पूर्वांचमधील सुखावणारे बदल
आपल्या मराठी बातम्यांचा विचार करता, अनेकदा भारतातीलच असून देखील, अनेकदा ज्या भागातील बातम्यां फारश्या चर्चेला जात नाहीतर असा भूभाग म्हणजे ईशान्य भारत अर्थांत पूर्वांचल भारताच्या अति पूर्वेकडील ही आठ राज्ये (सिक्कीम च्या समावेशासह ) अनेकदा दुर्लक्षित रहातात .तेथील समाजजीवन , तेथील राजकीय आर्थिक प्रश्न , त्यांची ऐतिहासिक परिस्थिती याबाबत आपल्यापैकी अनेकांना अत्यंत तुरळक माहिती असते देशाच्या सरंक्षणचा विचार करता अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या भूभागात गेल्या आठवड्यात दोन मोठ्या गोष्टी घडल्या . समर्थ रामदास स्वामी यांच्या "जेजे आपणाशी थवा ते ते सकळांसी सांगावे सकल जण या उक्तीनुसार त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन . तर मित्रानो , सुमारे आठवड्यापूर्वी आसाम आणि मेघालय यांच्या सीमावादाबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले . सन १९७२ च्या आसाम रिओर्गयझेशन ऍक्ट नुसार अस्तित्वात आलेल्या मेघालय या राज्याच्या स्थापनेपासून आसाम राज्याबरोबर सीमा विवाद होता . ज्याचे ७० % निराकारण झाल्याचा दा...