का आहे २०२३ वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे ?
पुढील वर्ष २०२३भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कारण एस . सी . ओ . या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनझेशन तसेच जी २० या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुढील वर्षी २०२३ साली भारताच्या गळ्यात पडेल . २०२३ या वर्षी एक वर्षासाठी भारत या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदी असेल . ज्यामुळे भारताला विविध देशांशी आपले व्यापारी आर्थिक संबंध दृढ करण्यास मदत होईल . ज्यामध्ये मध्य आशियातील पाच इस्लामिक राष्ट्रांपैकी तुर्कमेनिस्तान वगळता अन्य चारही देश तसेच दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना ब्राझील , उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको , कॅनडा , आशिया खंडातील दक्षिण कोरिया , इंडोनेशिया , युरोप खंडातील फ्रांस युनाटेड किंगडम ( इंग्लंड ) आदी देश प्रमुख आहेत सुमारे २८ देशांशी प्रत्यक्ष व्यापारविषयक विविध करार करायची संधी त्यामुळे भारताला मिळेल जगात जरी २१० देश असले तरी आर्थिक ताकद...