दूरसंचार क्षेत्रातील अस्वस्थता
सध्या आपल्या महाराष्ट्रात आगामी मुख्यमंत्री कोण होणार ? या बाबत पारंपरिक प्रसारमाध्यमे आपल्याला माहिती देत असताना, आज एक इंग्रजी वृत्तवाहिनी बघताना समोर आलेल्या दूरसंचार क्षेत्रातील बातमीने माझी अक्षरशः झोप उडाली आहे . ती बातमी आहे , भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील आघाडीच्या खासगी कंपनीच्या तोट्याची . एअरटेल आयडिया - व्होडाफोन या दोन कंपन्यांना सुमारे ७० हजार कोटी रुपयाचा तोटा झाला आहे मित्रानो केंद्र सरकारची सर्वात लोकप्रिय असणाऱ्या मनरेगा या येजनेसाठी सरकार ६१ हजार कोटी रुपये खर्च करते हे आपण या तोट्याकडे बघताना लक्षात घेतले पाहिजे . एकीकडे सरकारी दूरसंचार कंपन्या असणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन कंपन्या तोट्यामुळे चर्चेत आल्या असतानाच ही बातमी येणे भारतातील एकूणच दूरसंचार क्षेत्राची स्थिती कशी आहे ? हे पुरेसे स्पष्ट करणारे आहे . यात शंकाच नाही . या तोट्याला जे कारण या कंपन्यांकडून देण्यात येत आहे ते AGR अर्थात AGGREGATE GROSS REVENUE चे . सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार दू