संविधानाची ७० वर्षे
दोन वर्षे ११ महिने १८ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर २६ नोव्हेंबर १९४९ ला भारताच्या संविधान समितीने संविधान तयार केले . आजच्या २६ नोव्हेंबर २०१९ ला या घटनेला ७० वर्षे पूर्ण होतील . कोणत्याही देशाच्या वाटचालीत त्या देशाचे संविधान अत्यंत महत्वाची भूमिका बजावते . देशाची प्रगती तेथील राजकीय परिस्थिती तेथील संविधानावर अवलूंबून असते . आपल्या भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळ या देशात संविधान निर्मितीच्या प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे झालेली परिस्थिती आपण बघत आहोच . पाकिस्तानची सध्याची परिस्थितीसुद्धा त्याचे पहिले संविधान निर्मितीला लागलेल्या विलंबामुळे (आज पाकिस्तानात ३ रे संविधांची अंमलबजावणी सुरु आहे ) निर्माण झालेली आपण बघत आहोत . त्यामुळे भारतासारख्या विविधेतेनेने नटलेल्या देशाचे संविधान तयार करणाऱ्या सर्व कायदेपंडितांना या निमित्याने विनम्र अभिवादन . भारताचे संविधान तयार करताना घटना समितीमध्ये झालेली चर्चा उपलब्ध आहे . तुम्ही या ब्लॉगच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लीककरून तुम्ही ही चर्चा बघू शकतात . मित्रानो आपल्या संविधानात सर्व गोष्ट सविस्त