मित्रांनो, इशान्य भारताशी संपर्क साधणे सोईचे व्हावे, या उद्देश्याने बांगलादेशाच्या जमिनीचा वापर करता यावा , या उद्देश्याने भारताने बांगलादेशाबरोबर विविध करार करण्यात आले. ज्याद्वारे भारताच्या कोलकत्याहून बांगलादेशातील विविध बंदराच्या मार्फत भारताच्या त