अस्मितांच्या प्रश्नाऐवजी या जीवघेण्या प्रश्नाकडे कधी बघणार आपण ?
सध्या समाजजीवनाकडे नजर टाकल्यास अनेक अस्मितांचे प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे . काही शतके पूर्वी घडलेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी साध्य मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या जात आहे विविध अस्मिता मानवास जगताना आनंद देत असल्यातरी निव्वळ अस्मितांवर जगता येणे अशक्य आहे . मानवास रोजच्या जगण्यात अस्मितांबरोबर अनेक भौतिक घटकांची देखील गरज असते यातील अनेक घटक निसर्गावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अवलूंबून असतात . निसार्गातील चांगल्या वाईट घटनांचा या भोतिक घटकांचे प्रमाण कमी जास्त होण्यात होतो . सध्याच्या निसर्गाच्या लहरीपणा वाढला असताना याचा खूपच मोठ्या प्रमाणात मानवी आयुष्यावर परिणाम होत आहे या प्रश्नाबाबत मात्र हवी तेव्हढी चर्चा भारतात होताना दिसत नाही . जर्मनी सारख्या देशात केंद्रीय सत्तेच्या राजकारणात हवामान बदल चर्चेत येऊन खूप काळ लोटला आता तेथील राज्याच्या निवडणुकीत हवामान बदलाच्या मुद्यावरून या मुद्यावरून सत्तांतरण होत आहे . आपल्याकडे राज्याच्या राजकारणात सोडा केंद्रीय राजकारणात देखील हा मुद्दा कोणी राजकीय नेत्याने घेतला आहे का ? हा लेख लिहीत असताना ईशान्